शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्या कर्मानेच मनुष्य जीवनात यशप्राप्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 15:47 IST

प्रत्यक्षात माणूस हा कर्माने मोठा होतो हे ज्ञात असून देखील खोट्या प्रतिष्ठेच्या मागे लागलेला आहे.  ईश्वर निर्मित जग हे अत्यंत सुंदर तर आहेच पण ते रहस्यमय देखील आहे.

सोडून आव मोठेपणाचा,

कधी लहान होऊन पहावे।

बाळगून मनी सतत उत्साह,

अनुभव घ्यावे नीत नवे।।

आजच्या कालखंडात मोठे, लहान, गरीब, श्रीमंत हे भाव प्रकर्षाने पाहावयास मिळतात. प्रत्येक व्यक्ती मी कसा मोठा आहे, हे दाखवण्यात मग्न असल्याचे दिसून येतो. प्रत्यक्षात माणूस हा कर्माने मोठा होतो हे ज्ञात असून देखील खोट्या प्रतिष्ठेच्या मागे लागलेला आहे.  ईश्वर निर्मित जग हे अत्यंत सुंदर तर आहेच पण ते रहस्यमय देखील आहे. या गोष्टीचा विचार करायला हवा माणसाला लाभलेल्या अल्पायुष्यात कितीतरी आनंद घेता येतो व देता देखील येतो परंतु खोट्या प्रतिष्ठा आणि अहंकारामध्येच लुप्त झालेला आहे. माणूस कितीही मोठा झाला परंतु, तो या समाजाचे उपयोगास नाही आला तर, त्याचे मोठेपण काही कामाची नसते. संत नामदेवांनी मानवी देह किती नम्र असावा, आणि सम मार्गी लागावा याकरिता ईश्वरचरणी प्रार्थना करीत असताना नम्रपणे ईश्वराला शरण जात म्हटले आहे,

देह जावो अथवा राहो। पांडुरंगी दृढ भावो।।

चरण न सोडी सर्वथा। आण तुझी पंढरीनाथा।।

वदनी तुझे मंगलनाम। हृदयी अखंडित प्रेम।।

वरील अभंगाच्या प्रत्येक शब्दात समर्पणाची भावना ओतप्रोत भरलेली आहे. कुठेही ताठरपणा, अहंभाव, अहंकार नाही. उलट हृदयात अखंड प्रेम असुदे ही याचना केलेली आहे. आप-पर  भाव माणूस जेव्हा विसरेल तेव्हाच त्याचे नाव चिरकाल टिकते. प्रत्येक व्यक्ती हा मनाने मोठा होण्याची गरज आहे. अहंकाराचे ओझे वाहणारा व्यक्ती अत्यंत ताठर होतोच.परंतु फक्त वाढलेल्या वृक्षासारखा असतो. याउलट सात्विकचे व माणुसकीचे कर्तव्य जाणणारा व्यक्ती कितीही लहान असला, तरी तो रसरशीत फळांनी लगडलेल्या वृक्षासारखाच असतो. असाच व्यक्ती समाजाचे हित साधू शकतो.

वरून वरून दिसणारे ऐश्वर्या हे चिरकाल नसते. टिकून राहते ते कर्म.  'ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, नदी डोंगी परि जल नोहे डोंगा, काय भुललाही वरलिया रंगा' असे ठणकावून आपणास संतांनी सांगितले आहे अहोरात्र 'अहं' पणा साठी झटणाऱ्यासाठी मात्र हे डोळ्यातील  मात्र अंजनाचे काम करते. एखाद्याच्या वरकरणी दिसणाऱ्या प्रतिष्ठा पेक्षा श्रमप्रतिष्ठा अत्यंत श्रेष्ठ असते. अशा व्यक्ती बाह्यांगाने सालस नसतील परंतु समाजहीत तशाच मानवाकडून होऊ शकते. ऊस कितीही वेडा-वाकडा असला तरी त्यामध्ये असणार्‍या रसाची गोडी कमी होत नाही. तसेच नदी कितीही वाकडी वळणे घेत प्रवाहित झाली,तरी त्या पाण्याचे महत्व कमी होत नाही. असेच असते समाजासाठी अंतः प्रेरणेने कार्य करणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व म्हणूनच ईश्वराचा अंश म्हणून अशांना संबोधले जाते. अकबर बादशाहाच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक रत्न कविराज अब्दुल रहिम खान हे मंत्री पदावर होते. इतक्या उच्च पदावर कार्यरत असून देखील अत्यंत साधेपणाने जीवन जगत होते. आपल्या उत्पन्नाचा बहुतांश भाग धार्मिक कार्यात ते खर्च करीत असत. त्यांच्या विनम्र स्वभावाने त्यांना असे उच्चपद प्राप्त झाले होते. तेव्हा काहींनी त्यांना विचारले की आपण एवढे विनम्र कसे?  त्यावर त्यांनी उत्तर दिले, 'देने वाला कोई और है, जो दिन रात देता रहता है.पर लोग मुझ पर भरम करते है, इसलिए शर्म, संकोच से मेरी नजर नीची हो जाती है. याला लहानपण म्हटले गेले आहे. अशाच व्यक्ती महान व अमर झाल्या. ज्या व्यक्तीने विनम्रतेची समजून घेतले तोच विशाल सागराप्रमाणे सर्व गोष्टी सामावणारा असतो म्हणून म्हटले जाते,"गुरुजनी ऐसे द्यावेत धडे।आपुला आदर्श ठेवोनी पुढे."

भालचंद्र संगनवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक,लातूर.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक