शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

भगवंत भक्तीत अर्पणवृत्ती महत्त्वाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 05:11 IST

भगवंतांची प्राप्ती व्हावी, हा सदभाव सर्वांगात एकदा का सळसळू लागला की, मर्त्य विश्वातल्या कुठल्याही स्वरूपातल्या गोष्टींविषयी अथवा पदार्थांविषयी मनात आसक्तीच निर्माण होत नाही.

- वामन देशपांडेफलेच्छेतून निर्माण झालेली कर्मासक्ती माणसाला कर्मबंधनात अडकविते. सत्यच जर सांगायचे झाले, तर कर्मबंधनातून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कर्म आणि कर्मफल त्याविषयी वाटणारी विलक्षण ममता आणि तीव्र स्वरूपातली आसक्ती पूर्णपणे नष्ट होणे अत्यंत आवश्यक आहे. भगवंतांची प्राप्ती व्हावी, हा सदभाव सर्वांगात एकदा का सळसळू लागला की, मर्त्य विश्वातल्या कुठल्याही स्वरूपातल्या गोष्टींविषयी अथवा पदार्थांविषयी मनात आसक्तीच निर्माण होत नाही. स्वत:च्या देहाविषयी ममता सहजरीत्या लोप पावते. ही सर्वोत्तम साधनावस्था असते. अशा उच्चावस्थेला एकदा का साधक पोहोचला की, तो करीत असलेले प्रत्येक कर्म मग तो भगवंतांचे स्मरण करीत, त्याच्याच साक्षीने करतो आणि पूर्ण झालेले कर्म, फलासहित भगवंतांनाच अर्पण करतो. फक्त भगवंतांचीच उपासना करतो, अशा श्रेष्ठ साधकांविषयी आपले मत प्रकट करताना म्हणतात की,तेषामहं समुद्धता मृत्युसंसारसागरात।भवामि नचिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम।।पार्था, ज्या साधक भक्तांचे अवघे चित्त माझ्यातच पूर्णपणे गुंतलेले असते, जे केवळ माझ्याच नामसाधनेत गुंतलेले असतात, अशा श्रेष्ठ परमभक्तांना मृत्यूसम असलेल्या संसारसागरातून अलगदपणे उचलून घेत, मोक्षमार्गावर आणून सोडतो. जन्ममृत्यूच्या चक्रातूनसोडवितो. त्याचा योग्यसमयी उद्धार करतो. त्यांना मोक्षाचे वरदान देतो. भगवंतांप्रती एकदा का अर्पणवृत्ती निर्माण झाली, भगवंतांसाठी प्रत्येक कर्म करण्यास मन उद्युक्त झाले की, भक्तियोग खऱ्या अर्थाने सिद्ध होतो. अशा परमभक्तीतच साधकाची साधना पूर्णत्वाला पोहोचते. देहबुद्धी संपुष्टात आली की, आत्मसाक्षीने जगणे सुरू होते. सर्वस्वाचा त्याग करून आयुष्य भगवंतभक्तीत एकदा का तन्मय झाले की, भक्ती साधनेला विलक्षण गती प्राप्त होते.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक