शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 20:48 IST

शब्दाला जागणारा माणूस. शब्द पाळणारा माणूस. शब्द म्हणजे प्रमाण असणारा माणूस.

- धर्मराज हल्लाळेशब्दाला जागणारा माणूस. शब्द पाळणारा माणूस. शब्द म्हणजे प्रमाण असणारा माणूस. असा शब्दांना घट्ट धरून जगणारा माणूस समाजाच्या आदरस्थानी असतो. ह्यजान जायें पर वचन न जायेह्ण ही धारणा ज्याच्या ठायी असते, तो शब्दांवर पक्का असतो. तो शब्द फिरवत नाही. मग त्यासाठी आयुष्य पणाला लागले तरी चालेल. संत तुकाराम महाराज यांनीही आपल्या अभंगातून मानवी वृत्ती, प्रवृत्ती सांगितल्या आहेत.शब्द प्रहाराने समाजमन जागे केले आहे. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले अर्थात जो जसा बोलतो तसाच वागतो, त्याच्या पावलांचे वंदन केले पाहिजे. तसे वंदन करावीत अशी पाऊले अभावानेच दिसतात. खरे बोलणे, खरे वागणे हा अव्यवहारीपणा मानला जातो. याउलट जसे बोलू तसे वागू नये हाच जणू व्यवहार सांगितला जातो. मात्र अशा व्यवहाराने त्या व्यक्तीचे आयुष्य खोटेपणाच्या वर्तुळात फिरत राहते. आभासी जीवन वाट्याला येते. दुसऱ्याची फसवणूक करताना आपण स्वत:लाच फसवीत असतो. शब्द न पाळल्याने अप्रतिष्ठा वाट्याला येते. आपले सामाजिक मूल्य घसरते. हा माणूस शब्दाला जागत नाही. जे बोलतो त्याच्या उलट वागतो. कथनी आणि करणीमध्ये फरक आहे, अशी दूषणे आपले व्यक्तिमत्त्व डागाळतात.जे बोलाल ते केलेच पाहिजे. उक्ती तशी कृती असलीच पाहिजे. ज्या गोष्टी आपण करू शकणार नाही त्या न बोललेल्या ब-या. शब्द जपून वापरले पाहिजेत. कारण शब्दांनीच पेटतात घरे, दारे, देश आणि माणसेसुद्धा अन् शब्दच विझवितात आग शब्दांनी पेटलेल्या माणसांची. अर्थात आपले बोलणे समाजाच्या भल्याचे असावे. ख-याच्या बाजूने असावे. शब्दात मोठी ताकद आहे. ज्या शब्दांनी घरे, दारे, देश पेटतात त्याच शब्दांनी माणसांना शांतही करता येते. ही शब्दमहती जशी आहे तसे शब्दांना जागणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जे करू शकू ते बोला. जे बोलले ते करा. आपल्यावर विसंबून असणाºयांना धोका झाला तर त्यांच्यासाठी तो एक वाईट अनुभव असतो. ज्याची ते पुनरावृत्ती करीत नाहीत. अर्थात ते पुन्हा कधीच आपल्यावर विसंबून राहत नाहीत, म्हणजेच विश्वास ठेवत नाहीत. ज्यामुळे आपण जवळचा माणूस गमावतो.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक