शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

मन करारे प्रसन्न...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 19:06 IST

जीवंत मनुष्याचं प्रत्येक वर्तन हे मनाचे आज्ञेवर चालतं. मन हेच आपली दिनचर्या संनियंत्रीत करीत असतं आणि म्हणून मनापासून केलेले ...

जीवंत मनुष्याचं प्रत्येक वर्तन हे मनाचे आज्ञेवर चालतं. मन हेच आपली दिनचर्या संनियंत्रीत करीत असतं आणि म्हणून मनापासून केलेले प्रत्येक काम यशस्वी होत असतो.असे म्हटल्या जाते. मन हे अस्थिर आहे. क्षणात ते क्षितीजा पलीकडे सैर करु शकते. एवढी वेग विलक्षण क्षमता कशातही नाही. मनाला स्थिर ठेवणे खुप अवघड आहे. त्या करीता साधना करावी लागते. मनावर सत्ता मिळवून अनेक ऋषी-मूनी संत महात्म्यांनी जग जिंकले आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाचे यशाचे गमक मन हेच आहे. मनस्वास्थ ठीक नसेल तर आपण काहीच करु शकत नाही. मना सारखं काही घडल्यास आपण सुखावतो तर मनाविरुध्द काही घडत असेल तेवढेच अस्वस्थ देखील आपण होवून जात असतो. मन हा अभ्यासाचा विषय आहे.मनाच्या स्थितीला जाणून घेणे खुप अवघड आहे. बुद्धी आणि मन याचा सहसबंध आहे कां? हा प्रश्न याठीकाणी महत्वाचा ठरतो. ज्ञान आणि बुद्धीच्या कसोटीवर मनाची स्थिती घडत असते. एखाद्या घटनेतील आपलं वर्तन हे घटनेविषयीचं आपलं ज्ञान कीती आहे तसं वर्तन बदल दिसून येत असतं.याचा अर्थ ज्ञाननावरच मनाच्या भूमिकेची उंची ठरते आपली आवड निवड ही मनावर अवलंबून असतं आपली सकारात्मक वा नकारात्मक भूमिका ही आपल्यातील मन निश्चित करीत असते. कुठलाही दृष्टीकोन ठरविण्यासाठी मन लागतं मनाची स्थिती ही कठोर असू शकते तेवढीच मृदु ही. जीवनातील विविधांगी अनुभव मनाच्या स्थितीला आकार देत असते. विचार हा मनाचा आधार आहे. .सुविचारांनी मनाची व्यापकता वाढते.तसेच वाईट विचार मन कलुषित करते. बरी-वाईट परिस्थिती मन प्रभावित करीत असतं प्रत्येकाला मन:शांती हवी आहे. धन दौलत, सत्ता संपत्तीच्या हव्यासापोटी आपण मन हरवून बसलो आहोत . मनाची संवेदना बोथट झाली आहे . आणि म्हणून आपण आनंद सुख समाधान या पासुन पारखे झालो आहे .

मन करारे प्रसन्न ।सर्व सिद्धीचे कारण॥ हेच अंतिम सत्य आहे.

- नंदकिशोर हिंगणकर, आकोट जि. अकोला

टॅग्स :Akolaअकोलाspiritualअध्यात्मिक