शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

उपनिषदातील शांतिमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 04:43 IST

उपनिषद म्हणजे काय, तर उप+निष म्हणजे जवळ जाणे ..सत्याच्या जवळ जाणे, उपनिषद म्हणजे जवळ बसणे.

- शैलजा शेवडेउपनिषद म्हणजे काय, तर उप+निष म्हणजे जवळ जाणे ..सत्याच्या जवळ जाणे, उपनिषद म्हणजे जवळ बसणे. अत्यंत भक्तिभावाने गुरूच्या जवळ बसून शिष्य जी परामार्थ विद्या संपादन करतो, त्या विद्येला ‘उपनिषद’ असे म्हणतात. स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘शक्तीची उपासना हाच सांगावा मला उपनिषदांच्या पानोपानी दिसतो. आपण शक्तीची उपासना केला पाहिजे. उपनिषदे म्हणजे सामथ्यार्चा अक्षयकोषच आहेत. सर्व विश्व गदगदा हलवील, असे सामर्थ्य उपनिषदांमध्ये भरलेले आहे. सारे विश्व त्यांच्या संदेशाने चैतन्यमय होईल, सामर्थ्यमय होईल.’इतरा नावाची तपस्विनी होती. तिचा पुत्र ऐतरेय. त्याने रचलेले उपनिषद ते ऐतरेय उपनिषद! हे उपनिषद ऋग्वेदावर आधारलेले आहे. ऋग्वेद हा सर्वात प्राचीन ग्रंथ. ऋषींनी जे पाहिले, अनुभवले, त्यावर त्यांनी विचार केला. त्याचा अनुभव घेऊन जीवनावर होणारा त्याचा परिणाम पाहिला. त्या वेळी त्यांच्या मुखातून बाहेर पडलेले मंत्र... मंत्र लिहिले जात नाहीत, ते रचले जातात. ते रचणाऱ्या ऋषींना मंत्रद्रष्टेच म्हणतात.उपनिषदात शांतिमंत्र असतात. शांतिमंत्र म्हणजे शांतीची इच्छा करणारे मंत्र असतात. शांतिमंत्राचा उद्देश हा पठण करणाºयाचे मन आणि तेथील वातावरण शांत करणे हा असतो. असे मानले जाते की, शांतिमंत्र सुरुवातीला म्हणल्यावर कार्यात बाधा येत नाही. हा मंत्र समाप्त करताना तीनदा ‘शांति शांति शांति’ असे म्हणतात.१) आधिभौतिक २)आधिदैविक ३) आध्यात्मिकवेगवेगळ्या उपनिषदात वेगवेगळे शांतिमंत्र आहेत. इथे आपण ऐतरेय उपनिषदातील शांतिमंत्र घेणार आहोत.ऐतरेय उपनिषद शांतिमंत्रॐ वाङ् मे मनसि प्रतिष्ठिता। मनो मे वाचि प्रतिष्ठितम।आविराविर्म एधि। वेदस्य म आणीस्थ:।श्रुतं मे मा प्रहासी: अनेनाधीतेनाहोरात्रान्सन्दधामि ।ऋतं वदिष्यामि। सत्यं वदिष्यामि। तन्मामवतु। तद्वक्तारमवतु। अवतु माम। अवतु वक्तारामवतु वक्तारम॥ ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ॥याचा अर्थ मी काव्यातून मांडला आहे.ॐ माझी वाणी मनामध्ये, राहो दृढ, नि सुस्थिर,सत्य शिवाचे विचार, मनी येवो निरंतरवाणीमध्ये येवो नित्य, प्रतिबिंब ते मनीचे,राहो सुस्थिर, सुंदर, शब्द शब्द अंतरीचे.देई दर्शन ईश्वरा, देई वेदांचे ते ज्ञानअहोरात्र अध्ययन, त्याचे न हो विस्मरण,ध्यास घेईन ज्ञानाचा, मनोवाचेने वेदांचा,नित्य सत्य मी बोलेन, नित्य सत्य आचरेनकर रक्षण स्वसंवेद्या, कर रक्षण तू माझे,कर रक्षण वक्त्याचे, कर रक्षण श्रोत्याचे.ॐ शान्ति: शांति: शांति:..खरोखर अतिशय सुंदर विचार आहेत या शांतिमंत्रात...!प्रज्ञान आत्म्याला समजावून घेऊन आपल्या प्रत्येक कृतीतून, चालण्या - बोलण्यातून वागण्यातून आम्ही जगू. ही आत्म्याची शक्ती , स्वरूप वाणीमध्ये सतत जागृत राहू दे. वेदांनी सांगितलेले उत्तम ज्ञान चराचराकडून ग्रहण करावे. त्याचा अनुभव घ्यावा. मी संकल्प नव्हे, प्रतिज्ञा करीन, ‘सत्य बोलेन, ऋत बोलेन. जे सत्य, पवित्र आणि सनातन असेल, जे कधीही बदलणार नाही, तेच मी माझ्या शब्दातून व्यक्त करीन.’