शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

अभयात दु:खालाही सुखाची चव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 06:24 IST

‘ऐसे भय नुपजविजे की’ श्रीचक्रधरांनी माणूस पारखला, तो त्यांना हरहुन्नरी वाटला. त्याला शाबासकी दिली. म्हणाले, तू महात्मा आहेस. महानगुणाचा आत्मा म्हणून महात्मा. तो धान्यच पेरत नाही. विवेकाची पेरणी करतो.

- बा. भो. शास्त्री‘ऐसे भय नुपजविजे की’ श्रीचक्रधरांनी माणूस पारखला, तो त्यांना हरहुन्नरी वाटला. त्याला शाबासकी दिली. म्हणाले, तू महात्मा आहेस. महानगुणाचा आत्मा म्हणून महात्मा. तो धान्यच पेरत नाही. विवेकाची पेरणी करतो. ज्ञानेश्वरीत विवेकाचीही लावणी झाली. त्यात साहित्य पिकलं. ते कसदार व टिकाऊ आहे. देहाला अन्न व बुद्धीला विचार लागतात. बुद्ध, महावीर पैगंबर, श्रीकृष्ण, व्यासांचा देह साडेतीन हातांचाच, पण त्यांनी जगभर विवेकाचे मळे निर्माण केले. म्हणून स्वामी माणसाचं कौतुक करतात आणि हळूच एक सूचना करतात. सगळं उत्पन्न कर बाबा, पण भय पेरू नकोस. कारण भयात मिळालेलंं सुख रूचत नाही, पचत नाही व अभयात दु:खालाही सुखाची चव येते. अभयदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्याचा दाता माणसाशिवाय कुणी नाही. माणूस हा जन्मताच अनामिक भयाने रडतो. मरेपर्यंत भय, अभयाच्या दोन बाजू त्याच्या जीवनाच्या नाण्याला चिकटतात. अभयात सुखाचा तर भयात दु:खाचा भोग त्याला भोगावाच लागतो. भय येतं कुठून? निसर्ग, प्राणी, खानपान रोग, भोग, धनातून जनातून, मनातून आभाळ व भूमीतून, खरं भय माणसाचंच आहे. याच्या भायाने सर्व जग व्यापलं आहे. पशूपक्षी घातक हत्यारं बनवत नाहीत. कपट नाही. विश्वयुद्ध करीत नाहीत. वृक्षतोड, नद्यांचं गटार करत नाहीत. हवा, ध्वनिप्रदूषण, भेसळ, खोटी नाणी, त्यानेच केली, आंबे खराब केले. कृत्रिम दूध, दूषित भाज्या अशा अनेक भयाच्या जागा निर्माण केल्या. माणसाला ज्या वस्तूंची प्रीती होती त्यात माणसानेच भीती मिसळली. माणसानेच पदार्थात भीती घातली. औषधीची भीती. शिक्षणाची भीती. ही भीती मानवनिर्मित आहे. हाच अधर्म आहे व ती नष्ट करणे हाच धर्म आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक