शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

प्रसन्न मनामुळे सर्वकार्ये सिद्धीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 08:10 IST

ज्याचे मन अत्यंत प्रसन्न आहे, त्याचे सर्वकार्य सिद्धीस जाते. चैतन्यमय आनंद त्यांच्या मनात मावत नाही. चेहऱ्यावरचा भाव सहज टिपता येतो.

ज्याचे मन अत्यंत प्रसन्न आहे, त्याचे सर्वकार्य सिद्धीस जाते. चैतन्यमय आनंद त्यांच्या मनात मावत नाही. चेहऱ्यावरचा भाव सहज टिपता येतो. प्रसन्न मन असणाऱ्या माणसांचे बोलणे सहजतेने बाहेर पडते. त्यांच्या बोलण्याचा लोकांच्या मनावर चांगला परिणाम होतो. लोक त्यांच्या प्रभावाखाली येतात. त्यांच्या सान्निध्यात आल्यास जीवनाला काही नवा अर्थ मिळतो. जगण्याला नवा ध्यास मिळून जीवन सात्त्विकतेत जाते. चेहऱ्यावर तेजाची एक झलक असते. स्वत:मध्ये एक वेगळी ऊर्जा उत्पन्न झाल्यासारखे वाटते. अंतर्मनात एक नाद ऐकू येतो. तो आतला आवाज असतो. तोच आवाज ईश्वराचा असतो. तेज:पुंज चेहरा बनतो.

आपल्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येकाला त्या प्रकाशाची जाणीव होते. आपल्या मनात येणाऱ्या विचाराला कुठेतरी आळा बसतो. मनात प्रसन्नतेची हुबेहुब प्रतिकृती आकार घेते. त्यामुळे दृष्टी फिरेल तिकडे प्रसन्नतेचे मळे फुललेले दिसून येतात. सगळ्या समस्यांचे मन निवारण करते. प्रसन्न मनच सर्वसिद्धीस कारणीभूत असते. सिद्धी प्राप्त झाल्यास सर्व गोष्टी आपोआपच प्राप्त होतात. मनाचा आखाडा फार मोठा आहे. त्याला प्रसन्न करणे एवढे सोपे नसते; परंतु एकदा का ते प्रसन्न झाले की सर्वसुखाची अनुभूती येते. मनातील सर्वसंकल्प पूर्णत्वाला जातात. त्यामुळे समाजाला एक नवी दिशा देण्याचे काम करता येते. जीवनमुक्तीचा संदेश देता येतो. प्रसन्न मनामुळे असाध्य ते साध्य होते. मनाच्या प्रसन्नतेवरच जीवा-शिवाची भेट अवलंबून आहे. समाजामध्ये आदराचे स्थान निर्माण करणे हेही मनाच्या प्रसन्नतेवरच आहे. प्रसन्न मन असलेल्या व्यक्तीच्या सहवासात आल्यास अलौकिक आनंदाची प्राप्ती होते. उभ्या आयुष्यातली दु:खे गळून पडतात. दैवगतीच बदलून जाते.

प्रसन्न मनाची व्यक्ती कुणाचा द्वेष करत नाही. आपल्या आपल्या आनंदात मग्न असते. तो कुणालाही दोष देत नाही, कुणाच्या डोक्यावर ओझे टाकत नाही. त्यांच्या मनात कुठलेही विचार घोंगवत नाहीत. आपल्या ध्येयापासून विचलित होत नाही. सहनशीलता दया-क्षमा-शांती या गुणांची त्याच्या जवळ खाण असते. जीवनातला गुणार्थ त्याला कळलेला असतो. त्याची बुद्धी तल्लख असते. प्रसन्न मन असलेल्या व्यक्ती परिस्थितीला आनंदाने सामोरे जातात. जी परिस्थिती उद्भवेल तिचा सामना शांतपणे करतात. त्यांचा आत्मविश्वास दृढ असतो. त्यांचे कार्य सूर्यासारखे देदीप्यमान असते. प्रसन्न मन ठेवल्यास व असल्यास सर्वसुखाची बाग बहरून येते.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक