शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

विपश्यनेचा अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 05:36 IST

बुद्धांचे उपदेश अधिक स्पष्ट होत होते. कोठे थोडेसुद्धा दोष नव्हते, शब्दाशब्दांत अमृत रसपान होते.

- फरेदुन भुजवालाविपश्यना शिबिरात नितांत शुद्ध धर्माचाच अभ्यास केला असल्याचे विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका सांगतात़ ते म्हणतात, शिबिरात पंचशीलाचे पालन केले़ चित्ताच्या एकाग्रतेसाठी समाधीचा अभ्यास केला आणि नंतर जेवढी शक्य आहे तेवढी प्रज्ञा जागृत करून चित्त विशुद्धीचा प्रयत्न केला़ या तिन्हींच्या अभ्यासात कोठे काही दोष दिसून आला नाही़ शरीर आणि वाणीच्या दुष्कर्मांपासून अलिप्त राहून शील आणि सदाचार पालनाचा वैदिक धर्मच नाही, तर जगातील सर्व धर्म स्वीकार करतात़ सर्वच याला चांगले म्हणतात़ हजारो उपदेश ऐकत राहिलो तरीही मनाला वश केल्याशिवाय शील पालन करणे शक्य नाही, हे सर्वांना माहीत आहे़ तेथे मन वश करण्याचा अभ्यास शिकविला गेला़ त्यासाठी स्वाभाविक श्वासाचे आलंबन दिले गेले़ तेसुुद्धा असे निर्दोष आणि सार्वजनिक आहे, की त्याचा प्रयोग सर्व करू शकतात़ भगवान गौतम बुद्धांनी सांगितले,सब्बपापस्स अकरणं, कुसलस्स उपसम्पदा।सचित्तपरियोदपनं, एतं बुद्धनसासनं।।सर्व पापकर्मांपासून अलिप्त राहणे, कुशल कर्माची संपत्ती प्रात्प करणे आणि आपले चित्त परिपूर्ण रूपाने शुद्ध करणे हाच भगवान गौतम बुद्धांचा संदेश आहे़ हेच शील, समाधी, प्रज्ञा आहे़ भगवान गौतम बुद्ध केवळ उपदेशच देत नाहीत, तर त्याचा प्रयोगात्मक अभ्यास कसा करावा हे शिकवतात़ म्हणून बुद्धांचा उपदेश फलदायी असतो़ पहिल्या सत्रात हे सत्य खूप समजू लागले आणि वाटले की बुद्धांच्या विद्येचा हा व्यावहारिक पक्ष खरोखर मोठा विलक्षण, अद्भुत आणि अनमोल आहे, असे गोएंका यांनी नमूद केले़ ते म्हणतात, एकीकडे विपश्यनेचा गंभीर व्यावहारिक अनुभव आणि दुसरीकडे बुद्धवाणीचासैद्धान्तिक अभ्यास हे दोन्ही बरोबरीने चालले होते. त्यामुळेच बुद्धांचे उपदेश अधिक स्पष्ट होत होते. कोठे थोडेसुद्धा दोष नव्हते, शब्दाशब्दांत अमृत रसपान होते.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक