शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

ईश्वरप्राप्तीसाठी सामान्यांची सेवा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 14:19 IST

चातुर्मास विशेष... आध्यात्मिक

सोलापूर :  ‘माणसाच्या हृदयात ईश्वराचा वास असतो. हा संतांनी दिलेला ईश्वराचा पत्ता होय, म्हणून ईश्वरप्राप्तीसाठी सामान्यांची सेवा करा’, असे प्रतिपादन गौतममुनीजी यांनी केले. 

जीवनाला जर प्रगतीकडे घेऊन जायचे असेल तर सत्संग करणे गरजेचे आहे. संतांचे दर्शन म्हणजे जीवनातील सूर्योदय. संतांची वाणी म्हणजे अमृतच. संत आपल्या वाणीतून अमृत देऊन लोकांच्या ज्ञानाची तहान-भूक तृप्त करतात, म्हणून आनंदाने वाणीरुपी रस प्राशन करा. महापुरुषांचे आचार व विचार इतके प्रभावित असतात की जे अशक्य आहे ते शक्य करण्याची शक्ती त्यांच्या आशीर्वादात असते. 

संतांच्या सान्निध्यामुळे आपल्या जीवनाचा उत्कर्ष होतो. त्यांच्या दिव्य संदेशानुसार आपले आचरण ठेवल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आचार्य महाराज श्रीमद् रत्नप्रभ सुरीजी महाराज यांनी आजच्याच दिवशी ओसवाल समाजाची स्थापना केल्याचा इतिहास सांगितला. यावेळी सागरमुनीजी म्हणाले, देव, धर्म आणि गुरु हेच आपल्या जीवनाचे मुख्य तत्त्व होय. या तत्त्वांची आराधना केल्यास आपले जीवन उच्च शिखरावर पोहोचेल. सत्य-असत्य, लोक-देवलोक, सुदर्शन आदींबाबत त्यांनी विस्तृत विवेचन केले. 

संसार करा, व्यापार करा, धर्म करा, पण आपली बुद्धी जागृत ठेवून करा. आपल्या हातून रोजच्या दैनंदिन व्यवहारात दुष्कृत्ये घडणार नाहीत याची काळजी घ्या. धर्मात आळस नको, आळस झटकून धार्मिक कार्यास श्रद्धेने प्रारंभ करा. श्रद्धा हा माणसाचा स्थायीभाव आहे. परमार्थात तर श्रद्धेचे महत्त्व अपरंपार आहे. संतांच्या चरणी नितांत श्रद्धा असल्याशिवाय साधकांचे परमार्थात प्रगती होणे शक्य नाही.-  गुरु आनंद कमल कन्हैया, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक