शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
3
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
4
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
5
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
6
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
7
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
8
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
9
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
10
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
11
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
12
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
13
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
14
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
15
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
16
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
17
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
18
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
19
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
20
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्मिक - स्वर्ग आणि नरक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 03:58 IST

स्वर्ग आणि नरक ही काही भौगोलिक ठिकाणं नाहीयेत.

जेव्हा माणूस मरतो, तो आपले शरीर टाकतो आणि सोबत आपली सदसद्विवेकबुद्धीसुद्धा. पण मनाच्या स्मृतींचा हिस्सा मात्र तसाच कार्यरत राहतो आणि या शाबूत स्मृती मनोवृत्ती म्हणून कार्यरत असतात. या स्थितीत मृत व्यक्तीला निवड करणे शक्य नाही. कारण त्याने आपली सदसद्विवेकबुद्धी गमावली आहे. असे निवड स्वातंत्र्य नसल्यामुळे, जर त्याचा स्मृतिकोश दु:ख आणि क्लेशांनी भरलेला असेल, तर हे दु:ख लाखो पटींनी वाढू शकते. उदाहरणार्थ, या क्षणी जर तुम्ही रागावलात, तर तुम्ही तुमची सदसद्विवेकबुद्धी वापरून राग नियंत्रणात ठेवू शकता. पण जर ही सदसद्विवेकबुद्धी तुमच्याजवळ नसती तर हा राग उफाळून उद्वेग बनला असता. म्हणून जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, मग त्या क्षणापर्यंत जे काही त्यांच्या मनात साठलेलं असो, मृत्यूची ती शेवटची घटका अत्यंत महत्त्वाची असते. कारण जर आयुष्यभर त्यांची मनोदशा सामान्यत: आनंदी असेल तर मृत्यूपश्चात तीच स्थिती अनेक पटीने वाढते. आणि मनोदशा सामान्यत: क्लेशदायक स्थितीत असेल तर तेसुद्धा कित्येक पटीने वाढू शकते. एक व्यक्ती अत्यंत क्लेशकारक दशेत असेल तर आपण म्हणतो ही व्यक्ती नरकात गेली आहे. जर ती अत्यंत आनंदावस्थेत पोहोचली असेल तर आपण म्हणतो ती स्वर्गात गेली आहे.

स्वर्ग आणि नरक ही काही भौगोलिक ठिकाणं नाहीयेत. या अनुभवाच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत, विशेषकरून मृत्यूनंतर. योग परंपरेत एक सुंदर कथा आहे. एक चौऱ्यांशी वर्षांचा योगी होता आणि सर्वांना तो सांगत सुटला, ‘तुम्हाला माहीत आहे मी मरणार आहे आणि लवकरच मी स्वर्गात जाणार.’ इतर योग्यांनी त्याला विचारलं, ‘तुम्हाला कसं माहीत, तुम्ही स्वर्गात जाणार? देवाच्या मनात काय चाललंय, तुम्हाला माहीत आहे का?’ योगी म्हणाला, ‘देवाच्या मनात काय चाललंय त्याच्याशी मला काय करायचंय. माझ्या मनात मात्र काय चाललंय मला माहीत आहे.’ 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक