शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

काय भुललासी वरलिया रंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 04:31 IST

बाह्य उपकरणांनी देहाचा शृंगार होईल. परंतु सद्गुण आणि चातुर्य अंगी बाणवल्यास आपलं अंत:करण पवित्र व सुंदर होईल.

- मोहनबुवा रामदासीचातुर्ये शृंगारे अंतर। वस्त्रे शृंगारे शरीर। दोहीमध्ये कोण थोर बरे पाहा। । द . १४ स . ६ - १८वस्त्र , दागदागिने, स्नो-पावडर, ब्युटीपार्लरमधील विविध उपकरणे यांच्या साहाय्याने या नाशिवंत देहास सजवून कृत्रिमरीत्या सौंदर्य संपादन करण्याची सध्या स्पर्धा लागली आहे. बाह्य उपकरणांनी देहाचा शृंगार होईल. परंतु सद्गुण आणि चातुर्य अंगी बाणवल्यास आपलं अंत:करण पवित्र व सुंदर होईल. पवित्र अंत:करणाची माणसं सर्वत्र लोकप्रिय होतात हे आपण पाहतोच. सुंदर दिसण्यापेक्षाही सुंदर असणं अधिक महत्त्वाचं आहे. परंतु बहुसंख्य माणसं व्यक्तीच्या बहिरंगावरून व्यक्ती थोर किंवा लहान हे ठरवतात?, हे बरे नव्हे. स्वामी विवेकानंद शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेसाठी गेले. भगवी वस्त्रं परिधान केलेला हा कोण विचित्र भिकारी आहे, म्हणून लोकांकडून त्यांना भरपूर त्रास सहन करावा लागला. परंतु संधी मिळताच त्यांनी आपली विद्वत्ता, अंत:करणाची व्यापकता जगाला दाखवून दिली आणि सारे जग त्यांना ओळखू लागले. अंतरंगातील गुण हे सद्गुुणी माणसं व्यक्त होतात, तेव्हाच इतरांना समजतात. पूर्वी महात्मा गांधी, विनोबा, लोकमान्य टिळक, सावरकर, तर विद्यमान बाबा आमटे आदी विभूतींनी ‘साधी राहणी उच्च विचारसरणी’ हे तत्त्व अंगीकारलं. श्रीसमर्थ रामदास स्वामी स्वत: फक्त कौपीन परिधान करून राहत असत. तरीही त्यांच्या विचारांनी ते समृद्ध असत, हे ध्यानात घ्यावयास हवे. म्हणून ते आपणास विचारतात की बहिरंग सजवणं आणि अंतरंग सजवणं यात श्रेष्ठ काय, याचा विचार करा. अर्थात, सद्गुुण संपादन करून आपले व्यक्तिमत्त्व विकसित करा आणि यशस्वी व्हा. याच अर्थाचा संत चोखामेळा यांचा अभंग प्रसिद्ध आहे.ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा। नदी डोंगी परि जल नोहे डोंगा। चोख डोंगी परि भाव नोहे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ।।

टॅग्स :spiritualअध्यात्मिक