शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

...तेव्हाच आध्यात्मिक मार्ग तुमच्यासाठी महत्त्वाचा होतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 03:02 IST

तुम्ही जर तुमची ऊर्जा दहा वेगवेगळ्या ठिकाणी खर्ची घातली, तर साहजिकच तुम्ही काही साध्य करू शकणार नाही.

- सद्गुरू जग्गी वासुदेवएकदा तुम्ही प्रामाणिकपणे अध्यात्माच्या मार्गावर आलात, की तुम्ही त्याप्रति फक्त तीव्र इच्छा बाळगून भागणार नाही, तुम्ही झपाटलं पाहिजे. तुमच्यातील जीवन चैतन्याचं शिखर गाठायचं असेल, तर तुमच्यापाशी असलेली सर्व ऊर्जा एकाच दिशेने केंद्रित करणं आवश्यकआहे. तुम्ही जर तुमची ऊर्जा दहा वेगवेगळ्या ठिकाणी खर्ची घातली, तर साहजिकच तुम्ही काही साध्य करू शकणार नाही. म्हणूनच गुरू तुमची ती पोकळी गरजेनुसार भरून काढतात. पण तुम्हाला तुमची ऊर्जा दहा वेगवेगळ्या ठिकाणी खर्च करायची असेल, तर ते व्यर्थठरेल. म्हणून एकदा का तुम्ही प्रामाणिकपणे अध्यात्माच्या मार्गावर आलात, की झपाटून जा. तुमच्यासाठी दुसरं काहीही नाही. इतर सर्वकाही तुम्हाला तेथे पोहोचविण्यासाठी आहे. जेव्हा असं होतं, तेव्हाच आध्यात्मिक मार्ग तुमच्यासाठी महत्त्वाचा होतो. तसं नसेल, अध्यात्म म्हणजे तुमच्यासाठी केवळ एक दुय्यम दर्जाचा छंद असेल, जणू एक प्रकारचं आध्यात्मिक मनोरंजन. कारण वेगवेगळ्या प्रकारचे लोक वेगवेगळ्या प्रकारचं मनोरंजन शोधत असतात आणि काही लोक आध्यात्मिक मनोरंजनात वेळ घालवतात. तरीसुद्धा हे तुमचं निवडस्वातंत्र्य आहे. परंतु तुम्हाला ज्ञानप्राप्तीची खरीखुरी आस असेल, तेव्हा तुमचं संपूर्ण अस्तित्व फक्त एकाच दिशेने, एकाग्रतेने समर्पित असणं आवश्यक आहे. तुम्ही त्याने पूर्णपणे झपाटलं गेलं पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात उचलत असलेलं प्रत्येक पाऊल, तुम्हीकरत असलेली प्रत्येक कृती, तुमचा प्रत्येक श्वास एक आध्यात्मिक प्रक्रिया बनते, तेव्हा आयुष्यात कोणताच संघर्ष उरणार नाही. जेव्हा तुम्ही असं म्हणता, हा माझा आध्यात्मिक मार्ग आहे, ते माझं कुटुंब आहे, तो माझा व्यवसाय आहे, तेव्हा संघर्ष निर्माण होतो. पण मी जेखातो, ते केवळ सत्य जाणण्यासाठी, मी काही पितो, ते सत्याच्या शोधासाठी, मी जर काही कार्य करतो तर ते सत्य उमजण्यासाठी. असं असेल तर संघर्ष उद्भवणार नाही.