शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्या कर्माने जीवन बनवा सुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 07:26 IST

काही कर्माचे फळ तत्काळ मिळते, तर काही कर्माचे फळ उशिराने मिळते; पण कर्माचे फळ मिळतेच.

मानवी जीवनात प्रत्येकाला आपले कर्म भोगावे लागते. आपल्या केलेल्या कर्माची गती आपल्याला भोगावीच लागते. कारण कर्मगती फार गहन आहे. मानवी जीवन जगताना कोणी माणूस सुखी तर कोणी दु:खी, कष्टी आहे. कारण आपण लगेच म्हणतो त्याचे कर्म तसे असेल. जैसी करणी तैसी भरणी. या जगात प्रत्येकालाच आपल्या कर्मानुसार फळ मिळते. जो जसे कर्म करेल तसे त्याला फळ मिळेल. आपण सकाळी उठल्यापासून सायंकाळी झोपेपर्यंत जी क्रिया करतो ती सर्व कर्मेच होत. खाणेपिण्यापासून शारीरिक अथवा मानसिक सर्व क्रिया कर्मातच मोडतात. काही कर्माचे फळ तत्काळ मिळते, तर काही कर्माचे फळ उशिराने मिळते; पण कर्माचे फळ मिळतेच. या पृथ्वीतलावर परब्रह्म स्वरूप असणारे राम-कृष्ण इत्यादींनासुद्धा कर्मगतीनेच जावे लागले.

सृष्टीचा कायदा कर्मावरच अवलंबून आहे. कर्मरूपी कायद्यात वकिलांची चतुराई, जज्जांची बुद्धिमत्ता किंवा कोणाची मध्यस्थी चालत नाही. माणसाने जे केले ते त्याला भोगणे आहेच. धार्मिक पुराणात अनेक दाखले देण्यात आले आहेत. संत कबीर एका दोह्यात म्हणतात, ‘कबिरा तेरा पुण्यका जब तक हो भंडार। तब तक अवगुण माफ है करो गुनाह हजार’ कर्मसिद्धांत कुणालाही सुटत नाही. त्याच्यातून कोणाचीही सुटका नाही. त्यामुळे आपण नेहमी कर्म चांगले करावे. प्रत्येक मनुष्याने न्यायनीतीच्या मार्गाने चालावे. अविरतपणे सत्कर्म करीत राहावे. जे मिळेल त्यात समाधानी राहावे. सत्कर्मावरचा विश्वास कधी ढळू देऊ नये. आपण आपले कर्म करित राहावे. फळाची अपेक्षा ठेवू नये.

श्रीमद्भगवद्गीतेत म्हटले आहे, ‘कर्मण्येवाधिकारस्ते, मा फलेषु कदाचन’ कर्म करण्याचे कर्तव्य तू करत जा- त्याच्या फळाची अपेक्षा करू नको. चांगले कर्म करा- चांगली गती मिळेल. शुभ कर्म केले तर शुभ फळ मिळेल. अशुभ केले तर अशुभ फळ मिळेल. कर्म तर सुटूच शकत नाही. जन्मापासून मरेपर्यंत काही ना काही कर्म करावेच लागतात. आपली इच्छा असो अथवा नसो कर्म तर घडतातच. म्हणून सांगतो, चांगले कर्म करा व जीवन सुखी बनवा.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक