शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
4
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
5
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
6
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
7
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
8
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
9
चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
10
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
11
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
12
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
13
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
14
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
15
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
16
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
17
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
18
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
19
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
20
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा

भगवंत भक्तीत अर्पणवृत्ती महत्त्वाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 05:11 IST

भगवंतांची प्राप्ती व्हावी, हा सदभाव सर्वांगात एकदा का सळसळू लागला की, मर्त्य विश्वातल्या कुठल्याही स्वरूपातल्या गोष्टींविषयी अथवा पदार्थांविषयी मनात आसक्तीच निर्माण होत नाही.

- वामन देशपांडेफलेच्छेतून निर्माण झालेली कर्मासक्ती माणसाला कर्मबंधनात अडकविते. सत्यच जर सांगायचे झाले, तर कर्मबंधनातून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कर्म आणि कर्मफल त्याविषयी वाटणारी विलक्षण ममता आणि तीव्र स्वरूपातली आसक्ती पूर्णपणे नष्ट होणे अत्यंत आवश्यक आहे. भगवंतांची प्राप्ती व्हावी, हा सदभाव सर्वांगात एकदा का सळसळू लागला की, मर्त्य विश्वातल्या कुठल्याही स्वरूपातल्या गोष्टींविषयी अथवा पदार्थांविषयी मनात आसक्तीच निर्माण होत नाही. स्वत:च्या देहाविषयी ममता सहजरीत्या लोप पावते. ही सर्वोत्तम साधनावस्था असते. अशा उच्चावस्थेला एकदा का साधक पोहोचला की, तो करीत असलेले प्रत्येक कर्म मग तो भगवंतांचे स्मरण करीत, त्याच्याच साक्षीने करतो आणि पूर्ण झालेले कर्म, फलासहित भगवंतांनाच अर्पण करतो. फक्त भगवंतांचीच उपासना करतो, अशा श्रेष्ठ साधकांविषयी आपले मत प्रकट करताना म्हणतात की,तेषामहं समुद्धता मृत्युसंसारसागरात।भवामि नचिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम।।पार्था, ज्या साधक भक्तांचे अवघे चित्त माझ्यातच पूर्णपणे गुंतलेले असते, जे केवळ माझ्याच नामसाधनेत गुंतलेले असतात, अशा श्रेष्ठ परमभक्तांना मृत्यूसम असलेल्या संसारसागरातून अलगदपणे उचलून घेत, मोक्षमार्गावर आणून सोडतो. जन्ममृत्यूच्या चक्रातूनसोडवितो. त्याचा योग्यसमयी उद्धार करतो. त्यांना मोक्षाचे वरदान देतो. भगवंतांप्रती एकदा का अर्पणवृत्ती निर्माण झाली, भगवंतांसाठी प्रत्येक कर्म करण्यास मन उद्युक्त झाले की, भक्तियोग खऱ्या अर्थाने सिद्ध होतो. अशा परमभक्तीतच साधकाची साधना पूर्णत्वाला पोहोचते. देहबुद्धी संपुष्टात आली की, आत्मसाक्षीने जगणे सुरू होते. सर्वस्वाचा त्याग करून आयुष्य भगवंतभक्तीत एकदा का तन्मय झाले की, भक्ती साधनेला विलक्षण गती प्राप्त होते.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक