शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
4
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
5
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
6
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
7
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
8
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
9
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
10
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
11
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
12
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
13
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
14
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
15
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
16
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
17
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
18
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
19
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
20
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं

spiritual: साधकाला फक्त सद्गुरुच करू शकतात अंतर्मुख !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 12:19 IST

कर्म भोगण्यासाठी मनुष्य पुन: पुन: जन्म घेतो व नवी कर्मे तयार करतो. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी त्याने अंतर्मुख झाले पाहिजे, ध्यान करून आपल्या आत्म्याला पवित्र व सशक्त केले पाहिजे. साधकाला फक्त सद्गुरुच अंतर्मुख करू शकतात.

कर्म भोगण्यासाठी मनुष्य पुन: पुन: जन्म घेतो व नवी कर्मे तयार करतो. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी त्याने अंतर्मुख झाले पाहिजे, ध्यान करून आपल्या आत्म्याला पवित्र व सशक्त केले पाहिजे. साधकाला फक्त सद्गुरुच अंतर्मुख करू शकतात. त्यामुळे आत्मसाक्षात्कारासाठी सद्गुरुंनाच परमात्मा मानून, शरिरभाव पूर्णपणे विसरून समर्पित होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे साधकाची सद्गुरुंकडून ग्रहण करण्याची क्षमता वाढते. सद्गुरुंची भूमिका क्षणिक असते. ते साधकाची परमात्म्याशी जोडणी करून देतात पुढची साधना साधकालाच करून मोक्षाची स्थिती प्राप्त करायची असते.  गुरुसंस्कृती नसलेल्या पाश्चात्य समाजातील साधकांनी तसेच बुद्धिवादी साधकांनी गुरूंना कसे ओळखता येईल? तर त्यांच्या आभामंडळावरून ओळखावे. जे भावपूर्ण वृत्तीचे आहेत, अशांनी समाधिस्थ गुरूंच्या स्थानी जाऊन आत्मसाक्षात्कारासाठी कळवळून विनवणी करावी, ‘सेवा’ मोक्षाचे महाद्वार आहे.  गुरूंची शरीरे वेगळी असू शकतात पण गुरुतत्व एकच असते. 

 नाभिचक्राचा संबंध तृप्ती व समाधान यांच्याशी आहे. मनुष्याचे नाभीचक्र शुद्ध झाल्यावर त्याच्या आध्यात्मिक प्रगतीची सुरुवात होते. पती-पत्नीमधील, आईवडील आणि मुले, तसेच भावंडांमधील संबंध सौहार्दाचे प्रेमाचे राहिले तर मनुष्याच्या आध्यात्मिक प्रगतीत अडथळा येत नाही. आपण पूजा, मंदिरात नतमस्तक होणे किंवा दान करणे या आपल्या संस्कृतीतील महत्वाचे संस्कार गमावतो आहोत. कारण आपल्याकडे त्यासाठी ना वेळ आहे ना निरपेक्ष दान करण्याची वृत्ती. 

ध्यान हा एकच संस्कार आता शिल्लक राहिला आहे, जो मनुष्यसमाजात मनुष्यता आणू शकतो, त्याला एकत्र बांधून ठेवू शकतो. ज्ञानलालसा देखील ज्ञानप्राप्तीमध्ये बाधा बनते. सर्व भावना व्यक्ती, वस्तू आणि परिस्थितीशी निगडीत असतात. वस्तू, व्यक्ती आणि नातेसंबंधामध्ये अडकणे - मोक्ष आणि मुक्ती मध्ये बाधा होय. मोक्ष म्हणजे मुक्ती... भीतीपासून, चिंतेपासून, अगदी शारीरिक बंधनांतूनसुद्धा... मोक्षानंतर असतो केवळ आनंद. शब्दांमध्ये वर्णन न करता येणारा पण प्रत्येक क्षणी अनुभवता येणारा, जीवन व्यापून टाकणारा - आनंद. म्हणून मोक्ष आहे सुखी जीवनाची गुरुकिल्ली आणि अलौकिक यशाचा राजमार्ग.  मोक्ष... या कल्पनेबाबत सर्वसामान्य लोकांमध्ये प्रचलित असलेली एक समजूत अशी की मोक्ष हा माणसाला त्याच्या मृत्यूनंतरच मिळतो. पण ही समजूत चुकीची आहे. मोक्षासाठी मृत्यू व्हायची वाट बघावी लागत नाही. ‘याचि देही, याची डोळा’ हे ज्ञान होऊ शकतं. मात्र, त्यासाठी सेवा आणि समर्पण आवश्यक आहे.  सेवेमुळे मोक्ष आपल्या अंतरंगातच आहे व आपल्याच अस्तित्वाचाच एक अभिन्न भाग असल्याची जाणिव जागृती होते. जागृती येते तो क्षण महत्वाचा आहे. 

- प.पू. शंकरजी महाराज

मठाधिपती, जागृती-तपोवन आश्रम, खामगाव. 

टॅग्स :khamgaonखामगावspiritualअध्यात्मिक