शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

संतांचे मन स्वच्छ झऱ्यासारखे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 08:38 IST

संतपणा बाजारात मिळत नाही. संताचे लक्षण त्याच्या मनोवृत्तीनुसार ठरतात. रानावनात गिरिकंदरात फिरून संत होता येत नाही. धन-मान-पैसा यावरून संत कळत नाही. आकाश-पाताळात गेलात तरी संतत्त्व लक्षात येत नाही.

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

संतपणा बाजारात मिळत नाही. संताचे लक्षण त्याच्या मनोवृत्तीनुसार ठरतात. रानावनात गिरिकंदरात फिरून संत होता येत नाही. धन-मान-पैसा यावरून संत कळत नाही. आकाश-पाताळात गेलात तरी संतत्त्व लक्षात येत नाही. संत ईश्वराच्या आत्मसाक्षात्काराने भारावून गेलेले असतात. त्यांची जीवदशा बदलेली असते. ते मनाने सतत हरिचिंतनातच रत असतात. हरिनामाची आवड त्यांच्या मनात आहे ते प्रत्यक्षात ईश्वराचे रूपडे आहेत. त्यांच्याविषयी इतरांना ते कळत नाही. त्यासाठी संताचीच अनुभूती घ्यावी लागते. संताचे मन नितळ-स्वच्छ झऱ्यासारखे असते. ते कोणत्याही मोहात अडकत नाही. वर्तमान स्थितीत जगतात. जगत कल्याणाच्या कल्पना करतात. ते कशाचीही आशा न धरता सर्वस्व टाकून ईश्वराला शरण जातात. ते वर -वर आपल्यासारखे दिसतात; पण ते प्रत्यक्षात तसे नसतात.

त्यांचे मन ईश्वरातीत झालेले असते. आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक ताप निवारण करतात. व्यवहारात त्यांना अनुकूल अथवा प्रतिकूल परिस्थिती आली तरी ते समत्व ठेवतात. सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे ईश्वरतत्त्व त्यांच्या हाती असते.देव भक्तांचा अंकित असतो. संत झाल्याशिवाय संताचा महिमा कळत नाही. संत हे दीपस्तंभासारखे असतात. समाजाची नैतिकता, समाजाचे स्थैर्य टिकविण्यासाठी संताचा जन्म असतो. ‘जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे’ ही संताची मनोवृत्ती असते. जगत कल्याण हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असते. संताचे मन अथांग सागरासारखे विशाल असते. त्यांच्या कृपादृष्टीने माणूसपण येते. माणसाच्या आंतरिक वृत्तीत बदल होतो. ‘संतकृपा झाली इमारत फळा आली’ अशी संतवचने आहेत.

आपल्या मनात शंका-कुशंकाच येतात. संत त्या दूर करत मनाला सद्वृत्तीकडे परावृत्त करतात. मनाची अवस्था बदलून टाकतात. संतकृपेमुळे जीवनात स्थिरता येते. व्यावहारिक उन्नतीपासून आत्मिक उन्नतीचा मार्ग सुकर होतो. संतविचार मनुष्य जीवनात बदल घडवतात. धैर्यशील बनवतात. संतांची वचने सुमधुर, रसाळ व मृदू असतात. संताच्या विचारांचा मनावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे मनुष्यदेहाचे महत्त्व समजते. संसाराविषयी वीट येतो. ज्याच्यापासून हित आहे त्याची गोडी लागते. मन परिपक्व होते. म्हणून संताची कृपा मनुष्याला समाधान प्राप्त करून देतात. संताचे मन गंगेसारखे पावन असते.(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :spiritualअध्यात्मिक