शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

साक्षात्कार म्हणजे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 08:52 IST

संतांना परमेश्वराचा साक्षात्कार होतो म्हणजे नेमके काय होते? अनेक संतांनी तेजरूप, अनाहत वाद, अमृतास्वाद, सुवास, स्पर्श आदी बाबींचा अनुभव मांडणे होय. साक्षात्काराचे मानसिक, शारीरिक, नैतिक परिणाम साधकाला जाणवत असतात.

संतांना परमेश्वराचा साक्षात्कार होतो म्हणजे नेमके काय होते? अनेक संतांनी तेजरूप, अनाहत वाद, अमृतास्वाद, सुवास, स्पर्श आदी बाबींचा अनुभव मांडणे होय. साक्षात्काराचे मानसिक, शारीरिक, नैतिक परिणाम साधकाला जाणवत असतात. त्यांची सिद्धावस्था व व्यवहार स्वत:तच पाहावयास मिळतात. अशा माहात्म्यांच्या दर्शनाने व शक्तीने ईश तत्त्वाची ओळख होते. तो निर्गुण, निराकार परमात्मा सगुणरूपाने दर्शन देतो. त्याच्या दर्शनाने कृतार्थता वाटून अंत:करणात आनंदाचा पूर येतो. आपल्या अंगावर रोमांच उभे राहातात. आत्मानंदाने मन न्हाऊन निघते. मागील जन्माचे पुण्य मिळवून या जन्मी त्या ईश्वतत्त्वाचा साक्षात्कार घडला. तेव्हा त्याचे दु:ख, चिंता दूर होते. तो देहभान व तहान-भूक विसरून जातो. अंत:करणात प्रेमाचा झरा अखंड वाहत असतो. आनंद व प्रेमाला उधाण येते. सहगुणांची खाण तयार होते. स्वार्थ व स्वार्थमूलक हे दुर्गुण नाहीसे होतात व त्यांच्या जागी दया, त्याग, सहानुभूती, शांती-क्षमा अशा सद्गुणांची वाढ होते. जणूकाही त्याच्या प्रेमानंदाला पूर येऊन स्वच्छंदी मस्तीत ते मग्न असतात. म्हणजे प्रेमळ मातेला अमृताचा पान्हा फुटला असे समजावे. त्याच्या आनंदाला सागराची उपमाही कमी पडेल. त्याचा सदासर्वकाळ सुकाळ असून, त्यापासून त्याला नवे समाधान लाभते.

‘जिव्हे अमृतचि स्वये’ असे म्हणावेसे वाटते. साक्षात्कारी संतांना अमृताचा आस्वाद घेता येतो. त्यांच्या मनात नामचिंतनाचा व प्रेमाचा प्रवाह अखंडितपणे चालू असतो. ब्रह्मानंदाचे भरते त्यांच्या मनात असते. म्हणूनच म्हणावेसे वाटते की, प्रेमाने प्रेमाचे विरजन घालून घुसळलेले लोणी म्हणजे नवनीत होय. हे नवनीत म्हणजे ब्रह्मानंदाचे पारणे होय. यामुळे अंत:करण स्थिर होऊन आत्मप्रचिती येते. आत्मप्रचिती आली की अंगावर रोमांच उभे राहातात. डोळे रक्तवर्ण होतात. कंठात प्रेम दाटून येते. डोळ्यात आनंदाश्रू येतात. जणूकाही साक्षात्काराने जीवनच बदलून जाते. चित्त स्वरूप दर्शनाने सुखावून जाते. मी -मीमध्ये मिसळून जातो. थोडक्यात ब्रह्मस्वरूपात विलीन होता येते. चित्त स्थिर होते. जीवरूपी सुखाला ब्रह्मांड सुखाची अनुभूती मिळते. या सर्वांना कारणीभूत ठरणारे मनुष्याचे मन महत्त्वाचे असते. मनाने मनाला जिंकणे म्हणजे ब्रह्मानुभूती मिळणे होय.डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक