शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आत्मविश्वासाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 08:39 IST

स्वत:मध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर आपण आपले ध्येय पूर्ण करू शकतो. आपल्या कर्तृत्वाने आपण सिद्ध होत असतो. स्वकर्तृत्वच माणसाला प्रेरणा देत असते.

स्वत:मध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर आपण आपले ध्येय पूर्ण करू शकतो. आपल्या कर्तृत्वाने आपण सिद्ध होत असतो. स्वकर्तृत्वच माणसाला प्रेरणा देत असते. स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींनी स्वकर्तृत्वाने समाजात आपले स्थान निर्माण केले आहे. स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आत्मविश्वास फार महत्त्वाचा आहे. आत्मविश्वासासाठी मनाची दुर्दम्य इच्छाशक्ती महत्त्वाची असते. मनुष्याच्या जीवनात अनेक कल्पना, अनेक विचार येतात. कधी चांगले, तर कधी वाईट विचार येतात. विचारांची साखळी तर मनात सुरूच असते; परंतु आपल्या विचारांवर आपण ठाम असले पाहिजे. माणसाने नेहमी मनाची विचारश्रेणी सकारात्मक ठेवावी. नकारात्मक विचारश्रेणी अपयशाकडे धाव होते. माणसाचा आत्मविश्वास प्रबळ असला की सकारात्मकतेत वाढ होते.

कोणताही विचार करताना आपला तोल जाऊ देऊ नये. आपण आपल्या विचारांवर ठाम असले पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या विचारांपासून कधीही विचलित झाले नाहीत. आपल्या जीवनात कितीही वाईट प्रसंग आले तरी आपल्या ध्येयापासून विचलित न होणे ही सकारात्मक विचारश्रेणी होय. माणसाचे काळीज फाटून जाईल एवढे दु:ख निर्माण झाले तरी आपल्या विचारांपासून, ध्येयापासून माघार न घेणारे अनेक शूरवीर-महापुरुष पाहता येतील. मनाच्या या तत्त्वनिष्ठ घडणीमुळे माणसाचा आत्मविकास होत असतो. बुद्धीचा आणि मनाचा एकसंवाद यातून दिसून येतो. मग आपल्या कर्तृत्वाचा गौरव आपणच पाहत असतो. म्हणजे ज्ञानस्वी सूर्याने मनावर मिळवलेल्या नव्या विजयाचे नवे शिल्पकार आपणच होतो. मनातील सूक्ष्म राक्षसी विचारांना ठार मारून, वाईट विचारांना छेद देऊन, आपणच आपल्या भूमिकेवर ठाम राहून, मनुष्य जातीचे स्वातंत्र्य भोगल्याचे सुख आपल्याला मिळते. म्हणजे मनास एक प्रकारचे पवित्र समाधान वाटू लागते. अशावेळी आपले अंत:करण उदात्त भावनांनी भरून येते. येथे आपल्या जीवनप्रवासाचा मार्ग सुखकर बनतो. कारण आपण आपल्या विचारश्रेणीने जगलो तर आपल्यालाच समाधान लाभते. तेच समाधान महत्त्वाचे असते. त्यासाठी एवढा खटाटोप असतो. मनाला इच्छाशक्तीच्या क्षितिजापुढे जाता येते आणि मन आत्मानंदाने न्हाऊन निघते.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक