शहरं
Join us  
Trending Stories
1
कतरने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
3
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
4
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
5
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
6
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
7
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
8
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
9
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
10
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
11
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
12
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
13
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
14
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
15
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
16
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
17
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
18
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
19
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
20
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर

कृष्णावतारी... म्हणून 'संत ज्ञानेश्वरांना' श्रीकृष्णाचा अवतार मानतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 11:19 IST

कृष्णावतारी संत ज्ञानेश्वर

प्रा.सुलभा जामदार, नाशिक

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रात त्यांच्या जीवनाच्या सत् आचार ,सत् विचार व सत् उच्चार या गोष्टीचा प्रत्यय येतो.संत ज्ञानेश्वरांनी अलौकिक ज्ञानामृत प्रेमाने सर्वसामान्यांना पाजलं म्हणून त्यांना " ज्ञानियाचा राजा " तसेच " ज्ञानेश्वर माऊली "म्हणतात.त्यांचं चरित्र इतकं अलौकिक आहे की, ते शब्दांकित करणं अवघड आहे. सर्व संत ज्ञानेश्वरांना श्रीकृष्णाचा अवतार मानतात.कारण संत ज्ञानेश्वरांचा जन्म पण श्रीकृष्णाच्या जन्मदिनी (श्रावण कृष्ण अष्टमी),त्याचवेळी (मध्यरात्री)व त्याच नक्षत्रात झाला.तसेच श्रीकृष्णाने  संस्कृतमधून  भगवत् गीता अर्जुनाला सांगून वेदातील सार- ज्ञानयोग,कर्मयोग, भक्तीयोगाद्वारे अध्यात्माचे तत्वज्ञान जगाला सांगितले.

ज्ञानेश्वरांच्या काळात सर्व वेद, उपनिषदे, पुराणे इ.फक्त संस्कृत भाषेतच होती.गीतापण संस्कृत भाषेतच सांगीतली गेली.त्या वेळेस संस्कृत ही देवांची भाषा आहे असं मानलं जाई.त्या मुळे संस्कृत शिकण्याचा अधिकार फक्त उच्चवर्णियांनाच होता.सामान्य जनतेला संस्कृत शिकण्याचा अधिकार नव्हता.त्यामुळे सर्व अध्यात्म,तत्वज्ञानांची मक्तेदारी उच्चवर्णियांकडे (ब्राह्मण, क्षत्रिय) होती.त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग  समाजकल्याणासाठी न करता स्वतःच्या चरितार्थासाठी करू लागले.सामान्य जनता अज्ञानी असल्याने शूद्राची पिळवणूक, अनिष्ट रुढी व परंपरा, जातीभेद इ.समाजात पसरले.

अशा परिस्थितीत स्वतः समाजाकडून अतिशय छळ सोसून संत ज्ञानेश्वरांनी भगवत् गीतेतील अध्यात्म व तत्वज्ञान  सामान्य जनतेला समजण्यासाठी प्राकृत (मराठी) भाषेत सांगून त्यांना भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग, कर्म मार्ग याचे ज्ञान करून दिले. ज्ञानेश्वरीच्या रूपाने परम पवित्र व अजरामर श्रेष्ठ  ग्रंथ निर्माण करून सामान्य लोकांना विश्वकल्याणाचा मार्ग दाखवला."गीता"ही जशी श्रीकृष्णाची वाड्:मय मूर्ती आहे त्याप्रमाणे  "ज्ञानेश्वरी"ही संत ज्ञानेश्वर महाराजांची वाड्:मय मूर्ती म्हणता येईल.

संत ज्ञानेश्वरांनी ईश्वरनिष्ठाची मांदियाळी जमवून वारकरी संप्रदायाची उभारणी केली.भागवतधर्माचा प्रसार केला.त्यांनी आपल्या वाड्:मय साहित्यातून समा जजागृतीचे कार्य करून सामान्य लोकांना ज्ञानाचे कोठार खुले केले. लोकांमध्ये स्वाभिमान, भक्तिभाव, समानता, समर्पण, बंधूभाव निर्माण केला.सर्वसामान्यांना प्रेमाने ब्रह्मरसाचे (भक्तीचे) अमृत पाजून सत् चिद् आनंद म्हणजे मोक्षप्राप्तीची वाट दाखवली.

संत ज्ञानेश्वरांचे खरे चरित्र म्हणजे  त्यांची ज्ञानेश्वरी (भावार्थ दीपिका), हरिपाठ, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, अभंग यातून त्यांची भक्ती, प्रगल्भता, आत्मज्ञान , गुरूभक्ती इ. गुण प्रकर्षाने जाणवतात. एवढं अजरामर साहित्य वयाच्या अवघ्या पंधरा-सोळाव्यावर्षी निर्माण करून, गीतेतील तत्वज्ञान व भक्तीयोग जनसामान्यांच्या मनात रुजवला.अशाप्रकारे अलौकिक कार्य करून त्यांनी आपले जीवन कृतार्थ/कृतकृत्य केले आणि वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षीच त्यांनी क्षेत्र आळंदी येथे प्रत्यक्ष विठ्ठल व थोर संतांच्या उपस्थितीत संजीवन समाधी घेतली.

अशा या संतश्रेष्ठ ज्ञानियाचा राजा, उत्तम कवी, निरूपणकार, तत्ववेत्ता कृष्णस्वरूप ज्ञानेश्वरांना कोटी कोटी  दंडवत.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक