शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

संत सावता माळी : कर्मयोगी संत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 14:14 IST

कर्तव्य आणि कर्म करीत राहणे ही खरी परमेश्वरभक्ती होय.

कर्तव्य आणि कर्म करीत राहणे ही खरी परमेश्वरभक्ती होय. अशी प्रवृत्ती मार्गी शिकवण देणारे संत श्री सावता महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. अवघिया पुरते वोसंडले पात्र।अधिकार सर्वत्र वाहे येथे।अशा उदार आणि सर्वसमावेशक तत्त्वावर संत ज्ञानदेव, नामदेवांच्या  भागवत धर्माची वारकरी संप्रदायाची उभारणी झाली. या संप्रदायातील सर्व संत अध्यात्मनिष्ठच होते. त्यांचे कार्य तर नि:संशय धार्मिक स्वरूपाचे होते, तरी देखील त्यांच्या तत्त्वनिरूपणात आणि भक्तीपर वाङ्मयात सामाजिक आशय ओतप्रोत भरून राहिला आहे. किंबहुना या सामाजिक आशयाच्या आगळेपणामुळेच वारकरी पंथाला इतकी लोकप्रियता लाभली आहे. ज्यांना सामाजिक जीवनातील जडत्त्व व अप्प्रवृत्ती नष्ट करून त्याला नवे वळण देण्याची आवश्यकता वाटली, त्यांनी आपल्या सर्व सिद्धीसाठी धार्मिक प्रबोधनाची कास धरली.

उदरनिर्वाहासाठी दिवसभर काबाडकष्ट करीत राहण्यापलीकडे ज्यांच्या जीवनाला काही अर्थ नव्हता, अशा सर्वसामान्य लोकांत मराठी संतांनी उच्चतर जीवनाची आकांक्षा निर्माण केली. त्यामुळे त्यांच्या आध्यात्मिक व नैतिक उन्नतीचा मार्ग खुला झाला. समग्र जीवन उजळून टाकणाºया विशुद्ध धर्मभावनेचे स्वरूप त्यांनी सर्व थरातील लोकांना निरूपण कीर्तनाद्वारे विशद करून सांगितले. त्यात एकांगीपणा कुठेही नव्हता. ज्ञानेश्वर, नामदेव, गोरा कुंभार, सावता माळी, जनाबाई, चोखामेळा इत्यादी संतांनी अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि नीती यांची सुरेख सांगड घातली. अंधश्रद्धा, कर्मठपणा, क्षुद्रदेवता भक्ती, दांभिकता व बाह्य अवडंबर यावर त्यांनी कुणाचीही भीडमुर्वत न ठेवता नि:शंकपणे कोरडे ओढले. त्याचबरोबर अंत:शुद्धी, तत्त्वचिंतन, सदाचरण, निर्भयता, नीतिमत्ता, आत्मोपम्य भाव, सहिष्णुता इत्यादी गुणांचा त्यांनी जागर केला. जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखवताना वारकरी संतांनी दोन गोष्टींचे आवर्जून भान राखले. ईश्वर प्राप्तीसाठी योगयाग, जपतप, तीर्थव्रत यांसारख्या साधनांची बिल्कूल आवश्यकता नाही.योग याग तप धर्मसोपे वर्म नाम घेतातीर्थव्रत दान अष्टांगयांचा पांग आम्हा नकोसंत सावता माळी यांचे विचार अर्थपूर्ण आहेत. पोटापाण्याचा व्यवसाय हा प्रत्येकालाच करावा लागतो. तसे पाहिले तर हे संत उत्तम कारागीर होते. स्वत:चा व्यवसाय सांभाळून त्यांनी परमात्मा उपासना चालू ठेवली होती. 

सावता माळी हे मराठी संत मंडळातील एक ज्येष्ठ संत. अरण भेंड हे त्यांचे गाव पंढरपूरहून जवळ असले तरी ते आडबाजूलाच आहे. अशा दूरगावी राहून सुद्धा त्यांनी आपला पिढीजात व्यवसाय नेकीने सांभाळून वारकरी पंथाचे, धार्मिक प्रबोधनाचे कार्य त्यांनी केले. सावता महाराजांची निश्चित जन्मतिथी व जन्मवेळ मिळत नाही. मात्र अरण गावी ११७२ (इ.स. १२५०) मध्ये नांगिताबाई यांच्या पोटी महाराजांचा जन्म झाला. नामदेव महाराजांनी सावतोबांच्या जन्माविषयी पुढील अभंग रचला आहे. धन्य ते अरण, रत्नाचीच खाणजन्माला निधान, सावता तोसावता सागर प्रेमाचसे आगरघेतला अवतार माळ्या घरीअशा थोर पुण्यात्म्याचा शेवटही तितकाच गोड आहे. प्रात:काळी स्नान करुन त्यांनी दैनंदिन यथाविधी के ली. आणि आपला देह अनंतात विलीन केला, असं म्हटले जाते. 

दीपस्तंभ एकाच जागी स्थिर  राहून अंधाºया रात्री लोकांना अचूक मार्गदर्शन करतो. धैर्याने वाटचाल करण्याचे प्रोत्साहन देतो. एकाच जागी स्थिर राहून विठ्ठल भक्तीचा दीप त्यांनी उजळला. त्या सावता महाराजांचे पावन चरित्र, प्रेरक व्यक्तिमत्त्व आणि प्रभावी कर्तृत्व याची उज्ज्वल यशोगाथा ही तुमची आमची लाख मोलाची ठेव ठरली. - धोंडीराम सातव(लेखक केंद्रीय विद्यालयात शिक्षक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक