शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

अज्ञानाचे दु:ख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 01:14 IST

जेव्हा तुम्ही तुमच्या श्रद्धा, धारणा प्रणालींच्या आधारे देव, आत्मा आणि परमात्माबद्दल स्वत:लाच फसवत असता, ज्या गोष्टी तुम्ही कधीही पाहिल्या किंवा अनुभवल्या नाहीत तेव्हा सत्य जाणण्याची उत्सुकता असणार नाही. म्हणूनच ते ज्ञात नाही.

- सद्गुरू जग्गी वासुदेवबहुतांश लोकांना अज्ञानात असण्याच्या दु:खाची जाणीव नसते. कारण ते स्वत:ला त्यांच्या श्रद्धा, धारणांमध्ये झाकून घेतात. श्रद्धा प्रणाली तुम्हाला कधीच मुक्त करीत नाहीत; पण त्या तुम्हाला तात्पुरता दिलासा देतात. ‘‘अरे! देव माझी काळजी वाहतो आहे, माझ्या वडिलांचा आत्मा माझी काळजी घेत आहे.’’ अशा श्रद्धा तुम्हाला शांत झोपी घालतील, पण त्या तुम्हाला मुक्त करणार नाहीत. त्या फक्त तुम्हाला अडकवून ठेवतील. तुम्ही मुक्ती शोधत असाल, तर तुम्ही प्रत्येक गोष्ट डोळे उघडून, ती जशी आहे तशी बघणे आवश्यक आहे. पण वास्तविक पाहता, तुम्हाला स्वत:बद्दल काहीच माहीत नाही. तुम्ही जर या वास्तविकतेचा स्वीकार केलात आणि तुम्ही कोण आहात, तुम्ही कोठून आलात आणि कोठे जाणार आहात, हे माहिती नसण्याचे दु:ख तुम्ही जाणता, आणि तरीही तुम्ही तुमचा जीवनक्र म चालूच ठेवता, जणू सारे काही ठीक आहे, तर ती एक भयंकर गोष्ट ठरेल. ही वास्तविकता जर तुमच्यात भिनली आणि तुम्हाला छळायला लागली, तर मग तुम्ही ते सत्य जाणून घ्यायला, काहीही करायला तयार व्हाल. आणि मग ज्ञान फार दूर नसेल; कारण ते इथे याच ठिकाणी आहे. ते सत्य जर पर्वतावर बसले असेल, तर मग तुम्हाला पर्वत चढता येतो की नाही हा प्रश्न उद्भवेल. पण जेव्हा ते इथेच उपलब्ध आहे, तेंव्हा तुम्हाला ते मिळू शकेल का नाही हा प्रश्नच नाही. मुद्दा इतकाच आहे की तुम्हाला ते हवे आहे का आणि किती हवे आहे एवढंच. तुम्हाला नेमकं काय हवं आहे तेसुद्धा तुम्हाला माहीत असायला हवं. त्यासाठी ज्ञान लागतं. ज्ञान मिळविण्यासाठी तशी लालसा लागते. जेव्हा तुम्ही तुमच्या श्रद्धा, धारणा प्रणालींच्या आधारे देव, आत्मा आणि परमात्माबद्दल स्वत:लाच फसवत असता, ज्या गोष्टी तुम्ही कधीही पाहिल्या किंवा अनुभवल्या नाहीत तेव्हा सत्य जाणण्याची उत्सुकता असणार नाही. म्हणूनच ते ज्ञात नाही.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक