शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अभयात दु:खालाही सुखाची चव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 06:24 IST

‘ऐसे भय नुपजविजे की’ श्रीचक्रधरांनी माणूस पारखला, तो त्यांना हरहुन्नरी वाटला. त्याला शाबासकी दिली. म्हणाले, तू महात्मा आहेस. महानगुणाचा आत्मा म्हणून महात्मा. तो धान्यच पेरत नाही. विवेकाची पेरणी करतो.

- बा. भो. शास्त्री‘ऐसे भय नुपजविजे की’ श्रीचक्रधरांनी माणूस पारखला, तो त्यांना हरहुन्नरी वाटला. त्याला शाबासकी दिली. म्हणाले, तू महात्मा आहेस. महानगुणाचा आत्मा म्हणून महात्मा. तो धान्यच पेरत नाही. विवेकाची पेरणी करतो. ज्ञानेश्वरीत विवेकाचीही लावणी झाली. त्यात साहित्य पिकलं. ते कसदार व टिकाऊ आहे. देहाला अन्न व बुद्धीला विचार लागतात. बुद्ध, महावीर पैगंबर, श्रीकृष्ण, व्यासांचा देह साडेतीन हातांचाच, पण त्यांनी जगभर विवेकाचे मळे निर्माण केले. म्हणून स्वामी माणसाचं कौतुक करतात आणि हळूच एक सूचना करतात. सगळं उत्पन्न कर बाबा, पण भय पेरू नकोस. कारण भयात मिळालेलंं सुख रूचत नाही, पचत नाही व अभयात दु:खालाही सुखाची चव येते. अभयदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्याचा दाता माणसाशिवाय कुणी नाही. माणूस हा जन्मताच अनामिक भयाने रडतो. मरेपर्यंत भय, अभयाच्या दोन बाजू त्याच्या जीवनाच्या नाण्याला चिकटतात. अभयात सुखाचा तर भयात दु:खाचा भोग त्याला भोगावाच लागतो. भय येतं कुठून? निसर्ग, प्राणी, खानपान रोग, भोग, धनातून जनातून, मनातून आभाळ व भूमीतून, खरं भय माणसाचंच आहे. याच्या भायाने सर्व जग व्यापलं आहे. पशूपक्षी घातक हत्यारं बनवत नाहीत. कपट नाही. विश्वयुद्ध करीत नाहीत. वृक्षतोड, नद्यांचं गटार करत नाहीत. हवा, ध्वनिप्रदूषण, भेसळ, खोटी नाणी, त्यानेच केली, आंबे खराब केले. कृत्रिम दूध, दूषित भाज्या अशा अनेक भयाच्या जागा निर्माण केल्या. माणसाला ज्या वस्तूंची प्रीती होती त्यात माणसानेच भीती मिसळली. माणसानेच पदार्थात भीती घातली. औषधीची भीती. शिक्षणाची भीती. ही भीती मानवनिर्मित आहे. हाच अधर्म आहे व ती नष्ट करणे हाच धर्म आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक