शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

आत्मानंदातच परमानंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 09:59 IST

मनाची स्थिरता असली की मनाची परिपक्वता झाली असे समजतो. त्रिगुणात्मकरूपाने संचार करणारे मन स्थिरतेकडे वळवणे फार महत्त्वाचे असते.

- स्वामी डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजमनाची स्थिरता असली की मनाची परिपक्वता झाली असे समजतो. त्रिगुणात्मकरूपाने संचार करणारे मन स्थिरतेकडे वळवणे फार महत्त्वाचे असते. स्थिर मनाला सदा पर्वकाळ असतो. प्राणिमात्राविषयी त्याचे मन स्थिर असते. त्याच्यापाशी शांती वास करते. दयावान मन म्हणून त्याची कीर्ती होते. त्या मनाला संसाराची चिंता राहात नाही. स्व-लीला, स्वल्पता त्याची त्याला कळते. ते मन बोलायला लागले की सर्वत्र आनंदाची निर्मिती होते. विवेक, वैराग्य, क्षमादी गुण त्याच्या अंगी वसलेले असतात. पण त्या मनाकडून निष्कर्मसिद्धी घडतात. योग-यागादी साधनावर त्यांनी आपला विजय प्राप्त केलेला असतो.

रिद्धी-सिद्धी त्या मनावर लोटांगण घालतात. त्या स्थिर मनात ईश्वरतत्त्वाचे अखंड चिंतन चालते. ते मन उदार, दयाळू असते. त्या मनाला प्रेमपान्हा पान्हावतो. सर्वांना आपल्या कुशीत कुर्वाळणारे ते मन असते. आंतर-बाह्य ते निर्मळ असते. सर्व दु:खाला पचवून टाकते. संसाररूपी सागरातून मुक्त होेते. सर्वसुखे त्याच्याजवळ असतात. युक्ती-मुक्ती त्याला लोटांगण घालतात. त्या मनाला सतत ईश्वरचिंतन घडते. त्याचेच त्याला ध्यान लागते. त्याला सतत त्याचीच आठवण होते. अंती त्या मनाचे विश्रांतिस्थानी भगवंताचे चरणच आहे. संत तुकाराम महाराजही हेच म्हणतात, ‘‘आता कोठे धावे मन। तुमचे चरण देखिलिया।।’’ त्या मनाला पुन्हा कुठेही जायची गरज नाही.

ते ह्या ईशतत्त्वाशी एकल्प होते. मग कुठेही त्याला भटकता येत नाही. त्या स्थिर मनाचे हे लक्षण आहे. मग त्या मनाला भजनात-कीर्तनात-सर्वदूर संतोष होतो. हरिजागरणात ते मन स्वयंसिद्ध प्रकट होते. निजात्म स्थितीचा त्याला बोध होतो. परमार्थ हा त्याचा भाव बनतो. स्थिर मनच हे सर्व करू शकते. म्हणून श्रीमद्भागवत गीतेतही अर्जुनाला स्थिर मनाचे महत्त्व भगवंताने सांगितले आहे. कलियुगात स्थिर मन करणे महत्त्वाचे आहे. कारण स्थिर ‘मन’ आत्मानंदाची निर्मिती करते. म्हणून म्हणावेसे वाटते आत्मानंदातच परमानंद आहे.(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :spiritualअध्यात्मिक