शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
3
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
4
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
5
pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
6
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
7
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
8
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
9
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
10
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
11
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
12
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
13
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."
14
'परवानगी मिळाली नाही, १९६२ च्या युद्धात हवाई दलाचा वापर झाला असता तर...", चीनवर CDS यांचे मोठे विधान
15
Crime: स्मशानभूमीत महिलांच्या मृतदेहांसोबत...; तरुणाचे घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद, पाहून नागरिक हादरले!
16
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
17
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
18
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
19
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
20
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय

spiritual: साधकाला फक्त सद्गुरुच करू शकतात अंतर्मुख !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 12:19 IST

कर्म भोगण्यासाठी मनुष्य पुन: पुन: जन्म घेतो व नवी कर्मे तयार करतो. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी त्याने अंतर्मुख झाले पाहिजे, ध्यान करून आपल्या आत्म्याला पवित्र व सशक्त केले पाहिजे. साधकाला फक्त सद्गुरुच अंतर्मुख करू शकतात.

कर्म भोगण्यासाठी मनुष्य पुन: पुन: जन्म घेतो व नवी कर्मे तयार करतो. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी त्याने अंतर्मुख झाले पाहिजे, ध्यान करून आपल्या आत्म्याला पवित्र व सशक्त केले पाहिजे. साधकाला फक्त सद्गुरुच अंतर्मुख करू शकतात. त्यामुळे आत्मसाक्षात्कारासाठी सद्गुरुंनाच परमात्मा मानून, शरिरभाव पूर्णपणे विसरून समर्पित होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे साधकाची सद्गुरुंकडून ग्रहण करण्याची क्षमता वाढते. सद्गुरुंची भूमिका क्षणिक असते. ते साधकाची परमात्म्याशी जोडणी करून देतात पुढची साधना साधकालाच करून मोक्षाची स्थिती प्राप्त करायची असते.  गुरुसंस्कृती नसलेल्या पाश्चात्य समाजातील साधकांनी तसेच बुद्धिवादी साधकांनी गुरूंना कसे ओळखता येईल? तर त्यांच्या आभामंडळावरून ओळखावे. जे भावपूर्ण वृत्तीचे आहेत, अशांनी समाधिस्थ गुरूंच्या स्थानी जाऊन आत्मसाक्षात्कारासाठी कळवळून विनवणी करावी, ‘सेवा’ मोक्षाचे महाद्वार आहे.  गुरूंची शरीरे वेगळी असू शकतात पण गुरुतत्व एकच असते. 

 नाभिचक्राचा संबंध तृप्ती व समाधान यांच्याशी आहे. मनुष्याचे नाभीचक्र शुद्ध झाल्यावर त्याच्या आध्यात्मिक प्रगतीची सुरुवात होते. पती-पत्नीमधील, आईवडील आणि मुले, तसेच भावंडांमधील संबंध सौहार्दाचे प्रेमाचे राहिले तर मनुष्याच्या आध्यात्मिक प्रगतीत अडथळा येत नाही. आपण पूजा, मंदिरात नतमस्तक होणे किंवा दान करणे या आपल्या संस्कृतीतील महत्वाचे संस्कार गमावतो आहोत. कारण आपल्याकडे त्यासाठी ना वेळ आहे ना निरपेक्ष दान करण्याची वृत्ती. 

ध्यान हा एकच संस्कार आता शिल्लक राहिला आहे, जो मनुष्यसमाजात मनुष्यता आणू शकतो, त्याला एकत्र बांधून ठेवू शकतो. ज्ञानलालसा देखील ज्ञानप्राप्तीमध्ये बाधा बनते. सर्व भावना व्यक्ती, वस्तू आणि परिस्थितीशी निगडीत असतात. वस्तू, व्यक्ती आणि नातेसंबंधामध्ये अडकणे - मोक्ष आणि मुक्ती मध्ये बाधा होय. मोक्ष म्हणजे मुक्ती... भीतीपासून, चिंतेपासून, अगदी शारीरिक बंधनांतूनसुद्धा... मोक्षानंतर असतो केवळ आनंद. शब्दांमध्ये वर्णन न करता येणारा पण प्रत्येक क्षणी अनुभवता येणारा, जीवन व्यापून टाकणारा - आनंद. म्हणून मोक्ष आहे सुखी जीवनाची गुरुकिल्ली आणि अलौकिक यशाचा राजमार्ग.  मोक्ष... या कल्पनेबाबत सर्वसामान्य लोकांमध्ये प्रचलित असलेली एक समजूत अशी की मोक्ष हा माणसाला त्याच्या मृत्यूनंतरच मिळतो. पण ही समजूत चुकीची आहे. मोक्षासाठी मृत्यू व्हायची वाट बघावी लागत नाही. ‘याचि देही, याची डोळा’ हे ज्ञान होऊ शकतं. मात्र, त्यासाठी सेवा आणि समर्पण आवश्यक आहे.  सेवेमुळे मोक्ष आपल्या अंतरंगातच आहे व आपल्याच अस्तित्वाचाच एक अभिन्न भाग असल्याची जाणिव जागृती होते. जागृती येते तो क्षण महत्वाचा आहे. 

- प.पू. शंकरजी महाराज

मठाधिपती, जागृती-तपोवन आश्रम, खामगाव. 

टॅग्स :khamgaonखामगावspiritualअध्यात्मिक