शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

अभ्यासूनी हरिपाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 01:02 IST

भारतात असा एक मोठा समाज आहे. परीक्षेचे गुण भरपूर मिळविलेत; परंतु जीवन मूल्यांच्या शिक्षणाबाबत त्यांनी रुची दाखविलीच नाही. भारतीय तत्त्व हे वैश्विकच आहे; परंतु त्याला चिंतनाच्या आणि मननाच्या पायरीपर्यंत कधी येऊच दिले नाही.

- विजयराज बोधनकरभारतात असा एक मोठा समाज आहे. परीक्षेचे गुण भरपूर मिळविलेत; परंतु जीवन मूल्यांच्या शिक्षणाबाबत त्यांनी रुची दाखविलीच नाही. भारतीय तत्त्व हे वैश्विकच आहे; परंतु त्याला चिंतनाच्या आणि मननाच्या पायरीपर्यंत कधी येऊच दिले नाही. पोथ्या, पुराण, मंत्रजप, ओव्या, अभंग किंवा श्लोक हे फक्त कर्मकांडापुरतेच वाचले गेलेत. ज्यांनी त्याचे अर्थ अनुकरणात आणलेत त्यांच्या जीवन प्रवासाला नक्की ऊर्जेची गती मिळाली; पण ज्यांनी फक्त देव्हारे सजविले, फुलविले आणि फक्त कोऱ्या मनानेच फक्त भक्तिभाव समर्पित केला त्यांना त्याच्या भविष्याच्या कोºया कागदावर यशाच्या प्रश्नांची उत्तरेच लिहिता आली नाहीत. वारकरी संप्रदायात हरिपाठाला फार मोठे महत्त्व आहे. त्या हरिपाठात देव नावाचीसुद्घा अमूर्त शक्ती आणि मानवी सकारात्मक कर्माच्या गुपितांची उत्तरे मात्र नक्कीच दिली आहेत. टाळ, मृदुंगासोबत हरिपाठाचे गायन झाले; पण त्यातले तत्त्व समजून न घेतल्यामुळे वैचारिक श्रीमंती हरिपाठातच पडून राहिली. उदाहरणासाठी हरिपाठाच्या पाचव्या अभंगात तिसरा श्लोक जरी बघितला, तरी त्यात एक मोठे समाजभान दडले आहे. त्याचा सरळ साधा अर्थ इतका प्रभावी आहे की ते वाचून असे वाटते की, हरिपाठ ही धार्मिक भावरचना नसून, हरिपाठ ही शैक्षणिक रचना आहे, जी मानवाला विकासाकडे नेण्यासाठीच निर्माण केली आहे. त्या श्लोकांत असे म्हटले आहे की,तपेवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त ।गुजेवीण हित कोण सांगे ।।३।।याचा साधारण अर्थ म्हणजे, तपश्चर्येशिवाय देव नावाची ऊर्जा प्रसन्न होत नाही. गुंतवणुकीशिवाय नफा मिळत नाही. स्वत:चा कमीपणा स्वत:च्या गुरूजवळ व्यक्त जर केला नाही तर आत्मोन्नती होणे शक्य नाही.हरिपाठातल्या दोन ओळींचा विचार इतका प्रभावी आहे. संपूर्ण हरिपाठात कितीतरी जीवन उद्देशाची गुपिते दडलेली आहेत. येणाºया नव्या पिढीला याचा इंग्रजीतून अर्थ सांगितला तर नक्कीच आपल्या ग्रंथाकडे वैज्ञानिक ग्रंथ म्हणून पाहिला जाईल. आजची पिढी इंग्रजीची चाहती आहे. त्यांना नव्याने हे सारे सांगायला हवे, विठ्ठल हा महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून तो वैश्विक नायक आहे. हे सांगण्याची वेळ नक्कीच आली आहे. वैश्विक स्पर्धेच्या युगात आपले तत्त्वज्ञान जे लाल कपड्यात बांधून ठेवलेय त्याला अभ्यासासाठी मुक्त केलेच तर त्याचा सार्वभौम उपयोग होऊ शकतो.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक