शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

चांगल्या कर्माने जीवन बनवा सुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 07:26 IST

काही कर्माचे फळ तत्काळ मिळते, तर काही कर्माचे फळ उशिराने मिळते; पण कर्माचे फळ मिळतेच.

मानवी जीवनात प्रत्येकाला आपले कर्म भोगावे लागते. आपल्या केलेल्या कर्माची गती आपल्याला भोगावीच लागते. कारण कर्मगती फार गहन आहे. मानवी जीवन जगताना कोणी माणूस सुखी तर कोणी दु:खी, कष्टी आहे. कारण आपण लगेच म्हणतो त्याचे कर्म तसे असेल. जैसी करणी तैसी भरणी. या जगात प्रत्येकालाच आपल्या कर्मानुसार फळ मिळते. जो जसे कर्म करेल तसे त्याला फळ मिळेल. आपण सकाळी उठल्यापासून सायंकाळी झोपेपर्यंत जी क्रिया करतो ती सर्व कर्मेच होत. खाणेपिण्यापासून शारीरिक अथवा मानसिक सर्व क्रिया कर्मातच मोडतात. काही कर्माचे फळ तत्काळ मिळते, तर काही कर्माचे फळ उशिराने मिळते; पण कर्माचे फळ मिळतेच. या पृथ्वीतलावर परब्रह्म स्वरूप असणारे राम-कृष्ण इत्यादींनासुद्धा कर्मगतीनेच जावे लागले.

सृष्टीचा कायदा कर्मावरच अवलंबून आहे. कर्मरूपी कायद्यात वकिलांची चतुराई, जज्जांची बुद्धिमत्ता किंवा कोणाची मध्यस्थी चालत नाही. माणसाने जे केले ते त्याला भोगणे आहेच. धार्मिक पुराणात अनेक दाखले देण्यात आले आहेत. संत कबीर एका दोह्यात म्हणतात, ‘कबिरा तेरा पुण्यका जब तक हो भंडार। तब तक अवगुण माफ है करो गुनाह हजार’ कर्मसिद्धांत कुणालाही सुटत नाही. त्याच्यातून कोणाचीही सुटका नाही. त्यामुळे आपण नेहमी कर्म चांगले करावे. प्रत्येक मनुष्याने न्यायनीतीच्या मार्गाने चालावे. अविरतपणे सत्कर्म करीत राहावे. जे मिळेल त्यात समाधानी राहावे. सत्कर्मावरचा विश्वास कधी ढळू देऊ नये. आपण आपले कर्म करित राहावे. फळाची अपेक्षा ठेवू नये.

श्रीमद्भगवद्गीतेत म्हटले आहे, ‘कर्मण्येवाधिकारस्ते, मा फलेषु कदाचन’ कर्म करण्याचे कर्तव्य तू करत जा- त्याच्या फळाची अपेक्षा करू नको. चांगले कर्म करा- चांगली गती मिळेल. शुभ कर्म केले तर शुभ फळ मिळेल. अशुभ केले तर अशुभ फळ मिळेल. कर्म तर सुटूच शकत नाही. जन्मापासून मरेपर्यंत काही ना काही कर्म करावेच लागतात. आपली इच्छा असो अथवा नसो कर्म तर घडतातच. म्हणून सांगतो, चांगले कर्म करा व जीवन सुखी बनवा.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक