शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

प्रसन्न मनामुळे सर्वकार्ये सिद्धीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 08:10 IST

ज्याचे मन अत्यंत प्रसन्न आहे, त्याचे सर्वकार्य सिद्धीस जाते. चैतन्यमय आनंद त्यांच्या मनात मावत नाही. चेहऱ्यावरचा भाव सहज टिपता येतो.

ज्याचे मन अत्यंत प्रसन्न आहे, त्याचे सर्वकार्य सिद्धीस जाते. चैतन्यमय आनंद त्यांच्या मनात मावत नाही. चेहऱ्यावरचा भाव सहज टिपता येतो. प्रसन्न मन असणाऱ्या माणसांचे बोलणे सहजतेने बाहेर पडते. त्यांच्या बोलण्याचा लोकांच्या मनावर चांगला परिणाम होतो. लोक त्यांच्या प्रभावाखाली येतात. त्यांच्या सान्निध्यात आल्यास जीवनाला काही नवा अर्थ मिळतो. जगण्याला नवा ध्यास मिळून जीवन सात्त्विकतेत जाते. चेहऱ्यावर तेजाची एक झलक असते. स्वत:मध्ये एक वेगळी ऊर्जा उत्पन्न झाल्यासारखे वाटते. अंतर्मनात एक नाद ऐकू येतो. तो आतला आवाज असतो. तोच आवाज ईश्वराचा असतो. तेज:पुंज चेहरा बनतो.

आपल्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येकाला त्या प्रकाशाची जाणीव होते. आपल्या मनात येणाऱ्या विचाराला कुठेतरी आळा बसतो. मनात प्रसन्नतेची हुबेहुब प्रतिकृती आकार घेते. त्यामुळे दृष्टी फिरेल तिकडे प्रसन्नतेचे मळे फुललेले दिसून येतात. सगळ्या समस्यांचे मन निवारण करते. प्रसन्न मनच सर्वसिद्धीस कारणीभूत असते. सिद्धी प्राप्त झाल्यास सर्व गोष्टी आपोआपच प्राप्त होतात. मनाचा आखाडा फार मोठा आहे. त्याला प्रसन्न करणे एवढे सोपे नसते; परंतु एकदा का ते प्रसन्न झाले की सर्वसुखाची अनुभूती येते. मनातील सर्वसंकल्प पूर्णत्वाला जातात. त्यामुळे समाजाला एक नवी दिशा देण्याचे काम करता येते. जीवनमुक्तीचा संदेश देता येतो. प्रसन्न मनामुळे असाध्य ते साध्य होते. मनाच्या प्रसन्नतेवरच जीवा-शिवाची भेट अवलंबून आहे. समाजामध्ये आदराचे स्थान निर्माण करणे हेही मनाच्या प्रसन्नतेवरच आहे. प्रसन्न मन असलेल्या व्यक्तीच्या सहवासात आल्यास अलौकिक आनंदाची प्राप्ती होते. उभ्या आयुष्यातली दु:खे गळून पडतात. दैवगतीच बदलून जाते.

प्रसन्न मनाची व्यक्ती कुणाचा द्वेष करत नाही. आपल्या आपल्या आनंदात मग्न असते. तो कुणालाही दोष देत नाही, कुणाच्या डोक्यावर ओझे टाकत नाही. त्यांच्या मनात कुठलेही विचार घोंगवत नाहीत. आपल्या ध्येयापासून विचलित होत नाही. सहनशीलता दया-क्षमा-शांती या गुणांची त्याच्या जवळ खाण असते. जीवनातला गुणार्थ त्याला कळलेला असतो. त्याची बुद्धी तल्लख असते. प्रसन्न मन असलेल्या व्यक्ती परिस्थितीला आनंदाने सामोरे जातात. जी परिस्थिती उद्भवेल तिचा सामना शांतपणे करतात. त्यांचा आत्मविश्वास दृढ असतो. त्यांचे कार्य सूर्यासारखे देदीप्यमान असते. प्रसन्न मन ठेवल्यास व असल्यास सर्वसुखाची बाग बहरून येते.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक