शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

Spiritual : गीता मंदिराचा गाभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 13:31 IST

माणसाला माणुसकी शिकविणारा ग्रंथ म्हणजे गीता. गीता हे परमार्थाचे रत्नभांडार आहे.

गगनं गगनाकारं सागर : सागरोपम:।गीतेश्वरी महाविश्वे गीतेश्वरीव विघते।।माणसाला माणुसकी शिकविणारा ग्रंथ म्हणजे गीता. गीता हे परमार्थाचे रत्नभांडार आहे. गीताधर्म म्हणजे विश्वधर्म असे विवेकानंद म्हणतात म. गांधीजीच्या मते -मानवाच्या साऱ्या समस्या गीतेमुळे सुटू शकतात. इमर्सन म्हणतो- गीता हा जगातील सर्वोत्कृष्ठ ग्रंथ आहे. मारुतीने जन्मल्याबरोबर सूर्यबिंब ग्रासायला उडी मारली. त्याप्रमाणे गीतेने जन्मल्याबरोबर इतकी उंच उडी मारली की, जागतिक साहित्य सारस्वतात तेवढी उडी कोणत्याच ग्रंथाने मारली नाही. भोगजीवनाचे भावजीवनात रुपांतर करणारा हा अलौकीक ग्रंथ आहे. ज्ञान, कर्म, ध्यान भक्ती हे गीता मंदिराचे ४ स्तंभ असून, शांती हा त्या मंदिराचा सुवर्णकलश आहे आणि अहकांरनाश हा गीतेच्या तत्वज्ञानाचा खºया अर्थाने पाया आहे.साºया वेदांचे सार महाभारतात महाभारताचे सार गीतेत आहे आणि गीतेचे सार नवव्या अध्यायात आहे. म्हणूनच चिंतकाचा चिंतामणी, ज्ञानियांचा शिरोमणी ज्ञानराज माऊलीनी संजीवन समाधी घेतली तेव्हा ९ वा अध्याय मांडीवर ठेवला होता. खºया अर्थाने गीतेचा ९ वा अध्याय म्हणजे गीता मंदिराचा गाभारा आहे.ह्या अध्यायात भगवान गोपालकृष्णानी आपण जग व प्राणीमात्राबद्दल विवेचन केले आहे. ज्ञानोपासना, भक्ती उपासना, स्वर्ग मृत्यूबद्दल सांगितले असून जे अनन्यनिष्ठ होवून माझे चिंतन करुन मला भजतात त्यांचा योगक्षेत्र मी चालवितो असे ब्रीदच स्पष्टच केले आहे.अन्यन्यास्थित यंतो माम ये जनाम पर्युपासते।तेषाम नित्याभियुक्तानाम, योग क्षेमं वहाम्यहम।।जीवनात न मिळालेली वस्तु मिळणे ह्याला योगं म्हणतात आणि मिळालेल्या वस्तूंचे रक्षण करणे ह्याला क्षेम म्हणतात. ही दोनही कामे भगवंत करतात फक्त अनन्यचित्त हा भाव भक्तांचा असावाभगवंतानी भक्तीचा आधार घेवून, सर्वांना दिलासा दिला आहे. भक्तीने जे साधते ते ज्ञानाने किंवा कर्माने साधत नाही. समर्पणाची भावना असेल तर त्यात प्रचंड शक्ती असते सुदाम्याचे मुठभर पोहे, रुक्मिनीच्या एका तुलसीपत्राचे महत्व भावात्मकदृष्ट्या श्रेष्ठ आहे.पत्रं पुष्पं फलं तोय, यो मे भक्त्या प्रयश्र्च्छती।तदहम भक्त्यु पºहंतम अश्वनामी प्रयतात्मन:।। (गीता ९/२६)म्हणूनच संत मांदियाळीचा संदेश हा ध्यानी घ्यावाकाम करते रहो, नाम जपते रहो।कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो ।। धृ।।सुखमे सोना नही, दु:खमे रोना नहीकर्म मार्ग मे निष्काम, बढते चलो ।। १।।लोग कहते है भगवान आते नहीद्रोपदी की तरह तुम बुलाते नहीभक्त प्रल्हाद जैसे पुकारा करोकृष्ण गोविंद गोपाल गाते चलो ।। २।।देव हा भावाचा भुकेला आहे. द्रव्याचा नाही. भक्तीचे माहेर असणारा हा अध्याय राजविद्या गुह्य योग स्पष्ट करतो.मन्मना भव मद्भक्तो, मधाजी मा. नमस्कुरु।मामेवैष्यासि युक्तवैवम आत्मानं मत्परायण:।। (गिता ९/३४)- ह.भ.प. डॉ. ज्ञानेश्वर मिरगे

टॅग्स :spiritualअध्यात्मिकliteratureसाहित्यcultureसांस्कृतिकAkolaअकोला