शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

ईश्वरप्राप्तीसाठी सामान्यांची सेवा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 14:19 IST

चातुर्मास विशेष... आध्यात्मिक

सोलापूर :  ‘माणसाच्या हृदयात ईश्वराचा वास असतो. हा संतांनी दिलेला ईश्वराचा पत्ता होय, म्हणून ईश्वरप्राप्तीसाठी सामान्यांची सेवा करा’, असे प्रतिपादन गौतममुनीजी यांनी केले. 

जीवनाला जर प्रगतीकडे घेऊन जायचे असेल तर सत्संग करणे गरजेचे आहे. संतांचे दर्शन म्हणजे जीवनातील सूर्योदय. संतांची वाणी म्हणजे अमृतच. संत आपल्या वाणीतून अमृत देऊन लोकांच्या ज्ञानाची तहान-भूक तृप्त करतात, म्हणून आनंदाने वाणीरुपी रस प्राशन करा. महापुरुषांचे आचार व विचार इतके प्रभावित असतात की जे अशक्य आहे ते शक्य करण्याची शक्ती त्यांच्या आशीर्वादात असते. 

संतांच्या सान्निध्यामुळे आपल्या जीवनाचा उत्कर्ष होतो. त्यांच्या दिव्य संदेशानुसार आपले आचरण ठेवल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आचार्य महाराज श्रीमद् रत्नप्रभ सुरीजी महाराज यांनी आजच्याच दिवशी ओसवाल समाजाची स्थापना केल्याचा इतिहास सांगितला. यावेळी सागरमुनीजी म्हणाले, देव, धर्म आणि गुरु हेच आपल्या जीवनाचे मुख्य तत्त्व होय. या तत्त्वांची आराधना केल्यास आपले जीवन उच्च शिखरावर पोहोचेल. सत्य-असत्य, लोक-देवलोक, सुदर्शन आदींबाबत त्यांनी विस्तृत विवेचन केले. 

संसार करा, व्यापार करा, धर्म करा, पण आपली बुद्धी जागृत ठेवून करा. आपल्या हातून रोजच्या दैनंदिन व्यवहारात दुष्कृत्ये घडणार नाहीत याची काळजी घ्या. धर्मात आळस नको, आळस झटकून धार्मिक कार्यास श्रद्धेने प्रारंभ करा. श्रद्धा हा माणसाचा स्थायीभाव आहे. परमार्थात तर श्रद्धेचे महत्त्व अपरंपार आहे. संतांच्या चरणी नितांत श्रद्धा असल्याशिवाय साधकांचे परमार्थात प्रगती होणे शक्य नाही.-  गुरु आनंद कमल कन्हैया, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक