शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

चांगल्या कर्मानेच मनुष्य जीवनात यशप्राप्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 15:47 IST

प्रत्यक्षात माणूस हा कर्माने मोठा होतो हे ज्ञात असून देखील खोट्या प्रतिष्ठेच्या मागे लागलेला आहे.  ईश्वर निर्मित जग हे अत्यंत सुंदर तर आहेच पण ते रहस्यमय देखील आहे.

सोडून आव मोठेपणाचा,

कधी लहान होऊन पहावे।

बाळगून मनी सतत उत्साह,

अनुभव घ्यावे नीत नवे।।

आजच्या कालखंडात मोठे, लहान, गरीब, श्रीमंत हे भाव प्रकर्षाने पाहावयास मिळतात. प्रत्येक व्यक्ती मी कसा मोठा आहे, हे दाखवण्यात मग्न असल्याचे दिसून येतो. प्रत्यक्षात माणूस हा कर्माने मोठा होतो हे ज्ञात असून देखील खोट्या प्रतिष्ठेच्या मागे लागलेला आहे.  ईश्वर निर्मित जग हे अत्यंत सुंदर तर आहेच पण ते रहस्यमय देखील आहे. या गोष्टीचा विचार करायला हवा माणसाला लाभलेल्या अल्पायुष्यात कितीतरी आनंद घेता येतो व देता देखील येतो परंतु खोट्या प्रतिष्ठा आणि अहंकारामध्येच लुप्त झालेला आहे. माणूस कितीही मोठा झाला परंतु, तो या समाजाचे उपयोगास नाही आला तर, त्याचे मोठेपण काही कामाची नसते. संत नामदेवांनी मानवी देह किती नम्र असावा, आणि सम मार्गी लागावा याकरिता ईश्वरचरणी प्रार्थना करीत असताना नम्रपणे ईश्वराला शरण जात म्हटले आहे,

देह जावो अथवा राहो। पांडुरंगी दृढ भावो।।

चरण न सोडी सर्वथा। आण तुझी पंढरीनाथा।।

वदनी तुझे मंगलनाम। हृदयी अखंडित प्रेम।।

वरील अभंगाच्या प्रत्येक शब्दात समर्पणाची भावना ओतप्रोत भरलेली आहे. कुठेही ताठरपणा, अहंभाव, अहंकार नाही. उलट हृदयात अखंड प्रेम असुदे ही याचना केलेली आहे. आप-पर  भाव माणूस जेव्हा विसरेल तेव्हाच त्याचे नाव चिरकाल टिकते. प्रत्येक व्यक्ती हा मनाने मोठा होण्याची गरज आहे. अहंकाराचे ओझे वाहणारा व्यक्ती अत्यंत ताठर होतोच.परंतु फक्त वाढलेल्या वृक्षासारखा असतो. याउलट सात्विकचे व माणुसकीचे कर्तव्य जाणणारा व्यक्ती कितीही लहान असला, तरी तो रसरशीत फळांनी लगडलेल्या वृक्षासारखाच असतो. असाच व्यक्ती समाजाचे हित साधू शकतो.

वरून वरून दिसणारे ऐश्वर्या हे चिरकाल नसते. टिकून राहते ते कर्म.  'ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, नदी डोंगी परि जल नोहे डोंगा, काय भुललाही वरलिया रंगा' असे ठणकावून आपणास संतांनी सांगितले आहे अहोरात्र 'अहं' पणा साठी झटणाऱ्यासाठी मात्र हे डोळ्यातील  मात्र अंजनाचे काम करते. एखाद्याच्या वरकरणी दिसणाऱ्या प्रतिष्ठा पेक्षा श्रमप्रतिष्ठा अत्यंत श्रेष्ठ असते. अशा व्यक्ती बाह्यांगाने सालस नसतील परंतु समाजहीत तशाच मानवाकडून होऊ शकते. ऊस कितीही वेडा-वाकडा असला तरी त्यामध्ये असणार्‍या रसाची गोडी कमी होत नाही. तसेच नदी कितीही वाकडी वळणे घेत प्रवाहित झाली,तरी त्या पाण्याचे महत्व कमी होत नाही. असेच असते समाजासाठी अंतः प्रेरणेने कार्य करणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व म्हणूनच ईश्वराचा अंश म्हणून अशांना संबोधले जाते. अकबर बादशाहाच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक रत्न कविराज अब्दुल रहिम खान हे मंत्री पदावर होते. इतक्या उच्च पदावर कार्यरत असून देखील अत्यंत साधेपणाने जीवन जगत होते. आपल्या उत्पन्नाचा बहुतांश भाग धार्मिक कार्यात ते खर्च करीत असत. त्यांच्या विनम्र स्वभावाने त्यांना असे उच्चपद प्राप्त झाले होते. तेव्हा काहींनी त्यांना विचारले की आपण एवढे विनम्र कसे?  त्यावर त्यांनी उत्तर दिले, 'देने वाला कोई और है, जो दिन रात देता रहता है.पर लोग मुझ पर भरम करते है, इसलिए शर्म, संकोच से मेरी नजर नीची हो जाती है. याला लहानपण म्हटले गेले आहे. अशाच व्यक्ती महान व अमर झाल्या. ज्या व्यक्तीने विनम्रतेची समजून घेतले तोच विशाल सागराप्रमाणे सर्व गोष्टी सामावणारा असतो म्हणून म्हटले जाते,"गुरुजनी ऐसे द्यावेत धडे।आपुला आदर्श ठेवोनी पुढे."

भालचंद्र संगनवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक,लातूर.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक