शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

अध्यात्म ही मनाशी जोडलेली अतूट शक्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 19:19 IST

‘आधी संसार करावा नेटका, मग परमार्थ-विवेका’असे जे समर्थांनी सांगितले ते फार खोलवर जाऊन आपण विचारार्थ ठेवले पाहिजे.

भौतिक गोष्टींचा विसर पडत फक्त ईश्वराचे गुणवर्णन व्यक्तीच्या मुख आणि मनाने सुरू असणे, हीच खरी श्रद्धा होय. श्रद्धेच्या वाटेवर जो आला तो कधीही परत फिरत नाही. एकदा त्याला श्रद्धेची अनुभूती आली की, मग त्याचा पुढचा प्रवास अयोग्य होऊ शकत नाही. अध्यात्म ही अशी मनाशी जोडलेली शक्ती आहे. आपल्या सर्व संतमंडळींनी जे जीवनाचे सार आणि सार्थक सांगितले ते याच विद्येच्या जोरावर सांगितले आहे. ‘आधी संसार करावा नेटका, मग परमार्थ-विवेका’असे जे समर्थांनी सांगितले ते फार खोलवर जाऊन आपण विचारार्थ ठेवले पाहिजे. संतांनी सांगितलेले अध्यात्म हे वरवरचे नाही. ते गहन आहे. आपण आपले रोजच्या जगण्यातले एखादे काम जर तन्मयतेने करत असू तर तिथेही अध्यात्म प्रकट होत असते. मनाच्या डोहात कायमच ढवळाढवळ सुरू असते. तिथे वासना चेतविल्या जातात. त्यामुळे अशा ठिकाणी वैराग्याचा दीप लावणे म्हणजे भौतिक सुखाच्या गोष्टींपासून अलिप्त राहणे होय. ही अलिप्त राहण्याची किमया उत्कट भावनेने स्वीकारता आली पाहिजे.  वासना उडवता आली पाहिजे. ज्या देहाच्या ठिकाणी अशी वासना उडवली जाते तिथेच वैराग्य नांदते. देवावर माझी श्रद्धा आहे, असे म्हणणे म्हणजे श्रद्धा नसून श्रद्धेचा धागा हा कायम त्याग आणि समर्पण भाव यांच्याशी जोडलेला असतो.  ज्याला या विद्येचे गमक कळले त्यालाच वैराग्य साधता येते. या संकल्पना दूर कुठेतरी जाऊन अनुसरणे कुणाला मान्य नाही. त्याचा रोजच्या जगण्याशी संबंध आणता येतो का? हे जास्त मोलाचे.  तीच तृप्तता मला अध्यात्मचा नवा धडा देणारी असेल. - वेदांताचार्य राधे राधे महाराजबर्डेश्वर संस्थान, तरवाडी ता. नांदुरा, जि. बुलडाणा.

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक