शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
3
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
4
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
5
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
6
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
7
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
8
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
9
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
10
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
11
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
12
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
13
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
14
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
15
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
16
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
17
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
18
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
19
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
20
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!

येता सोबत काहीच नव्हते, जाता सारे येथेच राही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 13:41 IST

या जगात येताना मनुष्य एकटाच रिकाम्या हाताने येतो व एकटाच रिकाम्या हाताने जगाचा निरोप घेतो. जाण्यापूर्वी निर्माण केलेले घरदार, पैसा, नातेसंबंध येथेच सोडून द्यावे लागते, हेच खरे जीवनाचे स्वरुप आहे.

या जगात येताना मनुष्य एकटाच रिकाम्या हाताने येतो व एकटाच रिकाम्या हाताने जगाचा निरोप घेतो. जाण्यापूर्वी निर्माण केलेले घरदार, पैसा, नातेसंबंध येथेच सोडून द्यावे लागते, हेच खरे जीवनाचे स्वरुप आहे.एक दिवस सगळ्यालाच तुम्हाला रामराम करायचा आहे. अगदी तुमच्या शरीराचासुद्धा तुम्हाला निरोप घ्यायचा आहे. प्रत्येक जण कधी ना कधी जाणार. फरक ऐवढाच, काही लोक लवकर जातील तर काही उशीरा जातील. मृत्यू कधी येणार? कसा येणार आणि कुठे येणार? हे कोणीही सांगू शकत नाही.कोठे व्हावा जन्म आपला। मरणही कोठे कसे यावे?स्वाधीन नाही यातील काही। पदरी पडले गोड मानावे।।विश्वनियत्या प्रभुने साऱ्यांचे पासपोर्टस तयार करुन ठेवले आहेत. त्यावर शिक्केही मारले आहेत. तारखाही लिहुन ठेवलेल्या आहेत. तो दिवस आलाकी, तुम्हा-आम्हा सर्वांनाच मुकाट्याने इहलोकातून प्रस्थन करावे लागणार आहे. हे वास्तव आहे.काळाची हे उडी पडेल बा जेंव्हा। सोडविना तेंव्हा रावरंक।म्हणून संत सांगून गेले की, या जगात जगत असताना दोन गोष्टींचा कधीही विसर पडू देवू नका. एक म्हणजे परमात्मा आणि दुसरे म्हणजे आपला मृत्यू. उद्या आपल्याला जायचे आहे याचाच विसर माणसाला पडला आहे. त्याची सारखी धावाधाव सुरु आहे या ब्रम्हांडाच्या पसाºयात आपले अस्तित्व नगण्य आहे. संकटाच्या क्षणी फक्त परमेश्वराचा आधार असतो ह्याची आठवण ठेवणे अगत्याचे आहे.अजुनी तरी होई जागा। तुका म्हणे पुढे दगा।।मृत्यूचा प्रवास खूप लांबचा आहे. ह्या प्रवासात तुमच्या मदतीला कोणीही धावून येवून शकत नाही. तुमच्या घरात अन्नधान्याचे भांडार असले तरी प्रवासाला निघतांना तुम्हाी चिमूटभर पीठही नेवू शकत नाही.उंच उंच माडी, लाल हवेली। हे घर म्हणशील माझेरेअखेर शेवटी तुझ्या नशीबी। स्मशानी काया उघडी रेसोन्या चांदीचे तांब्या पितळचे। हे भांडे म्हणशील माझे रेअखेर शेवटी तुझ्या नशीबी। मातीचे एक मडके रे।।पैसा खूप काही होवू शकतो पण सर्व काही कधीही होवू शकत नाही. ज्यांनी पैशालाच सर्वस्व मानले त्यांच्यावर आयुष्याच्या शेवटी पश्चाताप करण्याची वेळ येते. शिकंदर बादशहाने मरणापूर्वी आपल्या जवळ असलेली प्रचंड संपत्ती पाहिली. त्याचे डोळेअश्रूंनी भरले. कारण त्याला समजले की, ही अलोट संपत्ती आपल्यासोबत नेता येणार नाही.‘‘लाया तू क्या शिकंदर और साथ ले जा रहा क्या?दोनो हाथ थे खाली, बाहर कफनसे निकले।इकठ्ठे कर जहॉके जर, सभी मुल्कोके माली थे।सिकंदर जब गये दुनियासे, तो दोनो हाथ खाली थे।’’देश घडविणारी युगंधर व्यक्तीमत्त्वांची मांदियाळी ह्याच पद्धतीने मृत्युच्या द्वारापर्यंत पोहचली, हा निसर्गाचा नियमच आहे. प्रत्येक माणसाने ही जाणीव ठेवूनच जीवनाचे कल्याण कसे होईल याचे वेळापत्रक करायला हवे. वेळापत्रकाप्रमाणे सर्व गोष्टी होतीलच असे नाही परंतु जीवनप्रवासाचा शेवट चांगला होईल. संतजणांनी आम्हाला सांगितले आहे की, एखाद्याची प्रेतयात्रा रस्त्यावरुन जाताना ‘अरेरे, बिचारा गेला’ असे कधीही म्हणू नका. कारण ह्याच रस्त्याने आपणाला जायचे आहे. अर्थी निघण्यापूर्वी आपण जीवनाचा अर्थ समजून घ्यायला हवा.‘‘कर्ता निमित्त मी, मज नको- चिंता काळाची मनी।ठेवा ईशनाम मुखी, गुरुला स्मरोनि- आनंद भोगाजनी।रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा। मंत्र हा जपावा सर्वकाळ।।.- ह.भ.प. डॉ. ज्ञानेश्वर मिरगे, शेगाव

टॅग्स :spiritualअध्यात्मिकSocialसामाजिकAkolaअकोला