शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

सकारात्मक ऊर्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 11:58 IST

आपल्या रंगावर नाही तर आपल्या अंतरंगात काय आहे यावर आपली उर्ध्व किंवा अधोगती ठरलेली असते. अंतरंगातील ही गोष्ट म्हणजे आपला दृष्टिकोन, आपली मनोवृत्ती.

डॉ. दत्ता कोहिनकर

एक फुगेवाला जत्रेमध्ये हेलियम वायू भरलेले (गॅसचे) फुगे विकून उदरनिर्वाह करायचा. मध्येच तो एखादा फुगा आकाशात सोडायाचा. उंच उडत जाणारा फुगा पाहून मुले फुगे घेण्यासाठी पालकांना आग्रह करायचे व त्याचा धंदा जोरात सुरू व्हायचा. एका लहान मुलाने या फुगेवाल्याला प्रश्न केला, काका, या निळ्या रंगाच्या फुग्याप्रमाणे पिवळा रंगाचा फुगा पण आकाशात उडेल का? मुलाची ही जिज्ञासा पाहून फुगेवाला म्हणाला, बाळा.. फुगा हा रंगामुळे नाही तर त्याच्या आत जे काही आहे त्यामुळे तो हवेत उंच उडत जातो. हीच गोष्ट आपल्या दैनंदिन आयुष्यातही लागू पडते, आपल्या रंगावर नाही तर आपल्या अंतरंगात काय आहे यावर आपली उर्ध्व किंवा अधोगती ठरलेली असते. अंतरंगातील ही गोष्ट म्हणजे आपला दृष्टिकोन, आपली मनोवृत्ती. एखाद्या बीजामधून रोप झेपावते! पण बीजच नसेल तर रोपाचे अस्तित्व असू शकेल काय? अगदी त्याचप्रमाणे माणसाची प्रत्येक कृती ही त्याच्या विचारातून आकाराला येत असते. मंगेश पाडगावकर म्हणाले होते, पेला अर्धा भरला की सरला हे तुम्हीच ठरवायचे असते. तुम्हाला सुखी व्हायचे असेल तर आपल्या विचारांना सकारात्मकतेचे बळ द्या. जसा विचार कराल तसेच तुम्ही व्हाल. 

भगवान बुद्ध म्हणतात, वाईट विचारांनी-वाईट कर्म करणाऱ्या माणसाचे मागे दु:ख अशाप्रकारे लागते जसे बैलगाडीला जुंपलेल्या बैलाच्या मागे बैलगाडीचे चाक आणि चांगल्या विचारांनी चांगले कर्म करणाऱ्या माणसाच्या मागे असे सुख लागते की जशी त्याच्याबरोबर त्याची सावली. म्हणून नेहमी स्वत:बाबत आपण काय विचार करतो या स्वसंवादावर लक्ष देऊन नकारात्मकता हद्दपार करण्याची मनाला सवय लागली पाहिजे. सफरचंद हातगाडीवर विकणाऱ्या माणसाने सफरचंद ७० रुपये किलो असा फलक गाडीवर लावला होता. दिवसभर त्याला एकही ग्राहक भेटला नाही. लोकांनी त्यापेक्षा कमी भावाने त्याच्याशी व्यवहार केला.  यावरून एवढेच शिकूया, आपण समाजात जेवढी आपली किंमत लावतो (स्वमूल्य) तेवढीच किंमत किंवा त्यापेक्षा कमी किंमत समाज आपल्याला देतो, म्हणून स्वत:ला मूल्यवान समजा (सेल्फ रिस्पेक्ट). फक्त अहंकार बाळगू नका. हेलन केलरला एका श्रोत्याने विचारले, दृष्टिहिनतेपेक्षा मोठे दुर्भाग्य काय आहे? त्यावर त्या म्हणाल्या, दृष्टी असूनही ज्याच्यापुढे महान स्वप्ने नसणे, सकारात्मक दृष्टिकोन नसणे हे दृष्टिहिनतेपेक्षा मोठे दुर्भाग्य आहे.

थॉमस अल्वा एडिसनच्या कारखान्याला वयाच्या ६५ व्या वर्षी आग लागली आणि सर्व मालमत्ता जळून खाक झाली. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले, चला आयुष्यातील सर्व चुका जळून गेल्या, पुन्हा एकदा नव्याने कामाला सुरुवात करूया. या घटनेनंतर सकारात्मक विचारांच्या ऊर्जेतून त्यांनी तीनच आठवड्यांत ग्रामोफोनचा शोध लावून उत्पादनाला सुरुवात केली. यशासाठी व आनंदी जीवन जगण्यासाठी असा सकारात्मक दृष्टिकोन हवा त्यानेच आयुष्य उन्नत होते. शेवटी एवढंच सांगावसं वाटत... ‘मंजिले उन्ही को मिलती है, जिनके सपनो में जान होती है। पंख होने से कुछ भी नही होता, होसलों से उड्डान होती है।’        

(लेखक प्रसिद्ध व्याख्याते आहेत.)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकPuneपुणे