शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

तीक्ष्ण बुद्धीला व्यवहार तर शुद्ध बुद्धीला परमार्थ कळतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 18:56 IST

तीक्ष्ण बुद्धीला व्यवहार कळतो, स्वार्थ कळतो पण परमार्थ कळेलच, असे नाही.

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

परमेश्वर हा महान कलाकार आहे. मानवी देह हीच त्याची सर्वांत मोठी कलाकृती आहे. या देहाचा अंतर्मुख होऊन विचार केला तर मन अगदी थक्क होऊन जाते. या जगात अनेक माणसं जन्माला येतात आणि मरतात. प्रत्येकाचे चेहरे वेगळे, रंग वेगळे, हुबेहुब एकासारखा दुसरा असे किती लोक सापडतील..? निराकार भगवंताने एवढे आकार कसे निर्माण केले असतील..? मनुष्यदेह तरी ईश्वराने का निर्माण केला..? राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी म्हणतात -पशू देही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलतीया लागी नरदेह हीच प्राप्ती, भगवंताची करावीवास्तवात मानवदेह मिळणंच दुर्लभ आहे. पाप पुण्याचे पारडे समसमान झाले तरच हा देह मिळतो. आम्हाला मिळाला पण कळाला नाही. समर्थ रामदास म्हणतात-सांगा नरदेह जोडले आणि परमार्थ बुद्धी विसरलेते मूर्ख कैसे भ्रमले मायाजाळीपरमार्थ तर फक्त शुद्ध बुद्धीलाच कळतो. आजच्या प्रगतीच्या अश्वारोहणात माणूस खूप बुद्धीमान झाला. आपल्या बुद्धीच्या जोरावर तो सूर्यचंद्रावर पोहचला पण ही शुद्ध बुद्धी नाही. फार तर याला तीक्ष्ण बुद्धी म्हणता येईल. कारण शुद्ध बुद्धीलाच परमार्थ कळतो. तीक्ष्ण बुद्धीला व्यवहार कळतो, स्वार्थ कळतो पण परमार्थ कळेलच, असे नाही. जर शुद्ध बुद्धी नसेल तर जीव मायाजाळी गुरफटतो. माया ही जीवाला भगवंतापासून विन्मुख करते, उद्विग्न करते. माया ही छायेसारखी आहे. छायेला स्वतंत्र अस्तित्व नाही. सूर्याच्या विरूद्ध दिशेला तोंड करून चाललो तर छायेचा अनुभव येतो. छायेच्या अनुभूतीचे कारण जशी सूर्याची विन्मुखता तसेच मायेच्या अनुभूतीचे कारण भगवंताची विन्मुखता. माया निर्मूलनाचा उपाय म्हणजे फक्त भगवत्सन्मुखता आहे. अशी सन्मुखता प्राप्त करणे म्हणजेच शुद्ध बुद्धी होय व त्यासाठी तर हा मनुष्य देह आहे..! समर्थ रामदास स्वामी म्हणतात-या नरदेहाचेनि आधारे, नाना साधनाचेनि द्वारेमुख्य सारासार विचारे बहुत सुटलेअग्नी हा अन्नही शिजवतो व घरही जाळतो. आपण त्याचा उपयोग घर जाळण्यासाठी करायचा का अन्न शिजवण्यासाठी करायचा.? हे विवेकबुद्धीने ठरवावे..! आणि हे कळणे म्हणजेच शुद्ध बुद्धी होय.

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत; त्यांच्या संपर्क क्रमांक 9421344960 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिकcultureसांस्कृतिक