शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पंढरीसी जा रे आल्यानो संसारा। दिनाचा सोयरा पांडुरंग॥’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 20:49 IST

आषाढी वारी सोहळा

आषाढी वारी सोहळा हा संत ज्ञानेश्वर माऊलींनी सुरू केलेला असला तरी माऊलींना ज्या भाविकांची चिंता, तो वारकरी भाविक ऊन, वारा पाऊस, सोयीसुविधा यांची तमा न बाळगता वारीत चालत राहतो. कारण त्याला भेटायचे असते ते परब्रह्म पांडुरंगाला. पालखी सोहळ्यात सर्वांत पुढे पायी चालणारा श्री माऊलींचा अश्व हा श्रीमंत शितोळे सरकार यांचे अंकली-बेळगाव (कर्नाटक) येथून श्रीक्षेत्र आळंदीस परंपरेनुसार पायीच आणला जातो. विशेष हे की, या अश्वावर कोणीही स्वार झालेला नसतो. हा अश्व ज्येष्ठ शुद्ध एकादशीला अंकलीवरून प्रस्थान करतो आणि ज्येष्ठ वद्य सप्तमीला आळंदीत प्रवेश करतो.

आळंदीला इंद्रायणी नदीजवळ अश्व आले की, श्रीमंत शितोळे सरकारांचे प्रतिनिधी तसा निरोप मंदिरात सोहळ्याचे मालक व चोपदार यांना देतात. त्यानंतर श्री हैबतबाबांची दिंडी अश्वांच्या स्वागतासाठी जाते. अश्वांची पूजा केली जाते. त्यानंतर वाजत-गाजत अश्वांना उत्साहात मंदिरात आणले जाते. अश्वांच्या स्वागतासाठी मंदिरात पायघड्या घातलेल्या असतात. अश्वाला आळंदीस पायी आणण्यामागे केवळ परंपराच नाही तर एक श्रद्धाही जोडलेली आहे की, हा अश्व अंकली (बेळगाव) वरून आळंदीला येताना ज्या-ज्या गावी जातो तेथील जनसमुदाय त्याचे श्रद्धेने दर्शन घेतात. कारण त्याची केलेली पूजा व दर्शन श्री संत माऊलींकडे आणि पंढरीच्या विठुरायाकडे पोहोचते, अशी दृढ श्रद्धा असते. संपूर्ण वारीतील सकाळच्या वेळेस दोनच ठिकाणी आरती होते. थोरल्या पादुका (चहोर्ली) आणि पुणे येथील शिंदे छत्रीपाशी.

श्रीमंत शिंदे सरकार यांनी त्या काळात माऊलींच्या मंदिर व्यवस्थेसाठी आळंदी हे गाव इनाम दिले होते. श्री गुरू हैबतबाबा हे शिंदे सरकार यांच्या पदरी सरदार होते. माऊलींच्या मंदिरातील महाद्वार, नगारखाना, वीणा मंडप, परिसर हे शिंदे सरकार यांनीच बांधले. श्रीमंत शिंदे सरकारांच्या याच सेवेचे स्मरण म्हणून त्यांचे समाधीस्थळ असलेल्या शिंदे छत्री येथे सकाळची आरती होते. वाखरी येथून पंढरीस पालखी जाताना श्री माऊलींच्या पादुका रथातून उतरवून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या गळ्यात दिल्या जातात. संपूर्ण पालखी सोहळ्यात मानाच्या कीर्तनाव्यतिरिक्त इतर कुठलेही कीर्तन होत नाही आणि फक्त एकच कीर्तन सर्वांनी मिळून केले जाते. या कीर्तनाला प्रत्येक दिंडीतील प्रमुख व वारकरी उपस्थित राहतात. परंपरा सांभाळून कीर्तन करावे लागते. त्यामुळे या कीर्तनाचा मान आणि आनंद हा आगळावेगळा आहे. ‘कीर्तन चांग कीर्तन चांग।

होय अंग हरी रूप॥’ या कीर्तनसेवा श्री हैबतबाबांपासून परंपरेने चालत आलेल्या आहेत आणि आजही त्यांचे वंशज अतिशय श्रद्धेने त्या पार पाडत आहेत. कीर्तन हे समाज प्रबोधनाचे श्रेष्ठ माध्यम आहे. समाज मनावर कीर्तनाचा प्रभावही मोठा असल्याने कीर्तनकारांची संख्या वाढली आहे. त्यामध्ये सेवाभावाचे व कलात्मक असे दोन प्रकार पाहावयास मिळू लागले आहेत. पण संप्रदायातील परंपरा विचारात घेऊन सेवाभावाचे कीर्तन स्वीकारून वारीमध्ये परंपरा सुरू केली. - सुधाकर इंगळे महाराज

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिकPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा