शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

व्यवहारात, बोलण्यात धर्म हवा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 12:15 IST

आध्यात्मिक...

 ‘आपण कोणीतरी मोठे आहोत, हा अहंकार बाजूला ठेवावा लागेल. आपले तथाकथित शहाणपण विसरावे लागेल. आपण अगदीच सामान्य आहोत, हे लक्षात घ्यावे लागेल. अशा नम्र माणसाला भगवंत जवळ करतो. मीपणा माणसाला हरवितो’.

अनेकदा माणसाला आपल्या ज्ञानाचा, आपल्या विद्वत्तेचा, आपल्या अभ्यासाचा एवढा अहंकार होतो की तो स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजतो आणि इतरांना तुच्छ लेखतो. समाजात, परिवारात, चारचौघांत वावरताना हा अभिमान माणसाला नडतो.

भक्तांनो या विश्वात फक्त एकच वस्तू सत्य आहे आणि ती शाश्वत सत्य वस्तू म्हणजे संत, भगवंत, प्रवचन, कीर्तन, संतवचने हेच होय. त्या सत्याला सामोरे जाण्यासाठी फार मोठी साधना करावी लागते. यासाठी संतांच्या, गुरूंच्या, भगवंताच्या चरणी बसून ते जे काही सांगतील, त्यांचा उपदेश लक्षपूर्वक ऐका आणि आपल्या जीवनात तशी कृती ठेवा. आपल्या व्यवहारात, बोलण्यात धर्म हवा.

आपल्यापाशी दृष्टी आहे याचा अनेकांना अभिमान वाटतो. फार थोडे भक्त असे असतात की जे ही लाभलेली दृष्टी म्हणजे भगवंताची आपल्यावर परमकृपा झालेली आहे. या कृतज्ञ भावनेने जगतात आणि ज्या भगवंताने ही दृष्टी दिली त्याचा शोध घेण्याचा ते प्रयत्न करतात. संतांना स्वत:चे वैयक्तिक असे आयुष्य नसतेच. 

लोकांच्या कल्याणासाठी ते आपले आयुष्य पणाला लावतात. सभोवतालच्या लोकांची दु:खे कमी होईल म्हणून ते सदैव झटत असतात. यासाठी संतांच्या चरणी बसा. संत आपल्याला वारंवार एकच गोष्ट सांगतात की सतत ईश्वराचे नामस्मरण करा. जीवन धर्ममय बनवा.- गौतममुनीजी

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक