शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 20:48 IST

शब्दाला जागणारा माणूस. शब्द पाळणारा माणूस. शब्द म्हणजे प्रमाण असणारा माणूस.

- धर्मराज हल्लाळेशब्दाला जागणारा माणूस. शब्द पाळणारा माणूस. शब्द म्हणजे प्रमाण असणारा माणूस. असा शब्दांना घट्ट धरून जगणारा माणूस समाजाच्या आदरस्थानी असतो. ह्यजान जायें पर वचन न जायेह्ण ही धारणा ज्याच्या ठायी असते, तो शब्दांवर पक्का असतो. तो शब्द फिरवत नाही. मग त्यासाठी आयुष्य पणाला लागले तरी चालेल. संत तुकाराम महाराज यांनीही आपल्या अभंगातून मानवी वृत्ती, प्रवृत्ती सांगितल्या आहेत.शब्द प्रहाराने समाजमन जागे केले आहे. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले अर्थात जो जसा बोलतो तसाच वागतो, त्याच्या पावलांचे वंदन केले पाहिजे. तसे वंदन करावीत अशी पाऊले अभावानेच दिसतात. खरे बोलणे, खरे वागणे हा अव्यवहारीपणा मानला जातो. याउलट जसे बोलू तसे वागू नये हाच जणू व्यवहार सांगितला जातो. मात्र अशा व्यवहाराने त्या व्यक्तीचे आयुष्य खोटेपणाच्या वर्तुळात फिरत राहते. आभासी जीवन वाट्याला येते. दुसऱ्याची फसवणूक करताना आपण स्वत:लाच फसवीत असतो. शब्द न पाळल्याने अप्रतिष्ठा वाट्याला येते. आपले सामाजिक मूल्य घसरते. हा माणूस शब्दाला जागत नाही. जे बोलतो त्याच्या उलट वागतो. कथनी आणि करणीमध्ये फरक आहे, अशी दूषणे आपले व्यक्तिमत्त्व डागाळतात.जे बोलाल ते केलेच पाहिजे. उक्ती तशी कृती असलीच पाहिजे. ज्या गोष्टी आपण करू शकणार नाही त्या न बोललेल्या ब-या. शब्द जपून वापरले पाहिजेत. कारण शब्दांनीच पेटतात घरे, दारे, देश आणि माणसेसुद्धा अन् शब्दच विझवितात आग शब्दांनी पेटलेल्या माणसांची. अर्थात आपले बोलणे समाजाच्या भल्याचे असावे. ख-याच्या बाजूने असावे. शब्दात मोठी ताकद आहे. ज्या शब्दांनी घरे, दारे, देश पेटतात त्याच शब्दांनी माणसांना शांतही करता येते. ही शब्दमहती जशी आहे तसे शब्दांना जागणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जे करू शकू ते बोला. जे बोलले ते करा. आपल्यावर विसंबून असणाºयांना धोका झाला तर त्यांच्यासाठी तो एक वाईट अनुभव असतो. ज्याची ते पुनरावृत्ती करीत नाहीत. अर्थात ते पुन्हा कधीच आपल्यावर विसंबून राहत नाहीत, म्हणजेच विश्वास ठेवत नाहीत. ज्यामुळे आपण जवळचा माणूस गमावतो.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक