शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

कैदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 03:42 IST

सरकारचा नियम असा आहे की जर एखाद्याने अपराध केला असेल तर त्याच्यावर पोलीस केस दाखल केली जाते व न्यायालयात त्याचेवर खटला चालतो. जर अपराध सिद्ध झाला तर त्याला शिक्षा सुनावली जाते व त्यास कारागृहात पाठविले जाते.

- डॉ. भूषण कुमार उपाध्याय(भा.पो.से.)सरकारचा नियम असा आहे की जर एखाद्याने अपराध केला असेल तर त्याच्यावर पोलीस केस दाखल केली जाते व न्यायालयात त्याचेवर खटला चालतो. जर अपराध सिद्ध झाला तर त्याला शिक्षा सुनावली जाते व त्यास कारागृहात पाठविले जाते. कारागृहात गेल्यानंतर त्यास कैदी किंवा बंदी म्हटले जाते. कैदेतून बाहेर आल्यानंतर काही लोकांमध्ये सुधारणा घडून येते तर काही लोक पुन्हा अपराध करतात व पुन्हा कैदी बनून कारागृहात दाखल होतात. कैद्यांचेसुद्धा अनेक प्रकार असतात. काही कैद्यांचे अपराध छोटे तर काही कैद्यांचे अपराध गंभीर असतात. कारागृहात गेल्यानंतर जर एखाद्या कैद्याची वागणूक चांगली नसेल तर कारागृह नियमानुसार त्यास तेथेही शिक्षा दिली जाते व आवश्यकतेनुसार त्यास अतिसुरक्षा विभागात बंद करून विभक्त कोठडीत ठेवले जाते. कारागृह ही अशी जागा आहे, जेथून कोणतीही व्यक्ती आपल्या इच्छेनुसार बाहेर पडू शकत नाही. एकतर न्यायालय त्याची सुटका करते किंवा त्याची शिक्षा संपल्यानंतर ती व्यक्ती बाहेर येते.या जगात राहणारे अनेक लोक कारागृहातील कैद्यांसारखे जीवन जगत असतात. विशुद्ध चेतनेच्या स्तरातून स्वतंत्र असूनसुद्धा आपण आपल्या मनोविकारात कैद असतो. शास्त्रात याच मनोविकारांना षड्दोषांच्या रूपात वर्णित केलेले आहे. हे षड्दोष म्हणजेच काम, क्र ोध,लोभ, मोह, मद व मत्सर. कामाच्या अधिकतेमुळे व्यक्ती ही कामाच्या अधीन होते व ती व्यक्ती आपले स्वातंत्र्य गमावून बसते. अशाचप्रकारे क्र ोध, मोह, मद व मत्सर आपल्याला वेगळा विचार करू देत नाही व आपण भावनेच्या आहारी जाऊन कैदी जीवन जगायला लागतो.हे दोष व विकार इतके मजबूत असतात की त्याच्या प्रभावातून मुक्त होणे मानवासाठी अत्यंत कठीण असते. गुरू किंवा संत हे न्यायालयासारखे आहेत, जे आपल्याला या विकारांच्या कैदेतून मुक्त करतात. यामुळेच भारतीय संस्कृतीमध्ये गुरूचे स्थान सर्वोत्तम आहे. गुरू अनेक प्रकारच्या विधीचा वापर करून लोकांना मनोविकारातून मुक्त करतात. भारतीय अध्यात्मशास्त्रात या विधींना ज्ञान, भक्ती किंवा कर्म या नावाने ओळखले जाते. प्रत्येक व्यक्तीचे संस्कार व स्वभाव वेगवेगळे असतात. गुरूसुद्धा अशाप्रकारे प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे मार्ग दाखवून मुक्त करतो. मुक्ती हा शब्दच भारतीय अध्यात्म शास्त्रात एक महत्त्वाचा शब्द आहे. या मनोविकाराच्या अनुचित प्रभावातून पूर्णपणे मुक्त होणे म्हणजेच त्या परमतत्त्वाला प्राप्त करणे होय.

टॅग्स :jailतुरुंग