शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

परमार्थ साधनेत गुरुकृपा अत्यंत महत्त्वाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 08:21 IST

योगशक्तीने गूढ मनाला स्वच्छ करून त्याचा ताबा घेता येतो. आपला अहंकार काढून सर्व शक्ती गुरुकृपेतच आहे ही भावना या योगमार्गात महत्त्वाची ठरू शकते.

परमार्थ मार्गात शक्तिपान अथवा गुरुप्रसाद याला विशेष महत्त्व आहे. कोणताही मंत्र सिद्ध झाल्याशिवाय त्याची शक्ती उपयोगात येत नाही. परमार्थरूपी साधनेत एकदा उडी घेतली की त्याची नाव पैलतीराला लागतेच असे नाही. कारण गुरुकृपा फार महत्त्वाची आहे. गुरुपासून (मंत्रोपदेश) याचा अर्थ शक्तीचे दान असा आहे. ती एक शक्ती असते. शक्ती जागृत झाली की, ती सुषुम्नेच्या द्वारा ब्रह्मरंध्र्रापर्यंत जाते व तेथे असणाऱ्या शिवाचे व तिचे ऐक्य होते. हेच शक्ती जागृतीचे प्राप्तव्य. तेथेच त्याला परमानंदाचा लाभ होतो. परंतु हे सर्व गुरुकृपेशिवाय अशक्य आहे हा योग सर्व अधिकारी मनुष्याला येऊ शकतो. कर्म, जाती, अवस्था यांचा अडसर यात येत नाही. मनुष्याला एकदा गुरुकृपेने योगशक्ती प्राप्त झाली की, मनुष्याच्या मनावरचे दुष्ट संस्कार नष्ट होत असतात. कारण गूढ मन अथवा मनाचा अज्ञात भाग हा वासना संस्कारांचा बनलेला असतो. तो नाहीसा करण्यासाठी योगशक्ती महत्त्वाची आहे.

योगशक्तीने गूढ मनाला स्वच्छ करून त्याचा ताबा घेता येतो. आपला अहंकार काढून सर्व शक्ती गुरुकृपेतच आहे ही भावना या योगमार्गात महत्त्वाची ठरू शकते. गुरुकृपेने साधकाच्या मनातील शंका-कुशंका निघून जातात. मन स्वैरात्वाकडे धावत नाही. मनातील विकार, वासना नष्ट होऊन मन प्रसन्न राहते. एकदा गुरूंनी कृपाकटाक्षे न्हाळिले म्हणजे जे नव्हते ते होते. असाध्य ते साध्य होते. याचा अर्थ दिव्यज्ञानाचा जन्म होतो. पापाचा क्षय होऊन पुण्याची पहाट उजाडते. गुरुकृपेने वासनांचा नाश होऊन मनशुद्धीचा मार्ग खुला होतो. गुरुकृपेने योग साध्य झाल्यास मन, प्राण व शरीर याला संघटित करून एक दिव्यशक्ती प्राप्त होते. त्यामुळे आपले इष्टकार्य सिद्धीस जाते. योगमार्गाने गेल्यास साधकाला वेगवेगळे अनुभव येतात. मानवाला आपली योग्य जाणीव होते. चांगल्या विचारांनी आपले जीवन घालवतो. अध्यात्माशी एकरूप होतो व आपले जीवन धन्य करून घेतो. म्हणून गुरुकृपेशिवाय योग साध्य होत नाही.डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक