शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

जीवनात आत्मानुभव महत्त्वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 13:48 IST

आत्मानुभवी संत आत्मरससेवनात मग्न असतो, तर तत्त्वज्ञानी मनुष्य आत्मानुभव हा बुद्धीच्या कक्षेत येत नसल्याने तो मनाचा खेळ आहे असे समजतो. मनुष्याच्या जीवनात आत्मानुभव महत्त्वाचा आहे. आत्मानुभव हा सांगता येतो.

आत्मानुभवी संत आत्मरससेवनात मग्न असतो, तर तत्त्वज्ञानी मनुष्य आत्मानुभव हा बुद्धीच्या कक्षेत येत नसल्याने तो मनाचा खेळ आहे असे समजतो. मनुष्याच्या जीवनात आत्मानुभव महत्त्वाचा आहे. आत्मानुभव हा सांगता येतो. आत्मानुभूती सांगता येत नाही. एखादा अनुभव मांडत असताना मनुष्य आपले विचार स्पष्ट करतो. पण आत्मानुभूती ही एक ईश्वरानुभूतीच असते. म्हणजे थोडक्यात, ‘मजमाजी संचरे मीचि म्हणोनि’ ही ती स्थिती आहे. तैसा ज्ञानरूप आत्मा। ज्ञानेची आपुली प्रमा। करीतसे साहें मा। म्हणजे ज्याला ज्ञान म्हणतात (मी ब्रह्म ही वृत्ती) तो सत्त्वाचा म्हणजे गुणाचाच भाग आहे. मी ब्रह्म आहे अशी त्याला जाणीव होते. संत ज्ञानेश्वरांच्या मते आत्मा देहाहून अगदी वेगळा आहे. देह पंचमहाभुतांचा बनला आहे. या सर्वांपेक्षा ‘आत्मा’ त्यात मुख्य भूमिका निभावतो. पण त्या आत्म्याचे स्पष्टीकरण मनावर अवलंबून आहे. कारण अल्पज्ञ, चैतन्य, ईश्वर, ब्रह्म, आत्मा हे सर्व मनावरच असते. मनाने जाणणे महत्त्वाचे आहे.

ईश्वरानुभूती, ब्रह्मानुभूती चैतन्याशी एकरूपता होणे मनावरच आहे. उदा. आत्म्याच्या सत्तेवर देह स्फुरत असताना अज्ञानी देह आहे म्हणून मी आहे असे समजतो, पण तसे नसते. ती आपली एक समजूत आहे. खरं तर भास, आभास, प्रकाश, अप्रकाश, आनंद, निरानंद ही सर्व मनाची वृत्ती आहे. ती वृत्ती सर्वरूपांनी नटलेली आहे. भगवान शिवापासून ब्रह्मदेवापर्यंत, देवतापासून मुनष्यापर्यंत, प्राणिमात्रापासून मुंगीपर्यंत एका मनाचा खेळ आहे. किंबहुना या विश्वात ‘मन’ स्फुरत असते. सर्वकार्य मनाद्वारे घडते. मनाची सत्ता सर्वांवर अंकुश ठेवते. मन परिपक्व असले की परमार्थमार्गाचा मार्ग सोपा होतो. स्वकर्माचरण, ध्यानधारणा इत्यादी साधने मनाशी निगडित आहे. मनाचा परिपोष, संगोपन महत्त्वाचे असते. कारण अग्नीचे दीपन, चंद्राचे जीवन, सूर्याचे नयन आणि आत्म्याचे मन याचाही विचार केला जातो. समजा, मनोबुद्ध्यादिकांचा प्रकाशक आत्मरूप होय. त्या आत्म्याचे ‘मन’ कष्टी-समष्टीचा खेळ असतो. त्यात मनाचा ठिकाणा लागत नाही. वेद मुके झाले पण मनाची स्पष्टता अजून कळली नाही. कारण कल्पनामय मनाचा विस्तारच फार मोठा आहे.

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक