शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

पंढरीसी जा रे आल्यानो संसारा। दिनाचा सोयरा पांडुरंग॥’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 20:49 IST

आषाढी वारी सोहळा

आषाढी वारी सोहळा हा संत ज्ञानेश्वर माऊलींनी सुरू केलेला असला तरी माऊलींना ज्या भाविकांची चिंता, तो वारकरी भाविक ऊन, वारा पाऊस, सोयीसुविधा यांची तमा न बाळगता वारीत चालत राहतो. कारण त्याला भेटायचे असते ते परब्रह्म पांडुरंगाला. पालखी सोहळ्यात सर्वांत पुढे पायी चालणारा श्री माऊलींचा अश्व हा श्रीमंत शितोळे सरकार यांचे अंकली-बेळगाव (कर्नाटक) येथून श्रीक्षेत्र आळंदीस परंपरेनुसार पायीच आणला जातो. विशेष हे की, या अश्वावर कोणीही स्वार झालेला नसतो. हा अश्व ज्येष्ठ शुद्ध एकादशीला अंकलीवरून प्रस्थान करतो आणि ज्येष्ठ वद्य सप्तमीला आळंदीत प्रवेश करतो.

आळंदीला इंद्रायणी नदीजवळ अश्व आले की, श्रीमंत शितोळे सरकारांचे प्रतिनिधी तसा निरोप मंदिरात सोहळ्याचे मालक व चोपदार यांना देतात. त्यानंतर श्री हैबतबाबांची दिंडी अश्वांच्या स्वागतासाठी जाते. अश्वांची पूजा केली जाते. त्यानंतर वाजत-गाजत अश्वांना उत्साहात मंदिरात आणले जाते. अश्वांच्या स्वागतासाठी मंदिरात पायघड्या घातलेल्या असतात. अश्वाला आळंदीस पायी आणण्यामागे केवळ परंपराच नाही तर एक श्रद्धाही जोडलेली आहे की, हा अश्व अंकली (बेळगाव) वरून आळंदीला येताना ज्या-ज्या गावी जातो तेथील जनसमुदाय त्याचे श्रद्धेने दर्शन घेतात. कारण त्याची केलेली पूजा व दर्शन श्री संत माऊलींकडे आणि पंढरीच्या विठुरायाकडे पोहोचते, अशी दृढ श्रद्धा असते. संपूर्ण वारीतील सकाळच्या वेळेस दोनच ठिकाणी आरती होते. थोरल्या पादुका (चहोर्ली) आणि पुणे येथील शिंदे छत्रीपाशी.

श्रीमंत शिंदे सरकार यांनी त्या काळात माऊलींच्या मंदिर व्यवस्थेसाठी आळंदी हे गाव इनाम दिले होते. श्री गुरू हैबतबाबा हे शिंदे सरकार यांच्या पदरी सरदार होते. माऊलींच्या मंदिरातील महाद्वार, नगारखाना, वीणा मंडप, परिसर हे शिंदे सरकार यांनीच बांधले. श्रीमंत शिंदे सरकारांच्या याच सेवेचे स्मरण म्हणून त्यांचे समाधीस्थळ असलेल्या शिंदे छत्री येथे सकाळची आरती होते. वाखरी येथून पंढरीस पालखी जाताना श्री माऊलींच्या पादुका रथातून उतरवून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या गळ्यात दिल्या जातात. संपूर्ण पालखी सोहळ्यात मानाच्या कीर्तनाव्यतिरिक्त इतर कुठलेही कीर्तन होत नाही आणि फक्त एकच कीर्तन सर्वांनी मिळून केले जाते. या कीर्तनाला प्रत्येक दिंडीतील प्रमुख व वारकरी उपस्थित राहतात. परंपरा सांभाळून कीर्तन करावे लागते. त्यामुळे या कीर्तनाचा मान आणि आनंद हा आगळावेगळा आहे. ‘कीर्तन चांग कीर्तन चांग।

होय अंग हरी रूप॥’ या कीर्तनसेवा श्री हैबतबाबांपासून परंपरेने चालत आलेल्या आहेत आणि आजही त्यांचे वंशज अतिशय श्रद्धेने त्या पार पाडत आहेत. कीर्तन हे समाज प्रबोधनाचे श्रेष्ठ माध्यम आहे. समाज मनावर कीर्तनाचा प्रभावही मोठा असल्याने कीर्तनकारांची संख्या वाढली आहे. त्यामध्ये सेवाभावाचे व कलात्मक असे दोन प्रकार पाहावयास मिळू लागले आहेत. पण संप्रदायातील परंपरा विचारात घेऊन सेवाभावाचे कीर्तन स्वीकारून वारीमध्ये परंपरा सुरू केली. - सुधाकर इंगळे महाराज

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिकPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा