शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

मन करारे प्रसन्न...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 19:06 IST

जीवंत मनुष्याचं प्रत्येक वर्तन हे मनाचे आज्ञेवर चालतं. मन हेच आपली दिनचर्या संनियंत्रीत करीत असतं आणि म्हणून मनापासून केलेले ...

जीवंत मनुष्याचं प्रत्येक वर्तन हे मनाचे आज्ञेवर चालतं. मन हेच आपली दिनचर्या संनियंत्रीत करीत असतं आणि म्हणून मनापासून केलेले प्रत्येक काम यशस्वी होत असतो.असे म्हटल्या जाते. मन हे अस्थिर आहे. क्षणात ते क्षितीजा पलीकडे सैर करु शकते. एवढी वेग विलक्षण क्षमता कशातही नाही. मनाला स्थिर ठेवणे खुप अवघड आहे. त्या करीता साधना करावी लागते. मनावर सत्ता मिळवून अनेक ऋषी-मूनी संत महात्म्यांनी जग जिंकले आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाचे यशाचे गमक मन हेच आहे. मनस्वास्थ ठीक नसेल तर आपण काहीच करु शकत नाही. मना सारखं काही घडल्यास आपण सुखावतो तर मनाविरुध्द काही घडत असेल तेवढेच अस्वस्थ देखील आपण होवून जात असतो. मन हा अभ्यासाचा विषय आहे.मनाच्या स्थितीला जाणून घेणे खुप अवघड आहे. बुद्धी आणि मन याचा सहसबंध आहे कां? हा प्रश्न याठीकाणी महत्वाचा ठरतो. ज्ञान आणि बुद्धीच्या कसोटीवर मनाची स्थिती घडत असते. एखाद्या घटनेतील आपलं वर्तन हे घटनेविषयीचं आपलं ज्ञान कीती आहे तसं वर्तन बदल दिसून येत असतं.याचा अर्थ ज्ञाननावरच मनाच्या भूमिकेची उंची ठरते आपली आवड निवड ही मनावर अवलंबून असतं आपली सकारात्मक वा नकारात्मक भूमिका ही आपल्यातील मन निश्चित करीत असते. कुठलाही दृष्टीकोन ठरविण्यासाठी मन लागतं मनाची स्थिती ही कठोर असू शकते तेवढीच मृदु ही. जीवनातील विविधांगी अनुभव मनाच्या स्थितीला आकार देत असते. विचार हा मनाचा आधार आहे. .सुविचारांनी मनाची व्यापकता वाढते.तसेच वाईट विचार मन कलुषित करते. बरी-वाईट परिस्थिती मन प्रभावित करीत असतं प्रत्येकाला मन:शांती हवी आहे. धन दौलत, सत्ता संपत्तीच्या हव्यासापोटी आपण मन हरवून बसलो आहोत . मनाची संवेदना बोथट झाली आहे . आणि म्हणून आपण आनंद सुख समाधान या पासुन पारखे झालो आहे .

मन करारे प्रसन्न ।सर्व सिद्धीचे कारण॥ हेच अंतिम सत्य आहे.

- नंदकिशोर हिंगणकर, आकोट जि. अकोला

टॅग्स :Akolaअकोलाspiritualअध्यात्मिक