शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

ईश्वरप्राप्तीसाठी सामान्यांची सेवा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 14:19 IST

चातुर्मास विशेष... आध्यात्मिक

सोलापूर :  ‘माणसाच्या हृदयात ईश्वराचा वास असतो. हा संतांनी दिलेला ईश्वराचा पत्ता होय, म्हणून ईश्वरप्राप्तीसाठी सामान्यांची सेवा करा’, असे प्रतिपादन गौतममुनीजी यांनी केले. 

जीवनाला जर प्रगतीकडे घेऊन जायचे असेल तर सत्संग करणे गरजेचे आहे. संतांचे दर्शन म्हणजे जीवनातील सूर्योदय. संतांची वाणी म्हणजे अमृतच. संत आपल्या वाणीतून अमृत देऊन लोकांच्या ज्ञानाची तहान-भूक तृप्त करतात, म्हणून आनंदाने वाणीरुपी रस प्राशन करा. महापुरुषांचे आचार व विचार इतके प्रभावित असतात की जे अशक्य आहे ते शक्य करण्याची शक्ती त्यांच्या आशीर्वादात असते. 

संतांच्या सान्निध्यामुळे आपल्या जीवनाचा उत्कर्ष होतो. त्यांच्या दिव्य संदेशानुसार आपले आचरण ठेवल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आचार्य महाराज श्रीमद् रत्नप्रभ सुरीजी महाराज यांनी आजच्याच दिवशी ओसवाल समाजाची स्थापना केल्याचा इतिहास सांगितला. यावेळी सागरमुनीजी म्हणाले, देव, धर्म आणि गुरु हेच आपल्या जीवनाचे मुख्य तत्त्व होय. या तत्त्वांची आराधना केल्यास आपले जीवन उच्च शिखरावर पोहोचेल. सत्य-असत्य, लोक-देवलोक, सुदर्शन आदींबाबत त्यांनी विस्तृत विवेचन केले. 

संसार करा, व्यापार करा, धर्म करा, पण आपली बुद्धी जागृत ठेवून करा. आपल्या हातून रोजच्या दैनंदिन व्यवहारात दुष्कृत्ये घडणार नाहीत याची काळजी घ्या. धर्मात आळस नको, आळस झटकून धार्मिक कार्यास श्रद्धेने प्रारंभ करा. श्रद्धा हा माणसाचा स्थायीभाव आहे. परमार्थात तर श्रद्धेचे महत्त्व अपरंपार आहे. संतांच्या चरणी नितांत श्रद्धा असल्याशिवाय साधकांचे परमार्थात प्रगती होणे शक्य नाही.-  गुरु आनंद कमल कन्हैया, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक