शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

चांगल्या कर्माने जीवन बनवा सुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 07:26 IST

काही कर्माचे फळ तत्काळ मिळते, तर काही कर्माचे फळ उशिराने मिळते; पण कर्माचे फळ मिळतेच.

मानवी जीवनात प्रत्येकाला आपले कर्म भोगावे लागते. आपल्या केलेल्या कर्माची गती आपल्याला भोगावीच लागते. कारण कर्मगती फार गहन आहे. मानवी जीवन जगताना कोणी माणूस सुखी तर कोणी दु:खी, कष्टी आहे. कारण आपण लगेच म्हणतो त्याचे कर्म तसे असेल. जैसी करणी तैसी भरणी. या जगात प्रत्येकालाच आपल्या कर्मानुसार फळ मिळते. जो जसे कर्म करेल तसे त्याला फळ मिळेल. आपण सकाळी उठल्यापासून सायंकाळी झोपेपर्यंत जी क्रिया करतो ती सर्व कर्मेच होत. खाणेपिण्यापासून शारीरिक अथवा मानसिक सर्व क्रिया कर्मातच मोडतात. काही कर्माचे फळ तत्काळ मिळते, तर काही कर्माचे फळ उशिराने मिळते; पण कर्माचे फळ मिळतेच. या पृथ्वीतलावर परब्रह्म स्वरूप असणारे राम-कृष्ण इत्यादींनासुद्धा कर्मगतीनेच जावे लागले.

सृष्टीचा कायदा कर्मावरच अवलंबून आहे. कर्मरूपी कायद्यात वकिलांची चतुराई, जज्जांची बुद्धिमत्ता किंवा कोणाची मध्यस्थी चालत नाही. माणसाने जे केले ते त्याला भोगणे आहेच. धार्मिक पुराणात अनेक दाखले देण्यात आले आहेत. संत कबीर एका दोह्यात म्हणतात, ‘कबिरा तेरा पुण्यका जब तक हो भंडार। तब तक अवगुण माफ है करो गुनाह हजार’ कर्मसिद्धांत कुणालाही सुटत नाही. त्याच्यातून कोणाचीही सुटका नाही. त्यामुळे आपण नेहमी कर्म चांगले करावे. प्रत्येक मनुष्याने न्यायनीतीच्या मार्गाने चालावे. अविरतपणे सत्कर्म करीत राहावे. जे मिळेल त्यात समाधानी राहावे. सत्कर्मावरचा विश्वास कधी ढळू देऊ नये. आपण आपले कर्म करित राहावे. फळाची अपेक्षा ठेवू नये.

श्रीमद्भगवद्गीतेत म्हटले आहे, ‘कर्मण्येवाधिकारस्ते, मा फलेषु कदाचन’ कर्म करण्याचे कर्तव्य तू करत जा- त्याच्या फळाची अपेक्षा करू नको. चांगले कर्म करा- चांगली गती मिळेल. शुभ कर्म केले तर शुभ फळ मिळेल. अशुभ केले तर अशुभ फळ मिळेल. कर्म तर सुटूच शकत नाही. जन्मापासून मरेपर्यंत काही ना काही कर्म करावेच लागतात. आपली इच्छा असो अथवा नसो कर्म तर घडतातच. म्हणून सांगतो, चांगले कर्म करा व जीवन सुखी बनवा.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक