शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पितृपंधरवड्यास आजपासून प्रारंभ, पूर्वजांविषयी कृतज्ञता आणि भावनिक महत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 06:39 IST

पितृपक्ष म्हटला की, मनात एक अनामिक भीती निर्माण होते. शरीर आणि मनाला जडत्व येते. तसे पाहिले तर पूर्वजांच्या स्मरणाचा हा काळ आहे.

- प्रसाद धर्माधिकारीनशिराबाद, ता. जळगाव - दिवंगत व्यक्ती व पूर्वजांविषयी स्मरण व त्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा पितृपक्ष महालयारंभ २ सप्टेंबरपासून सुरु होत आह. हिंदू संस्कृतीमध्ये पितृपक्ष पंधरवड्याला भावनिक महत्त्व आहे. सर्वपित्री अमावस्येला पितृपक्षाची सांगता होत असते.भाद्रपद महिन्यातील वद्यपक्ष पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. दिवंगत व्यक्ती वाडवडिलांच्या पूर्वजांच्या मृत्यू तिथीला या पंधरवड्यात त्या त्या तिथीला श्राद्ध तर्पण केले जाते. तर्पण केल्याने पितरांना सुख लाभते व ते संतुष्ट होतात  अशी भावना आहे.पितृपक्ष म्हटला की, मनात एक अनामिक भीती निर्माण होते. शरीर आणि मनाला जडत्व येते. तसे पाहिले तर पूर्वजांच्या स्मरणाचा हा काळ आहे. पुढच्या पिढीला संस्कारित करण्याचे कार्य पूर्वीच्या पिढीने केले आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करण्याचा कालखंड आहे. तेव्हा मनात भीती न बाळगता पूर्वजांचे स्मरण व्हायला हवे.बदलत्या काळाची ती मागणी आहे.

श्राद्धाचे प्रकार...श्राद्ध क्रियेत तत श्राद्धम म्हणजेच श्रद्धेने केलेले कार्य यालाच श्राध्द असे म्हणतात. और्ध्वद्देहिक श्राद्ध, संवंत्सारीक, पार्वणी, तीर्थ, त्रिपिंडी, हिरण्यश्राद्ध, महालयश्राद्ध आदी श्राद्धांचे प्रकार आहेत.तिथींना महत्व ...पितृपक्षात तिथींना अनन्य महत्त्व आहे. शस्त्राने मृत झालेले, संन्यास घेऊन मृत झालेले, माहेरपणी मृत्यू झालेले सवाष्णी वगैरेंसाठी ठराविक तिथीला श्राद्ध केले जाते. त्यात सर्वपित्री अमावस्या साऱ्या पितरांसाठी आहे.स्नेह वृद्धीसाठी यांचा वापर...गोपीचंदन, काळीतीळ, जानवे, पुष्प, तुळशी पाने, दर्भ, पवित्री, फुलहार, भात, श्राद्ध कर्मात वापरत असतात. काळे तीळ स्नेहाचे तर जव हे समृद्धीचे प्रतीक आहे. पिंडदानासाठी भातात तुळशीपत्र, तूप, मध, जव, तीळ, गोपीचंदन यांचा वापर करतात.वैश्वदेव...असा करतात...श्राद्ध कार्यात वैश्वदेवाला अनन्य महत्त्व आहे. केळीच्या पानावर भाताच्या आहुती देऊन अग्निपूजन करीत त्यात आहुती दिली जाते. शास्त्रवचन असले तरी रूढीनुसार अनेकजण जेवणाचे पान अग्नीत टाकतात. त्यास ग्रामीण भागात आगारी टाकणे असेही संबोधले जाते.काव घासला महत्वपितृपक्षात कावळ्याला महत्व असते. कावळा पिंडाला स्पर्श करणे अत्यंत महत्त्वाचे असते. श्राद्ध कर्म झाल्यानंतर काव घास ठेवला जातो. पितर जेवायला नाही मिळाला तर ते जेवणाचे पान पूजन करून गाईला अर्पण केले जाते.तिथीनुसार श्राद्ध असे...श्राद्ध हे तिथीनुसारच करावे, असे शास्त्रवचन आहे. २ सप्टेंबर रोजी महालय श्राद्धारंभ असून प्रतिपदा श्राद्ध आहे. ३ रोजी द्वितिया श्राद्ध, ५ रोजी तृतीया श्राद्ध, ६ रोजी चतुर्थी श्राद्ध, ७ रोजी पंचमी श्राद्ध व भरणी श्राध्द, ८ रोजी षष्ठी श्राद्ध, ९ रोजी सप्तमी श्राद्ध, १० रोजी अष्टमी श्राद्ध, ११ रोजी अविधवा नवमी अर्थात नवमी श्राद्ध, १२ रोजी दशमी श्राद्ध, १३ रोजी एकादशी श्राद्ध, १४ रोजी द्वादशी श्राद्ध, संन्यासिना महालय, १५ रोजी त्रयोदशी श्राद्ध, १६ रोजी चतुर्दशी श्राद्ध व शस्त्रादिहत पितृश्राद्ध, १७ रोजी सर्वपित्री दर्श अमावस्या श्राद्ध आहे. पौर्णिमेचा महालय ७, १०, १२, १४, १७ सप्टेंबर यापैकी कोणत्याही दिवशी करता येईल. १७ आॅक्टोबर रोजी मातामह श्राद्ध आहे.तर्पण कार्यामध्ये वडील, आजोबा, पणजोबा, आई, आजी, पणजी, आईचे वडील, आजोबा ,पणजोबा, आईची आई, आजी, पणजी, काका, मामा, भाऊ, सासू-सासरे, पत्नी, मुलगा, मित्र, गुरु, शिष्य, आदी दिवंगतांना गोत्रासह नामोल्लेख करीत पाणी दिले जाते.

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षAdhyatmikआध्यात्मिक