शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

अध्यात्मिक : मोले घातले रडाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 03:00 IST

मनुष्याचा पृथ्वीतलावरचा प्रवास संपला की त्याच्या गुणकर्मास आठवून इष्टमित्र व नातेवाइकांस

मनुष्याचा पृथ्वीतलावरचा प्रवास संपला की त्याच्या गुणकर्मास आठवून इष्टमित्र व नातेवाइकांस अश्रू अनावर होतात. हे स्वाभाविकही आहे. ज्याच्याबरोबर खेळलो, बागडलो, सुख-दु:खाचे अनेक प्रसंग वाटून घेतले तो आयुष्याचा साथीदार जर निघून गेला तर दु:खाचा बांध फुटतोच; परंतु ज्याचे कुणीच नाही, ज्याने जगताना सुख-दु:ख कधी वाटून घेतले नाही, कुणाच्या हाकेला कधी धावून गेला नाही अशा माणसाचा मृत्यू झाल्यानंतर रडायचे कुणी? पण कुणीतरी गेल्यावर, कुणीतरी रडणे ही तर एक जगरहाटी आहे. म्हणून अशा एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतर जर एखाद्या सहृदयीच्या वतीने दोन-चार लोकांना पाच-पन्नास रुपये दिले तर ते गेलेल्या व्यक्तीविषयी किती रडणार? ज्या व्यक्तीविषयी ज्यांच्या मनात माया व संवेदना नाही, त्या व्यक्तीसाठी भाडोत्री रडणारे त्याच्या गुणकर्माला आठवून रडत नाहीत तर केवळ पाच-पन्नास रुपयांच्या मजुरीपुरते रडतात. ज्याचा संबंध आंतरिक भाव-भक्तीचा प्रेममय जिव्हाळा व कोरडा भाडोत्रीपणा यांच्याशी जोडताना संत तुकोबाराय म्हणतात,

मोले घातले रडाया, नाही आसू अन् मायातैसा भक्तिवाद काय, रंग बेगडीचा न्याय।वेठी धरल्या दावी भाव, मागे पळावयाचा पाव ।काजव्याच्या ज्योती, तुका म्हणे न जगे वाती ।

भक्तीच्या क्षेत्रात धूप, दीप, नैवेद्याचा सुकाळ दीपांची आरास व राजस सोहळ्याची बेगडी प्रवृत्ती असली तर त्या भक्ताची अवस्था मोलाने रडणाऱ्या संवेदनहीन माणसासारखी होते. तो हसतोही खोटे आणि बोलतोही खोटे. पण या खोट्यांच्या कपाळी गोटा मारण्याऐवजी त्यांच्याच भोवती अज्ञानी भक्तांची भाऊगर्दी होते. कधी नामगर्जनेच्या रूपाने, कधी प्रेमानंदाच्या उन्मादाने आज अनेक नवे कृष्णावतार आणि राधेमाँ निर्माण होत आहेत. अंतरंगात भावभक्तीचा फुलोरा फुलला पाहिजे तरच सत्य, ज्ञानानंद ईश्वरी ज्ञानाचा दिवा मन नावाच्या मंदिरात पेटतो. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक