शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आत्मानंदातच परमानंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 09:59 IST

मनाची स्थिरता असली की मनाची परिपक्वता झाली असे समजतो. त्रिगुणात्मकरूपाने संचार करणारे मन स्थिरतेकडे वळवणे फार महत्त्वाचे असते.

- स्वामी डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजमनाची स्थिरता असली की मनाची परिपक्वता झाली असे समजतो. त्रिगुणात्मकरूपाने संचार करणारे मन स्थिरतेकडे वळवणे फार महत्त्वाचे असते. स्थिर मनाला सदा पर्वकाळ असतो. प्राणिमात्राविषयी त्याचे मन स्थिर असते. त्याच्यापाशी शांती वास करते. दयावान मन म्हणून त्याची कीर्ती होते. त्या मनाला संसाराची चिंता राहात नाही. स्व-लीला, स्वल्पता त्याची त्याला कळते. ते मन बोलायला लागले की सर्वत्र आनंदाची निर्मिती होते. विवेक, वैराग्य, क्षमादी गुण त्याच्या अंगी वसलेले असतात. पण त्या मनाकडून निष्कर्मसिद्धी घडतात. योग-यागादी साधनावर त्यांनी आपला विजय प्राप्त केलेला असतो.

रिद्धी-सिद्धी त्या मनावर लोटांगण घालतात. त्या स्थिर मनात ईश्वरतत्त्वाचे अखंड चिंतन चालते. ते मन उदार, दयाळू असते. त्या मनाला प्रेमपान्हा पान्हावतो. सर्वांना आपल्या कुशीत कुर्वाळणारे ते मन असते. आंतर-बाह्य ते निर्मळ असते. सर्व दु:खाला पचवून टाकते. संसाररूपी सागरातून मुक्त होेते. सर्वसुखे त्याच्याजवळ असतात. युक्ती-मुक्ती त्याला लोटांगण घालतात. त्या मनाला सतत ईश्वरचिंतन घडते. त्याचेच त्याला ध्यान लागते. त्याला सतत त्याचीच आठवण होते. अंती त्या मनाचे विश्रांतिस्थानी भगवंताचे चरणच आहे. संत तुकाराम महाराजही हेच म्हणतात, ‘‘आता कोठे धावे मन। तुमचे चरण देखिलिया।।’’ त्या मनाला पुन्हा कुठेही जायची गरज नाही.

ते ह्या ईशतत्त्वाशी एकल्प होते. मग कुठेही त्याला भटकता येत नाही. त्या स्थिर मनाचे हे लक्षण आहे. मग त्या मनाला भजनात-कीर्तनात-सर्वदूर संतोष होतो. हरिजागरणात ते मन स्वयंसिद्ध प्रकट होते. निजात्म स्थितीचा त्याला बोध होतो. परमार्थ हा त्याचा भाव बनतो. स्थिर मनच हे सर्व करू शकते. म्हणून श्रीमद्भागवत गीतेतही अर्जुनाला स्थिर मनाचे महत्त्व भगवंताने सांगितले आहे. कलियुगात स्थिर मन करणे महत्त्वाचे आहे. कारण स्थिर ‘मन’ आत्मानंदाची निर्मिती करते. म्हणून म्हणावेसे वाटते आत्मानंदातच परमानंद आहे.(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :spiritualअध्यात्मिक