शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

संतांचे मन स्वच्छ झऱ्यासारखे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 08:38 IST

संतपणा बाजारात मिळत नाही. संताचे लक्षण त्याच्या मनोवृत्तीनुसार ठरतात. रानावनात गिरिकंदरात फिरून संत होता येत नाही. धन-मान-पैसा यावरून संत कळत नाही. आकाश-पाताळात गेलात तरी संतत्त्व लक्षात येत नाही.

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

संतपणा बाजारात मिळत नाही. संताचे लक्षण त्याच्या मनोवृत्तीनुसार ठरतात. रानावनात गिरिकंदरात फिरून संत होता येत नाही. धन-मान-पैसा यावरून संत कळत नाही. आकाश-पाताळात गेलात तरी संतत्त्व लक्षात येत नाही. संत ईश्वराच्या आत्मसाक्षात्काराने भारावून गेलेले असतात. त्यांची जीवदशा बदलेली असते. ते मनाने सतत हरिचिंतनातच रत असतात. हरिनामाची आवड त्यांच्या मनात आहे ते प्रत्यक्षात ईश्वराचे रूपडे आहेत. त्यांच्याविषयी इतरांना ते कळत नाही. त्यासाठी संताचीच अनुभूती घ्यावी लागते. संताचे मन नितळ-स्वच्छ झऱ्यासारखे असते. ते कोणत्याही मोहात अडकत नाही. वर्तमान स्थितीत जगतात. जगत कल्याणाच्या कल्पना करतात. ते कशाचीही आशा न धरता सर्वस्व टाकून ईश्वराला शरण जातात. ते वर -वर आपल्यासारखे दिसतात; पण ते प्रत्यक्षात तसे नसतात.

त्यांचे मन ईश्वरातीत झालेले असते. आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक ताप निवारण करतात. व्यवहारात त्यांना अनुकूल अथवा प्रतिकूल परिस्थिती आली तरी ते समत्व ठेवतात. सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे ईश्वरतत्त्व त्यांच्या हाती असते.देव भक्तांचा अंकित असतो. संत झाल्याशिवाय संताचा महिमा कळत नाही. संत हे दीपस्तंभासारखे असतात. समाजाची नैतिकता, समाजाचे स्थैर्य टिकविण्यासाठी संताचा जन्म असतो. ‘जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे’ ही संताची मनोवृत्ती असते. जगत कल्याण हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असते. संताचे मन अथांग सागरासारखे विशाल असते. त्यांच्या कृपादृष्टीने माणूसपण येते. माणसाच्या आंतरिक वृत्तीत बदल होतो. ‘संतकृपा झाली इमारत फळा आली’ अशी संतवचने आहेत.

आपल्या मनात शंका-कुशंकाच येतात. संत त्या दूर करत मनाला सद्वृत्तीकडे परावृत्त करतात. मनाची अवस्था बदलून टाकतात. संतकृपेमुळे जीवनात स्थिरता येते. व्यावहारिक उन्नतीपासून आत्मिक उन्नतीचा मार्ग सुकर होतो. संतविचार मनुष्य जीवनात बदल घडवतात. धैर्यशील बनवतात. संतांची वचने सुमधुर, रसाळ व मृदू असतात. संताच्या विचारांचा मनावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे मनुष्यदेहाचे महत्त्व समजते. संसाराविषयी वीट येतो. ज्याच्यापासून हित आहे त्याची गोडी लागते. मन परिपक्व होते. म्हणून संताची कृपा मनुष्याला समाधान प्राप्त करून देतात. संताचे मन गंगेसारखे पावन असते.(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :spiritualअध्यात्मिक