शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

आनंद तरंग - एक प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 04:34 IST

चांगल्या-वाईट सर्व घटनांच्या पाठीमागे आपलेच कर्म कार्य करीत असते.

नीता ब्रह्मकुमारीचांगल्या-वाईट सर्व घटनांच्या पाठीमागे आपलेच कर्म कार्य करीत असते. फार वर्षांपूर्वीची सत्यघटना. अहमदाबादला एक विद्वान, अनुभवी सत्र न्यायाधीश होते. वेदांचे गाढे अभ्यासी व कर्मसिद्धांतावर जबर विश्वास ठेवणारे. एका गावी नदीकाठी गेले असताना एक माणूस पळताना व हातात सुरा घेतलेला दुसरा माणूस त्याचा पाठलाग करताना त्यांनी पाहिले. सुरा हातात असलेल्या माणसाने पळणाऱ्या माणसाच्या पाठीत सुरा खुपसला व तो माणूस तत्काळ खाली पडून मेला. खुनी माणसाचा चेहरा जज्ज साहेबांनी बरोबर बघितला होता. काही महिन्यानंतर तो खुनाचा खटला कोर्टात दाखल झाला व तो त्याच न्यायाधीशांसमोर; परंतु आरोपीच्या पिंजºयात उभा असणारा संशयित कोणी दुसरीच व्यक्ती आहे हे त्यांच्या लक्षात येते. पुढे पोलिसांनी आरोपीविरुद्ध इतका सबळ पुरावा दाखल केला की आरोपीच खरा खुनी होता, असे साक्षी पुराव्याने सिद्ध झाले व आरोपीला फाशीची शिक्षा दिली.

सत्य परिस्थिती जाणणाºया न्यायाधीशांनी आरोपीला आपल्या चेंबरमध्ये खासगीत बोलण्यासाठी पाचारण केले. आरोपी रडू लागला व वारंवार म्हणू लागला की ‘मी निर्दोष आहे. पोलिसांनी माझ्याविरुद्ध जबरदस्त पुरावे सादर करून कायद्याने मला खुनी ठरवले.’ न्यायाधीशांनी संमती दिली; परंतु कायदा हा पुराव्याच्या आधारे चालतो हे त्याला समजावले; परंतु परमेश्वरनिर्मित कर्म-कायद्यात कधीही गफलत होऊ शकत नाही हेही तितकेच खरे. त्यांनी त्या आरोपीला विचारले, ‘ईश्वराला स्मरून सांग, भूतकाळात तू कोणाचा खून केला होतास का ?’ आरोपीने रडत सांगितले की पूर्वी एक सोडून दोन खून केले होते; परंतु पैशांच्या जोरावर नामवंत हुशार वकील नेमल्याने दोन्ही वेळा सुटका झाली; पण या वेळी आर्थिक स्थिती खालावल्याने तो तसे करू शकला नाही व पूर्ण निर्दोष असूनही तोच खुनी म्हणून सिद्ध करण्यात आला. तात्पर्य हे की कर्म करण्यापूर्वी विचार तपासून घ्यावेत.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक