शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

तीक्ष्ण बुद्धीला व्यवहार तर शुद्ध बुद्धीला परमार्थ कळतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 18:56 IST

तीक्ष्ण बुद्धीला व्यवहार कळतो, स्वार्थ कळतो पण परमार्थ कळेलच, असे नाही.

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

परमेश्वर हा महान कलाकार आहे. मानवी देह हीच त्याची सर्वांत मोठी कलाकृती आहे. या देहाचा अंतर्मुख होऊन विचार केला तर मन अगदी थक्क होऊन जाते. या जगात अनेक माणसं जन्माला येतात आणि मरतात. प्रत्येकाचे चेहरे वेगळे, रंग वेगळे, हुबेहुब एकासारखा दुसरा असे किती लोक सापडतील..? निराकार भगवंताने एवढे आकार कसे निर्माण केले असतील..? मनुष्यदेह तरी ईश्वराने का निर्माण केला..? राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी म्हणतात -पशू देही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलतीया लागी नरदेह हीच प्राप्ती, भगवंताची करावीवास्तवात मानवदेह मिळणंच दुर्लभ आहे. पाप पुण्याचे पारडे समसमान झाले तरच हा देह मिळतो. आम्हाला मिळाला पण कळाला नाही. समर्थ रामदास म्हणतात-सांगा नरदेह जोडले आणि परमार्थ बुद्धी विसरलेते मूर्ख कैसे भ्रमले मायाजाळीपरमार्थ तर फक्त शुद्ध बुद्धीलाच कळतो. आजच्या प्रगतीच्या अश्वारोहणात माणूस खूप बुद्धीमान झाला. आपल्या बुद्धीच्या जोरावर तो सूर्यचंद्रावर पोहचला पण ही शुद्ध बुद्धी नाही. फार तर याला तीक्ष्ण बुद्धी म्हणता येईल. कारण शुद्ध बुद्धीलाच परमार्थ कळतो. तीक्ष्ण बुद्धीला व्यवहार कळतो, स्वार्थ कळतो पण परमार्थ कळेलच, असे नाही. जर शुद्ध बुद्धी नसेल तर जीव मायाजाळी गुरफटतो. माया ही जीवाला भगवंतापासून विन्मुख करते, उद्विग्न करते. माया ही छायेसारखी आहे. छायेला स्वतंत्र अस्तित्व नाही. सूर्याच्या विरूद्ध दिशेला तोंड करून चाललो तर छायेचा अनुभव येतो. छायेच्या अनुभूतीचे कारण जशी सूर्याची विन्मुखता तसेच मायेच्या अनुभूतीचे कारण भगवंताची विन्मुखता. माया निर्मूलनाचा उपाय म्हणजे फक्त भगवत्सन्मुखता आहे. अशी सन्मुखता प्राप्त करणे म्हणजेच शुद्ध बुद्धी होय व त्यासाठी तर हा मनुष्य देह आहे..! समर्थ रामदास स्वामी म्हणतात-या नरदेहाचेनि आधारे, नाना साधनाचेनि द्वारेमुख्य सारासार विचारे बहुत सुटलेअग्नी हा अन्नही शिजवतो व घरही जाळतो. आपण त्याचा उपयोग घर जाळण्यासाठी करायचा का अन्न शिजवण्यासाठी करायचा.? हे विवेकबुद्धीने ठरवावे..! आणि हे कळणे म्हणजेच शुद्ध बुद्धी होय.

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत; त्यांच्या संपर्क क्रमांक 9421344960 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिकcultureसांस्कृतिक