शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
3
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
4
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
5
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
6
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
7
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
8
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
9
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
10
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
11
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
12
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
13
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
14
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
15
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
16
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
17
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
18
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
19
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
20
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आत्मविश्वासाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 08:39 IST

स्वत:मध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर आपण आपले ध्येय पूर्ण करू शकतो. आपल्या कर्तृत्वाने आपण सिद्ध होत असतो. स्वकर्तृत्वच माणसाला प्रेरणा देत असते.

स्वत:मध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर आपण आपले ध्येय पूर्ण करू शकतो. आपल्या कर्तृत्वाने आपण सिद्ध होत असतो. स्वकर्तृत्वच माणसाला प्रेरणा देत असते. स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींनी स्वकर्तृत्वाने समाजात आपले स्थान निर्माण केले आहे. स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आत्मविश्वास फार महत्त्वाचा आहे. आत्मविश्वासासाठी मनाची दुर्दम्य इच्छाशक्ती महत्त्वाची असते. मनुष्याच्या जीवनात अनेक कल्पना, अनेक विचार येतात. कधी चांगले, तर कधी वाईट विचार येतात. विचारांची साखळी तर मनात सुरूच असते; परंतु आपल्या विचारांवर आपण ठाम असले पाहिजे. माणसाने नेहमी मनाची विचारश्रेणी सकारात्मक ठेवावी. नकारात्मक विचारश्रेणी अपयशाकडे धाव होते. माणसाचा आत्मविश्वास प्रबळ असला की सकारात्मकतेत वाढ होते.

कोणताही विचार करताना आपला तोल जाऊ देऊ नये. आपण आपल्या विचारांवर ठाम असले पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या विचारांपासून कधीही विचलित झाले नाहीत. आपल्या जीवनात कितीही वाईट प्रसंग आले तरी आपल्या ध्येयापासून विचलित न होणे ही सकारात्मक विचारश्रेणी होय. माणसाचे काळीज फाटून जाईल एवढे दु:ख निर्माण झाले तरी आपल्या विचारांपासून, ध्येयापासून माघार न घेणारे अनेक शूरवीर-महापुरुष पाहता येतील. मनाच्या या तत्त्वनिष्ठ घडणीमुळे माणसाचा आत्मविकास होत असतो. बुद्धीचा आणि मनाचा एकसंवाद यातून दिसून येतो. मग आपल्या कर्तृत्वाचा गौरव आपणच पाहत असतो. म्हणजे ज्ञानस्वी सूर्याने मनावर मिळवलेल्या नव्या विजयाचे नवे शिल्पकार आपणच होतो. मनातील सूक्ष्म राक्षसी विचारांना ठार मारून, वाईट विचारांना छेद देऊन, आपणच आपल्या भूमिकेवर ठाम राहून, मनुष्य जातीचे स्वातंत्र्य भोगल्याचे सुख आपल्याला मिळते. म्हणजे मनास एक प्रकारचे पवित्र समाधान वाटू लागते. अशावेळी आपले अंत:करण उदात्त भावनांनी भरून येते. येथे आपल्या जीवनप्रवासाचा मार्ग सुखकर बनतो. कारण आपण आपल्या विचारश्रेणीने जगलो तर आपल्यालाच समाधान लाभते. तेच समाधान महत्त्वाचे असते. त्यासाठी एवढा खटाटोप असतो. मनाला इच्छाशक्तीच्या क्षितिजापुढे जाता येते आणि मन आत्मानंदाने न्हाऊन निघते.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक