शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
6
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
7
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
8
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
9
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
10
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
11
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
12
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
13
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
14
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
15
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
16
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
17
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
18
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
19
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
20
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 

अभयात दु:खालाही सुखाची चव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 06:24 IST

‘ऐसे भय नुपजविजे की’ श्रीचक्रधरांनी माणूस पारखला, तो त्यांना हरहुन्नरी वाटला. त्याला शाबासकी दिली. म्हणाले, तू महात्मा आहेस. महानगुणाचा आत्मा म्हणून महात्मा. तो धान्यच पेरत नाही. विवेकाची पेरणी करतो.

- बा. भो. शास्त्री‘ऐसे भय नुपजविजे की’ श्रीचक्रधरांनी माणूस पारखला, तो त्यांना हरहुन्नरी वाटला. त्याला शाबासकी दिली. म्हणाले, तू महात्मा आहेस. महानगुणाचा आत्मा म्हणून महात्मा. तो धान्यच पेरत नाही. विवेकाची पेरणी करतो. ज्ञानेश्वरीत विवेकाचीही लावणी झाली. त्यात साहित्य पिकलं. ते कसदार व टिकाऊ आहे. देहाला अन्न व बुद्धीला विचार लागतात. बुद्ध, महावीर पैगंबर, श्रीकृष्ण, व्यासांचा देह साडेतीन हातांचाच, पण त्यांनी जगभर विवेकाचे मळे निर्माण केले. म्हणून स्वामी माणसाचं कौतुक करतात आणि हळूच एक सूचना करतात. सगळं उत्पन्न कर बाबा, पण भय पेरू नकोस. कारण भयात मिळालेलंं सुख रूचत नाही, पचत नाही व अभयात दु:खालाही सुखाची चव येते. अभयदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्याचा दाता माणसाशिवाय कुणी नाही. माणूस हा जन्मताच अनामिक भयाने रडतो. मरेपर्यंत भय, अभयाच्या दोन बाजू त्याच्या जीवनाच्या नाण्याला चिकटतात. अभयात सुखाचा तर भयात दु:खाचा भोग त्याला भोगावाच लागतो. भय येतं कुठून? निसर्ग, प्राणी, खानपान रोग, भोग, धनातून जनातून, मनातून आभाळ व भूमीतून, खरं भय माणसाचंच आहे. याच्या भायाने सर्व जग व्यापलं आहे. पशूपक्षी घातक हत्यारं बनवत नाहीत. कपट नाही. विश्वयुद्ध करीत नाहीत. वृक्षतोड, नद्यांचं गटार करत नाहीत. हवा, ध्वनिप्रदूषण, भेसळ, खोटी नाणी, त्यानेच केली, आंबे खराब केले. कृत्रिम दूध, दूषित भाज्या अशा अनेक भयाच्या जागा निर्माण केल्या. माणसाला ज्या वस्तूंची प्रीती होती त्यात माणसानेच भीती मिसळली. माणसानेच पदार्थात भीती घातली. औषधीची भीती. शिक्षणाची भीती. ही भीती मानवनिर्मित आहे. हाच अधर्म आहे व ती नष्ट करणे हाच धर्म आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक