शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मन करारे प्रसन्न...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 19:06 IST

जीवंत मनुष्याचं प्रत्येक वर्तन हे मनाचे आज्ञेवर चालतं. मन हेच आपली दिनचर्या संनियंत्रीत करीत असतं आणि म्हणून मनापासून केलेले ...

जीवंत मनुष्याचं प्रत्येक वर्तन हे मनाचे आज्ञेवर चालतं. मन हेच आपली दिनचर्या संनियंत्रीत करीत असतं आणि म्हणून मनापासून केलेले प्रत्येक काम यशस्वी होत असतो.असे म्हटल्या जाते. मन हे अस्थिर आहे. क्षणात ते क्षितीजा पलीकडे सैर करु शकते. एवढी वेग विलक्षण क्षमता कशातही नाही. मनाला स्थिर ठेवणे खुप अवघड आहे. त्या करीता साधना करावी लागते. मनावर सत्ता मिळवून अनेक ऋषी-मूनी संत महात्म्यांनी जग जिंकले आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाचे यशाचे गमक मन हेच आहे. मनस्वास्थ ठीक नसेल तर आपण काहीच करु शकत नाही. मना सारखं काही घडल्यास आपण सुखावतो तर मनाविरुध्द काही घडत असेल तेवढेच अस्वस्थ देखील आपण होवून जात असतो. मन हा अभ्यासाचा विषय आहे.मनाच्या स्थितीला जाणून घेणे खुप अवघड आहे. बुद्धी आणि मन याचा सहसबंध आहे कां? हा प्रश्न याठीकाणी महत्वाचा ठरतो. ज्ञान आणि बुद्धीच्या कसोटीवर मनाची स्थिती घडत असते. एखाद्या घटनेतील आपलं वर्तन हे घटनेविषयीचं आपलं ज्ञान कीती आहे तसं वर्तन बदल दिसून येत असतं.याचा अर्थ ज्ञाननावरच मनाच्या भूमिकेची उंची ठरते आपली आवड निवड ही मनावर अवलंबून असतं आपली सकारात्मक वा नकारात्मक भूमिका ही आपल्यातील मन निश्चित करीत असते. कुठलाही दृष्टीकोन ठरविण्यासाठी मन लागतं मनाची स्थिती ही कठोर असू शकते तेवढीच मृदु ही. जीवनातील विविधांगी अनुभव मनाच्या स्थितीला आकार देत असते. विचार हा मनाचा आधार आहे. .सुविचारांनी मनाची व्यापकता वाढते.तसेच वाईट विचार मन कलुषित करते. बरी-वाईट परिस्थिती मन प्रभावित करीत असतं प्रत्येकाला मन:शांती हवी आहे. धन दौलत, सत्ता संपत्तीच्या हव्यासापोटी आपण मन हरवून बसलो आहोत . मनाची संवेदना बोथट झाली आहे . आणि म्हणून आपण आनंद सुख समाधान या पासुन पारखे झालो आहे .

मन करारे प्रसन्न ।सर्व सिद्धीचे कारण॥ हेच अंतिम सत्य आहे.

- नंदकिशोर हिंगणकर, आकोट जि. अकोला

टॅग्स :Akolaअकोलाspiritualअध्यात्मिक