शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
4
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
5
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
6
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
7
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
8
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
9
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
10
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
11
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
12
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
13
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
14
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
15
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

साधकाची दशा उदास असावी (भज गोविन्दम्-३)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 17:26 IST

स्त्री देह म्हणजे स्तन अथवा नाभीदेशच का? ते शरीर पाहून मोहावेशाने त्यात तू गुंतून पडू नकोस. कारण हा देह, हे अवयव म्हणजे मांस पेशींचा समूह आहे. याविषयी लोभ बाळगू नकोस. शरीर म्हणजे मांसाचा गोळा आहे. या देहाकाराला भुलू नकोस. मनात वारंवार विचार कर. उगाच विकारवश होऊ नकोस. गोविंदाचे स्मरण कर, भज गोविंदम्...भज गोविंदम्.

          नारीस्तनभरनाभिनिवेशं मिथ्यामायामोहावेशम्         एतन्मांसवसादिविकारं मनसि विचारय वारंवारम॥४श्री शंकराचार्य म्हणतात, अरे मूढा ! स्त्री देह म्हणजे स्तन अथवा नाभीदेशच का? ते शरीर पाहून मोहावेशाने त्यात तू गुंतून पडू नकोस. कारण हा देह, हे अवयव म्हणजे मांस पेशींचा समूह आहे. याविषयी लोभ बाळगू नकोस. शरीर म्हणजे मांसाचा गोळा आहे. या देहाकाराला भुलू नकोस. मनात वारंवार विचार कर. उगाच विकारवश होऊ नकोस. गोविंदाचे स्मरण कर, भज गोविंदम्...भज गोविंदम्.

    जगदगुरु श्री. संत तुकाराम महाराजांचा एक मोठा मार्मिक अभंग आहे. ते म्हणतात, 

साधकाची दशा उदास असावी ।उपाधि नसावी अंतर्बाह्य ॥१॥

एकांति लोकांती स्त्रियांसी भाषण।

प्राण गेल्या जाण बोलू नये ॥२॥

   स्त्रीदेह वाईट नाही, तर त्या देहाविषयी असणारी आसक्ती वाईट आहे. खरे तर प्रत्येक साधकाच्या साधनेत बाधा निर्माण करीत असते. असे अनुभव प्रत्येक संताच्या जीवनात आलेले आहेत. तुकाराम महाराजांच्या जीवनात काही कंटकांनी मुद्दाम जाणीवपूर्वक विघ्न आणले होते. एका स्त्रीला महाराजांकडे पाठविले. पण महाराजांनी संयमाने तिला उत्तर दिले. जाई वो माते न करि सायास । आम्ही विष्णुदास तसे नव्हो ॥ आतून आसक्ति जर गेली तर स्त्री काही करीत नाही. कारण कोणताही विषय अगोदर अंत:करणात उत्पन्न होतो. मग तो इंद्रियाद्वारे तो विषयापर्यंत जाउन भोग भोगीत असतो. विषय अंत:करणातच उत्पन्न झाला नाही तर तो भोगण्याची ईच्छाच निर्माण होत नाही. संत म्हणतात,

निद्रितापासी / साप तसी उर्वसी ॥ स्त्री ही तपस्वी योग्याचीही तपश्चर्या भंग करते. हे खरे नाही तर तिच्याविषयी असणारी भोगवासना, आसक्ती तपश्चर्या भंग करते. श्री. संत एकनाथ महाराज भागवतात फार छान सांगतात. 

वेदे न करिता प्रेरणा । विषयावरी सहज वासना । स्वभावे सकळ जना । सदा जाण सर्वांसी ॥२०८॥मांससवना मद्यपाना । मिथुनीभूत मैथुना । ये अर्थी सर्व जना । तीव्र वासना सर्वदा ॥२०९॥आवरावाया योनिभ्रष्टा ।मैथुनी विवाह प्रतिष्ठा । लावूनिया निजनिष्ठा । वर्ण वरिष्ठा नेमिले ॥२१९॥ब्राह्मण जाता रजकीपासी । ते तव कडू न लागे त्यासी । रजक जाता ब्राह्मणीपासी । तिखट त्यासी तेन लगे ॥२२० ॥अ. ५वा॥

  नातिस्नेह: प्रसंग? वा कर्तव्य: क्वापि केनचित।...(अ.१७/श्लो.५२)यावर नाथ महाराज भाष्य करतांना म्हणतात, 

संसारदु:खाचे मूळ । स्त्रिआसक्तिच जाण केवळ । स्त्रिलोभाचे जेथ प्रबळ बळ । दु:ख सकळ त्यापासी ॥५४७॥ आसक्ति आणि स्नेहसूत्र । या दोन्हीपासाव द:खासी पात्र । संसारी नर होताती ॥५४८॥   दु:खाचे खरे मुळ म्हणजे आसक्तिच आहे. म्हणून आसक्तिचा नाश करायला सांगितले आहे. पंचदशीमध्ये दोन सृष्टी सांगितल्या आहेत. पहिली-ईश स्रुष्टि  आणि दुसरी जीव सृष्टी. जीव स्रुष्टी ही जीव सृष्टीच्या दु:खाला कारणीभूत असते. ईश निर्मित स्त्री दु:ख देत नाही तर ‘माझी’ स्त्री  दु:ख  देते. माझेपणा आला की दु:ख होते. आसक्ति जर जावी असे वाटत असेल तर जन्म, जरा, व्याधि, दु:ख दोषानुदर्शनं॥ वैराग्याशिवाय आसक्ती जाणार नाही. वैराग्य हवे असेल तर भोगातील दोष कळावेत. दोष कळाले की वैराग्य होत असते. भर्त्रुहरी शतकामध्ये श्लोक आहे तो म्हणतो. 

स्तनौ मांसग्रन्थी कनककलशावित्युपमितौ,     मुखं श्लेष्मागारं तदपि च शशांकेन तुलितम ।स्त्रवन्मूत्रक्लिन्नं करिवरकरस्पर्धि जघन-       महो निन्द्यं रुपं कविजन विशेषर्गुक्रुतम ॥

   स्तन म्हणजे मांसाचे गोळे त्याला कलश, लाळेने भरलेले तोंड. त्याला मुखचंद्रमा आणि मुत्राने भरलेल्या जांघांना गजेंद्राची सोंड  म्हणणाºया कवीच्या अद्न्याचा विस्मय होतो.   स्त्री ही उपभोग्य वस्तू म्हणून अवमूल्यन केले. परंतु श्री शंकराचार्यांनी त्याला सुंदर अर्थ प्रदान केला आहे. स्त्री म्हणजे माता, देवी या रुपात ते पाहातात. अन्न्पुर्णास्तोत्र, भवान्यष्टक, देव्यपराधक्षमापन आदी स्तोत्र ही उत्तम उदाहारणे आहेत. गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि॥ किंवा कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ॥ मातेचा अशा प्रकारे गौरव क्वचितच कुठे केला गेला असेल. स्त्री ही भोगवस्तू नसुन ती पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर काकणभर पुढेच आहे. खरे तर पुरुषापेक्षा तीची शक्ती जास्त म्हणावी लागेल. कारण ती जन्म देउ शकते. उत्पत्ती करु शकते.  स्त्रिशिवाय पुरुष अपूर्ण आहे. शिव-शक्ति दोन नाहीत.  पुरुष-प्रक्रुती दोन नाहीत. (अनुभवामृताचे पहिले पाच श्लोक वाचावेत) दया, क्षमा, ध्रुती आदी सात शक्ती विभुतींचे गीतेतील वर्णन वाचले की मग स्त्रिची महती लक्षात येते. आज स्त्रि जीवनाचे जे विकृत चित्रण केले गेले आहे, त्याला काही अंशी स्त्रियासुध्दा जबाबदार आहेत. विक्रुतीलाच संस्क्रुती म्हणण्याची वाईट पद्धत अस्तित्वात आली आहे. नग्नतेलाच सौदर्य समजण्यात धन्यता मानतात. विकृत जाहिरातींना स्त्रियांनी प्रतिसाद न देता मर्यादेतील सौंदर्याचा सन्मान केला पाहिजे, असे जर होइल तर समाजात सुखी -समाधानी समाज अस्तित्वात येइल आणि गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट होईल. 

- भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डिले गुरुकुल भागावाताश्रम ,चिचोंडी(पा)ता. नगर