शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

व्यवहारात, बोलण्यात धर्म हवा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 12:15 IST

आध्यात्मिक...

 ‘आपण कोणीतरी मोठे आहोत, हा अहंकार बाजूला ठेवावा लागेल. आपले तथाकथित शहाणपण विसरावे लागेल. आपण अगदीच सामान्य आहोत, हे लक्षात घ्यावे लागेल. अशा नम्र माणसाला भगवंत जवळ करतो. मीपणा माणसाला हरवितो’.

अनेकदा माणसाला आपल्या ज्ञानाचा, आपल्या विद्वत्तेचा, आपल्या अभ्यासाचा एवढा अहंकार होतो की तो स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजतो आणि इतरांना तुच्छ लेखतो. समाजात, परिवारात, चारचौघांत वावरताना हा अभिमान माणसाला नडतो.

भक्तांनो या विश्वात फक्त एकच वस्तू सत्य आहे आणि ती शाश्वत सत्य वस्तू म्हणजे संत, भगवंत, प्रवचन, कीर्तन, संतवचने हेच होय. त्या सत्याला सामोरे जाण्यासाठी फार मोठी साधना करावी लागते. यासाठी संतांच्या, गुरूंच्या, भगवंताच्या चरणी बसून ते जे काही सांगतील, त्यांचा उपदेश लक्षपूर्वक ऐका आणि आपल्या जीवनात तशी कृती ठेवा. आपल्या व्यवहारात, बोलण्यात धर्म हवा.

आपल्यापाशी दृष्टी आहे याचा अनेकांना अभिमान वाटतो. फार थोडे भक्त असे असतात की जे ही लाभलेली दृष्टी म्हणजे भगवंताची आपल्यावर परमकृपा झालेली आहे. या कृतज्ञ भावनेने जगतात आणि ज्या भगवंताने ही दृष्टी दिली त्याचा शोध घेण्याचा ते प्रयत्न करतात. संतांना स्वत:चे वैयक्तिक असे आयुष्य नसतेच. 

लोकांच्या कल्याणासाठी ते आपले आयुष्य पणाला लावतात. सभोवतालच्या लोकांची दु:खे कमी होईल म्हणून ते सदैव झटत असतात. यासाठी संतांच्या चरणी बसा. संत आपल्याला वारंवार एकच गोष्ट सांगतात की सतत ईश्वराचे नामस्मरण करा. जीवन धर्ममय बनवा.- गौतममुनीजी

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक