शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

साधू,संतांचे जीवन खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 13:43 IST

सर्वसामान्य माणूस आणि संत किंवा महापुरुष यांच्या जीवन जगण्याच्या पध्दतीत फरक आहे. संतांचे जीवन खडतर असते ते काटेकोरपणाने नियमांचे पालन करतात म्हणूनच निश्चित केलेल्या ध्येयापर्यंंत पोहोचतात.

अहमदनगर : सर्वसामान्य माणूस आणि संत किंवा महापुरुष यांच्या जीवन जगण्याच्या पध्दतीत फरक आहे. संतांचे जीवन खडतर असते ते काटेकोरपणाने नियमांचे पालन करतात म्हणूनच निश्चित केलेल्या ध्येयापर्यंंत पोहोचतात. साधूंना पूर्व जीवनाचा परिचय देण्याची अनुमती नसते. साधूंचे जीवन संयमधारी असते. स्वत: खडतर जीवन जगून सर्वसामान्यांच्या आयुष्यात प्रकाश देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. भौतिक सुखापासून ते सतत दूर असतात. सर्वसंग परित्याग करुन संत, साधू आत्मिक सुखाचा मार्ग शोधतात. जीवनात आचारसंहिता पाळली तरच जीवन योग्य मार्गावर चालते. साधू संतांच्या आचार-विचारावर नेहमी चर्चा होते. सम्यक दृष्टीने साधू जीवन जगतात, जीवनात शिस्त पाहिजे म्हणजे आयुष्याचा खरा अर्थ समजतो.सर्वसामान्य माणूस जर धर्मानुसार वागला तर समाज बदलण्यास वेळ लागणार नाही. संतांच्या जीवनाचा अभ्यास करा. मगच त्यांच्या संदर्भानुसार वागायचा प्रयत्न करा. संत आणि सामान्य माणूस यांच्यात जमीन अस्मानचे अंतर आहे. नराचा नारायण व्हायचा असेल तर जीवनाला शिस्त लावलीच पाहिजे. कठोर साधनेशिवाय कोणतीही ध्येयपूर्ती, लक्ष प्राप्ती होत नाही. मनावर ताबा ठेवण्यातच प्रत्येकाचे हीत आहे. चातुर्मासात साधना केल्यामुळे मानसिक शांतता लाभते. आत्मिक व शरीर शुध्दीचा अनुभव मिळतो. साधूंवर काही बंधने असतात. भोगाने नाही तर योगाने माणूस यशस्वी जीवनाकडे वाटचाल करु शकतो. प्रत्येकाने प्रत्येक संकटाचा खंबीर मुकाबला करुन जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लाच घेण्याची प्रवृत्ती नष्ट झाली तर भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट होईल. कायदा पायदळी तुडविण्याच्या वृत्तीला अटकाव घालण्याची गरज आहे.महापुरुषांचे जीवन प्रेरणादायी असतेश्रावण महिना हा वर्षातील अतिशय चांगला महिना आहे. कधी पाऊस, कधी ऊन अशी निसर्गाची रुपे आपणास पाहता येतात. श्रावण महिना सर्वांनाच आकर्षित करतो. सूर्य अंधाराला दूर करतो. फुल देखील सुगंध देते. महापुरुषांचे जीवन देखील प्रेरणादायी असते. समाजाला योग्य मार्गावर चालण्यासाठी मदत करते.महापुरुष लोककल्याणाचे कार्य करतात. स्व.पू श्री अमृतकंवरजी महाराजांचे श्रीरामपूरशी जवळचे नाते आहे. त्यांनी अंतिम श्वास श्रीरामपूरात घेतला. त्यांचा स्वभाव श्रीफळ (नारळ) प्रमाणे होता. वरुन कडकपण आतून मऊ, पौष्टीक होता. त्यांच्या वास्तव्याने श्रीरामपूर पुण्यभूमी ठरली आहे.श्रीरामपूरमध्ये पू.श्री. अमृतकंवरजी व पू.श्री. सुशिलकंवरजी यांनी धर्मजागृतीची पताका फडकविली आहे. ही पताका आजही फडकत असून समाज धर्म आराधनेत पुढे आहे. येथे जैन धर्माच्या विविध कार्यात त्यांचे योगदान होते. ग्रंथालय निर्मिती ही एक मोठी देणगी आहे. स्व.पू.श्री. अमलोकऋषिजी, आचार्य देवनंदजी महाराज यांचे कार्य सुध्दा समाजाकरीता अमूल्य आहे. संतांना तीन वेळा नमन करण्यामागे नम्रता हा गुण आहे. संतांच्या अनंत ज्ञानास चारित्र्यमय जीवनास नेहमी नमन केले जाते. लहान संतांना नमन करण्यात मोठेपणा आहे. जीवनात शिस्त असावी, श्रध्दाभाव असावा. सर्वांनाच समानतेची वागणूक महापुरुषांकडून दिली जाते. इमारत नीट उभी रहावयाची असेल तर पाया भक्कम असावा लागतो. तसेच जीवनात वरिष्ठांची साथ, सावली असेल तर कोणत्याही प्रसंगाशी धैर्याने तोंड देता येते. संतांचे विचारांचे जीवनात आचरण करा.- पू. श्री. सन्मती महाराज 

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर