शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

अध्यात्म ही मनाशी जोडलेली अतूट शक्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 19:19 IST

‘आधी संसार करावा नेटका, मग परमार्थ-विवेका’असे जे समर्थांनी सांगितले ते फार खोलवर जाऊन आपण विचारार्थ ठेवले पाहिजे.

भौतिक गोष्टींचा विसर पडत फक्त ईश्वराचे गुणवर्णन व्यक्तीच्या मुख आणि मनाने सुरू असणे, हीच खरी श्रद्धा होय. श्रद्धेच्या वाटेवर जो आला तो कधीही परत फिरत नाही. एकदा त्याला श्रद्धेची अनुभूती आली की, मग त्याचा पुढचा प्रवास अयोग्य होऊ शकत नाही. अध्यात्म ही अशी मनाशी जोडलेली शक्ती आहे. आपल्या सर्व संतमंडळींनी जे जीवनाचे सार आणि सार्थक सांगितले ते याच विद्येच्या जोरावर सांगितले आहे. ‘आधी संसार करावा नेटका, मग परमार्थ-विवेका’असे जे समर्थांनी सांगितले ते फार खोलवर जाऊन आपण विचारार्थ ठेवले पाहिजे. संतांनी सांगितलेले अध्यात्म हे वरवरचे नाही. ते गहन आहे. आपण आपले रोजच्या जगण्यातले एखादे काम जर तन्मयतेने करत असू तर तिथेही अध्यात्म प्रकट होत असते. मनाच्या डोहात कायमच ढवळाढवळ सुरू असते. तिथे वासना चेतविल्या जातात. त्यामुळे अशा ठिकाणी वैराग्याचा दीप लावणे म्हणजे भौतिक सुखाच्या गोष्टींपासून अलिप्त राहणे होय. ही अलिप्त राहण्याची किमया उत्कट भावनेने स्वीकारता आली पाहिजे.  वासना उडवता आली पाहिजे. ज्या देहाच्या ठिकाणी अशी वासना उडवली जाते तिथेच वैराग्य नांदते. देवावर माझी श्रद्धा आहे, असे म्हणणे म्हणजे श्रद्धा नसून श्रद्धेचा धागा हा कायम त्याग आणि समर्पण भाव यांच्याशी जोडलेला असतो.  ज्याला या विद्येचे गमक कळले त्यालाच वैराग्य साधता येते. या संकल्पना दूर कुठेतरी जाऊन अनुसरणे कुणाला मान्य नाही. त्याचा रोजच्या जगण्याशी संबंध आणता येतो का? हे जास्त मोलाचे.  तीच तृप्तता मला अध्यात्मचा नवा धडा देणारी असेल. - वेदांताचार्य राधे राधे महाराजबर्डेश्वर संस्थान, तरवाडी ता. नांदुरा, जि. बुलडाणा.

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक