शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

पितृपंधरवड्यास आजपासून प्रारंभ, पूर्वजांविषयी कृतज्ञता आणि भावनिक महत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 06:39 IST

पितृपक्ष म्हटला की, मनात एक अनामिक भीती निर्माण होते. शरीर आणि मनाला जडत्व येते. तसे पाहिले तर पूर्वजांच्या स्मरणाचा हा काळ आहे.

- प्रसाद धर्माधिकारीनशिराबाद, ता. जळगाव - दिवंगत व्यक्ती व पूर्वजांविषयी स्मरण व त्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा पितृपक्ष महालयारंभ २ सप्टेंबरपासून सुरु होत आह. हिंदू संस्कृतीमध्ये पितृपक्ष पंधरवड्याला भावनिक महत्त्व आहे. सर्वपित्री अमावस्येला पितृपक्षाची सांगता होत असते.भाद्रपद महिन्यातील वद्यपक्ष पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. दिवंगत व्यक्ती वाडवडिलांच्या पूर्वजांच्या मृत्यू तिथीला या पंधरवड्यात त्या त्या तिथीला श्राद्ध तर्पण केले जाते. तर्पण केल्याने पितरांना सुख लाभते व ते संतुष्ट होतात  अशी भावना आहे.पितृपक्ष म्हटला की, मनात एक अनामिक भीती निर्माण होते. शरीर आणि मनाला जडत्व येते. तसे पाहिले तर पूर्वजांच्या स्मरणाचा हा काळ आहे. पुढच्या पिढीला संस्कारित करण्याचे कार्य पूर्वीच्या पिढीने केले आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करण्याचा कालखंड आहे. तेव्हा मनात भीती न बाळगता पूर्वजांचे स्मरण व्हायला हवे.बदलत्या काळाची ती मागणी आहे.

श्राद्धाचे प्रकार...श्राद्ध क्रियेत तत श्राद्धम म्हणजेच श्रद्धेने केलेले कार्य यालाच श्राध्द असे म्हणतात. और्ध्वद्देहिक श्राद्ध, संवंत्सारीक, पार्वणी, तीर्थ, त्रिपिंडी, हिरण्यश्राद्ध, महालयश्राद्ध आदी श्राद्धांचे प्रकार आहेत.तिथींना महत्व ...पितृपक्षात तिथींना अनन्य महत्त्व आहे. शस्त्राने मृत झालेले, संन्यास घेऊन मृत झालेले, माहेरपणी मृत्यू झालेले सवाष्णी वगैरेंसाठी ठराविक तिथीला श्राद्ध केले जाते. त्यात सर्वपित्री अमावस्या साऱ्या पितरांसाठी आहे.स्नेह वृद्धीसाठी यांचा वापर...गोपीचंदन, काळीतीळ, जानवे, पुष्प, तुळशी पाने, दर्भ, पवित्री, फुलहार, भात, श्राद्ध कर्मात वापरत असतात. काळे तीळ स्नेहाचे तर जव हे समृद्धीचे प्रतीक आहे. पिंडदानासाठी भातात तुळशीपत्र, तूप, मध, जव, तीळ, गोपीचंदन यांचा वापर करतात.वैश्वदेव...असा करतात...श्राद्ध कार्यात वैश्वदेवाला अनन्य महत्त्व आहे. केळीच्या पानावर भाताच्या आहुती देऊन अग्निपूजन करीत त्यात आहुती दिली जाते. शास्त्रवचन असले तरी रूढीनुसार अनेकजण जेवणाचे पान अग्नीत टाकतात. त्यास ग्रामीण भागात आगारी टाकणे असेही संबोधले जाते.काव घासला महत्वपितृपक्षात कावळ्याला महत्व असते. कावळा पिंडाला स्पर्श करणे अत्यंत महत्त्वाचे असते. श्राद्ध कर्म झाल्यानंतर काव घास ठेवला जातो. पितर जेवायला नाही मिळाला तर ते जेवणाचे पान पूजन करून गाईला अर्पण केले जाते.तिथीनुसार श्राद्ध असे...श्राद्ध हे तिथीनुसारच करावे, असे शास्त्रवचन आहे. २ सप्टेंबर रोजी महालय श्राद्धारंभ असून प्रतिपदा श्राद्ध आहे. ३ रोजी द्वितिया श्राद्ध, ५ रोजी तृतीया श्राद्ध, ६ रोजी चतुर्थी श्राद्ध, ७ रोजी पंचमी श्राद्ध व भरणी श्राध्द, ८ रोजी षष्ठी श्राद्ध, ९ रोजी सप्तमी श्राद्ध, १० रोजी अष्टमी श्राद्ध, ११ रोजी अविधवा नवमी अर्थात नवमी श्राद्ध, १२ रोजी दशमी श्राद्ध, १३ रोजी एकादशी श्राद्ध, १४ रोजी द्वादशी श्राद्ध, संन्यासिना महालय, १५ रोजी त्रयोदशी श्राद्ध, १६ रोजी चतुर्दशी श्राद्ध व शस्त्रादिहत पितृश्राद्ध, १७ रोजी सर्वपित्री दर्श अमावस्या श्राद्ध आहे. पौर्णिमेचा महालय ७, १०, १२, १४, १७ सप्टेंबर यापैकी कोणत्याही दिवशी करता येईल. १७ आॅक्टोबर रोजी मातामह श्राद्ध आहे.तर्पण कार्यामध्ये वडील, आजोबा, पणजोबा, आई, आजी, पणजी, आईचे वडील, आजोबा ,पणजोबा, आईची आई, आजी, पणजी, काका, मामा, भाऊ, सासू-सासरे, पत्नी, मुलगा, मित्र, गुरु, शिष्य, आदी दिवंगतांना गोत्रासह नामोल्लेख करीत पाणी दिले जाते.

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षAdhyatmikआध्यात्मिक