शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

अध्यात्मिक; सगुण व निर्गुण भक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 13:16 IST

सगुण म्हणजे आपल्यासारखे देवाला रूप देणे व त्या रूपाची करता येईल तेवढी सेवा, पूजा करणे अथवा तनमनधनाने कायावाचामने आपले मन देवाच्या कीर्तन-भजनात नामस्मरणात तल्लीन करणे.

संकलन : बाबा मोहोडप्रिय मित्र -सगुण भक्ती म्हणजे काय ? हे आपण पत्राद्वारे विचारले आहे, याचे उत्तर माझ्या मते असे आहे की सगुण म्हणजे आपल्यासारखे देवाला रूप देणे व त्या रूपाची करता येईल तेवढी सेवा, पूजा करणे अथवा तनमनधनाने कायावाचामने आपले मन देवाच्या कीर्तन-भजनात नामस्मरणात तल्लीन करणे.आपण जे सात्त्विक अन्न सेवन करतो व जी जी प्रक्रिया जीवनाला अर्पण करतो ती ती आपण मानलेल्या देवाला भक्तिभावाने, मनाने, संकल्पाने, सगुण स्वरूपाने अर्पण करूनच मग प्रभूवर करणे. जरी तो बोलत नसला, जेवत नसला व झोपत नसला तरी तशी भावना करून देवाला अर्पण करणे व अन्न्य भावाने आपल्या प्रभूच्या निकट राहणे याला सगुण भक्ती म्हणतात.देवाच्या स्वरुपात आपली वृत्ती व आपले सर्वस्व विसरून जाणे, मी तू पणाचा भेदच नाहिसा करुन वृत्ती-शून्य अवस्था प्राप्त करणे याला निर्गुण उपासना म्हणतात. पण निर्गुण ही उपासनाच नसते. निर्गुणासाठी उपासक तरी कसा असणार? कारण, ज्या गुणानी ज्या भेदांनी निर्गुणाचे चिंतन करावे ते निर्गुणात संभवत नाहीत. म्हणून उपासना ही सगुणच संभवते व देव हा निर्गुणातूनच गुणाला आणावा लागतो. निर्गुण उपासना म्हणजे मनाला व बुद्धीला लीन करणे होय.नामजप महिमाप्रिय मित्र -आपली भेट झाली. त्यामुळे मनाला आनंद वाटला. आपल्या चेहऱ्यावर जी एक प्रकारची सात्विक छटा आलेली आहे त्यावरून असे वाटते की आपण ईश्वरनामाचा जप करीत असले पाहिजे व त्यामुळेच आपल्या सर्व इंद्रियांना अंतर्मुख होण्याची ओढ लागलेली आहे.बाह्य पदार्थाबद्दल आपले मन उदास झालेले दिसते आणि या पलीकडे आपणाला सहज समाधीचाही अभ्यास अनायासे घडेल व चित्त स्थिर होऊन अंतरंगातील भक्तिरसाचा स्वाद अमृतापेक्षाही गोड असा चाखावयास मिळेल.मला अनेक लोक असे विचारतात की ईश्वर- नामाच्या जपात काय फलश्रुती आहे? माझा असा अनुभव आहे की, साधक म्हणा वा सेवक म्हणा, जेव्हा अत्यंत श्रद्धायुक्त मनाने अंतरंगात नामस्मरण करीत राहतो व आपल्या मनातच विवेकरूपी विचाराने मानस ध्यान करतो तेव्हा त्याला असा सात्विक आनंद प्राप्त होतो व मन इंद्रिय स्थिर रूपाने आपल्या अधिष्ठायी देवतेचा सात्विक आनंद घेतो. पण एवढ्याने हे साधक संपत नाही तर ज्याचे नामस्मरण भक्त करतो त्याच्या गुणांचे त्याच्या चारित्र्याचे स्फुरण भाविकांच्या अंतरंगात खेळू लागते व तो तेच विचार बाहेर फेकू लागतो आणि साधनपूर्तीकडे जेव्हा वृत्ती धाव घेते तेव्हा आपल्या इष्टदेवतेचेच कार्य भक्ताकडून घडते व म्हणून भाविकजन त्या भक्ताला आपल्या देवाचा अवतार मानतात. श्रीसंत तुकाराम महाराजांचे वचन आहे - ‘तुका म्हणे अळी, झाली भिंगोटी सगळी’ हीच नामस्मरणाची धारणा आहे.पण बरेच लोक नामस्मरण घेण्याचे अगोदरपासूनच आपल्या पापाचे क्षालन व्हावे व आपल्याला आपली इच्छित वस्तू तातडीने प्राप्त व्हावी अशा अनेक वासनांनी आपले मन अस्थिर करतात. आणि मग ते आपल्या कामनेचेच भजन करू लागतात. म्हणून त्यांना देवाच्या नामस्मरणाचा आनंद मिळत नाही. जरी देव नामस्मरणाने पापे, तापे नाश करतो तरी भाविकांनी तसा संकल्प मनात मुळीच न ठेवता आपली वृत्ती नामस्मरणात रंगवावी. म्हणजे तुमच्याप्रमाणे सात्विक आनंद मिळणे स्वाभाविक आहे. असला हा अभ्यास भाविकांनी जरूर लक्षात घ्यावा, असे मला वाटते.- तुकड्यादास

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक