शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
2
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
3
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
4
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
5
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
6
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
7
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
8
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
9
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
10
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
11
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
12
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
13
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
14
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
15
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
16
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
17
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
18
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
19
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
20
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
Daily Top 2Weekly Top 5

काय भुललासी वरलिया रंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 04:31 IST

बाह्य उपकरणांनी देहाचा शृंगार होईल. परंतु सद्गुण आणि चातुर्य अंगी बाणवल्यास आपलं अंत:करण पवित्र व सुंदर होईल.

- मोहनबुवा रामदासीचातुर्ये शृंगारे अंतर। वस्त्रे शृंगारे शरीर। दोहीमध्ये कोण थोर बरे पाहा। । द . १४ स . ६ - १८वस्त्र , दागदागिने, स्नो-पावडर, ब्युटीपार्लरमधील विविध उपकरणे यांच्या साहाय्याने या नाशिवंत देहास सजवून कृत्रिमरीत्या सौंदर्य संपादन करण्याची सध्या स्पर्धा लागली आहे. बाह्य उपकरणांनी देहाचा शृंगार होईल. परंतु सद्गुण आणि चातुर्य अंगी बाणवल्यास आपलं अंत:करण पवित्र व सुंदर होईल. पवित्र अंत:करणाची माणसं सर्वत्र लोकप्रिय होतात हे आपण पाहतोच. सुंदर दिसण्यापेक्षाही सुंदर असणं अधिक महत्त्वाचं आहे. परंतु बहुसंख्य माणसं व्यक्तीच्या बहिरंगावरून व्यक्ती थोर किंवा लहान हे ठरवतात?, हे बरे नव्हे. स्वामी विवेकानंद शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेसाठी गेले. भगवी वस्त्रं परिधान केलेला हा कोण विचित्र भिकारी आहे, म्हणून लोकांकडून त्यांना भरपूर त्रास सहन करावा लागला. परंतु संधी मिळताच त्यांनी आपली विद्वत्ता, अंत:करणाची व्यापकता जगाला दाखवून दिली आणि सारे जग त्यांना ओळखू लागले. अंतरंगातील गुण हे सद्गुुणी माणसं व्यक्त होतात, तेव्हाच इतरांना समजतात. पूर्वी महात्मा गांधी, विनोबा, लोकमान्य टिळक, सावरकर, तर विद्यमान बाबा आमटे आदी विभूतींनी ‘साधी राहणी उच्च विचारसरणी’ हे तत्त्व अंगीकारलं. श्रीसमर्थ रामदास स्वामी स्वत: फक्त कौपीन परिधान करून राहत असत. तरीही त्यांच्या विचारांनी ते समृद्ध असत, हे ध्यानात घ्यावयास हवे. म्हणून ते आपणास विचारतात की बहिरंग सजवणं आणि अंतरंग सजवणं यात श्रेष्ठ काय, याचा विचार करा. अर्थात, सद्गुुण संपादन करून आपले व्यक्तिमत्त्व विकसित करा आणि यशस्वी व्हा. याच अर्थाचा संत चोखामेळा यांचा अभंग प्रसिद्ध आहे.ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा। नदी डोंगी परि जल नोहे डोंगा। चोख डोंगी परि भाव नोहे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ।।

टॅग्स :spiritualअध्यात्मिक