शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

परमार्थ साधनेत गुरुकृपा अत्यंत महत्त्वाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 08:21 IST

योगशक्तीने गूढ मनाला स्वच्छ करून त्याचा ताबा घेता येतो. आपला अहंकार काढून सर्व शक्ती गुरुकृपेतच आहे ही भावना या योगमार्गात महत्त्वाची ठरू शकते.

परमार्थ मार्गात शक्तिपान अथवा गुरुप्रसाद याला विशेष महत्त्व आहे. कोणताही मंत्र सिद्ध झाल्याशिवाय त्याची शक्ती उपयोगात येत नाही. परमार्थरूपी साधनेत एकदा उडी घेतली की त्याची नाव पैलतीराला लागतेच असे नाही. कारण गुरुकृपा फार महत्त्वाची आहे. गुरुपासून (मंत्रोपदेश) याचा अर्थ शक्तीचे दान असा आहे. ती एक शक्ती असते. शक्ती जागृत झाली की, ती सुषुम्नेच्या द्वारा ब्रह्मरंध्र्रापर्यंत जाते व तेथे असणाऱ्या शिवाचे व तिचे ऐक्य होते. हेच शक्ती जागृतीचे प्राप्तव्य. तेथेच त्याला परमानंदाचा लाभ होतो. परंतु हे सर्व गुरुकृपेशिवाय अशक्य आहे हा योग सर्व अधिकारी मनुष्याला येऊ शकतो. कर्म, जाती, अवस्था यांचा अडसर यात येत नाही. मनुष्याला एकदा गुरुकृपेने योगशक्ती प्राप्त झाली की, मनुष्याच्या मनावरचे दुष्ट संस्कार नष्ट होत असतात. कारण गूढ मन अथवा मनाचा अज्ञात भाग हा वासना संस्कारांचा बनलेला असतो. तो नाहीसा करण्यासाठी योगशक्ती महत्त्वाची आहे.

योगशक्तीने गूढ मनाला स्वच्छ करून त्याचा ताबा घेता येतो. आपला अहंकार काढून सर्व शक्ती गुरुकृपेतच आहे ही भावना या योगमार्गात महत्त्वाची ठरू शकते. गुरुकृपेने साधकाच्या मनातील शंका-कुशंका निघून जातात. मन स्वैरात्वाकडे धावत नाही. मनातील विकार, वासना नष्ट होऊन मन प्रसन्न राहते. एकदा गुरूंनी कृपाकटाक्षे न्हाळिले म्हणजे जे नव्हते ते होते. असाध्य ते साध्य होते. याचा अर्थ दिव्यज्ञानाचा जन्म होतो. पापाचा क्षय होऊन पुण्याची पहाट उजाडते. गुरुकृपेने वासनांचा नाश होऊन मनशुद्धीचा मार्ग खुला होतो. गुरुकृपेने योग साध्य झाल्यास मन, प्राण व शरीर याला संघटित करून एक दिव्यशक्ती प्राप्त होते. त्यामुळे आपले इष्टकार्य सिद्धीस जाते. योगमार्गाने गेल्यास साधकाला वेगवेगळे अनुभव येतात. मानवाला आपली योग्य जाणीव होते. चांगल्या विचारांनी आपले जीवन घालवतो. अध्यात्माशी एकरूप होतो व आपले जीवन धन्य करून घेतो. म्हणून गुरुकृपेशिवाय योग साध्य होत नाही.डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक