शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सबके लिए खुला है, मंदिर यह हमारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 14:20 IST

या भारत भूमित अनेक संत-महंत होऊन गेले आहेत; परंतु राष्ट्रसंत एकच झालेले आहेत, ते म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ...

या भारत भूमित अनेक संत-महंत होऊन गेले आहेत; परंतु राष्ट्रसंत एकच झालेले आहेत, ते म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होत. म्हणूनच स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी सन १९४९ ला महाराजांना राष्ट्रसंत ही उपाधी बहाल केली तेव्हापासून महाराजांच्या नावापुढे राष्ट्रसंत हे नाव प्रकाशात व प्रचारात आले आहे. अमरावती शहराजवळील यावली या गावी श्री बंडोजी अर्थात नामदेव गणेशपंत इंगळे- ठाकूर व मातोश्री मंजुळादेवी या दाम्पत्यांच्या पोटी ब्रह्ममुहूर्तावर ३0 एप्रिल १९0९ रोजी झालेल्या सुपुत्राचा जन्म म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होत. सोमवारी ५0 वी पुण्यतिथी सुवर्ण महोत्सवी वर्षे सोहळा सर्वत्र संपन्न होत आहे.एकदा आपला मुलगा माणिकदेव यास मातोश्री मंजुळादेवी गुरुवर्य संत आडकोजी महाराजांच्या दर्शनाला वरखेडला घेऊन गेली असता, महाराजांनी माणिकदेवच्या तोंडात भाकरीचा तुकडा कोंबला व ‘तुकड्या तुकड्या’ म्हणून संबोधू लागलेत तेव्हापासून ‘तुकड्या’ हे नाव माणिकदेवांचे प्रचारात आले आहे. सन १९२१ ला सद्गुरु संत श्री आडकोजी महाराज शतायुषी होऊन त्यांचे महानिर्वाण झाले. त्यामुळे त्यांचे शिष्य असलेले संत तुकडोजी महाराजांना गुरुविरहाचा असह्य धक्का बसला. त्यांना अतोनात दु:ख झाले व ते या विरहात असताना पंढरीला निघून गेलेत. पंढरपूर येथील माता-पित्याची सेवा करणाऱ्या भक्त पुंडलिकाचा आदर्श घेऊन आपल्या मातोश्रीची सेवा स्वत: अखंडपणे करण्याचा निर्धार त्यांनी केला. तेव्हापासून ते आपल्या मातोश्रीची विशेष काळजी घेऊन त्यांची अहोरात्र सेवा केलेली आहे. आपल्या उदरनिर्वाहाकरिता शिवणकाम करून शेवटपर्यंत तिचा मनोभावे सांभाळ केला आहे.अवघ्या वयाच्या २0 व्या वर्षी सन १९२९ मध्ये महाराजांचा पहिला हिंदी भजनमालिका संग्रह प्रकाशित झाला आहे. सन १९३0 ला वैदर्भीय गोंडवनातील सत्याग्रह व १९३५ ला सालबडी येथील महायज्ञ आणि सन १९४१ ला ‘युवकांचा स्वतंत्र राष्ट्रधर्म शिक्षण वर्ग’ महाराजांनी घेऊन प्रत्येक दिवशी हजारो युवकांमध्ये आपल्या प्रभावी भजन-भाषणातून राष्ट्राबाबत भक्ती, प्रेम व निष्ठा जागृत केली आहे.सबके लिये खुला है, मंदिर यह हमारा।।आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी ।।देशी विदेशियोका मंदिर ये हमारा ।।सर्व, धर्म, पंथ, जाती पलीकडचे असलेले ईश्वराचे असणारे स्वरूप ते आपल्या रसाळ वाणीद्वारे भजनातून प्रगट करतात. महाराज आपल्या मनातील भावभक्तीला महत्त्व देतात. ते म्हणतात,मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव।देव अशाने, भेटायचा नाही हो ।देव बाजारचा भाजीपाला नाही हो ।।आणि शेवटच्या चरणात महाराज म्हणतात,देवाचे देवत्व आहे ठायी ठायी ।मी तू गेल्याविना अनुभव नाही ।।महाराजांना माणसातील माणुसकी अभिप्रेत होती. म्हणून ते म्हणतात ‘माणूस द्या मज, माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला। प्रत्येक माणसात ईश्वरी तत्त्व असल्याचे महाराजांनी प्रतिपादन केले आहे.सन १९४२ च्या महात्मा गांधीजींच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी अपूर्व रंग भरला. तसेच १९४३ मध्ये ‘श्रीगुरुदेव’ मासिकाचा शुभारंभ केला आहे. लगेच ‘गुरुदेव सेवा मंडळाची’ स्थापना करून गावोगावी प्रचार व प्रसाराद्वारे असंख्य शाखा आपल्या राज्यात निर्माण केल्या आहेत. ज्याद्वारे ग्रामीण उद्योग वर्ग, व्यायाम वर्ग, आयुर्वेद वर्ग, महिलोन्नती वर्ग, रामधून, सामूहिक प्रार्थना, पंचमहोत्सव तसेच विविध स्पर्धा गावोगावी नियोजनबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने होऊ लागल्यात. गावागावांमधील संघटनेस त्यांनी महत्त्व देऊन त्याद्वारे ग्रामचा म्हणजेच गावांचा विकास साधण्यावर त्यांनी भर दिला असून, गावाचा सर्वांगीण विकास हा केंद्रबिंदू मानला आहे.गावातील एक एक माणूस जर आपण जोडला तर संघटन मजबूत होऊन त्यावर गावाचा विकास साधता येतो, याकरिता गावामधील ‘त्यागी, निर्भय व उज्ज्वल चारित्र्य’ असणाºया व्यक्तीची निवड या गाव संघटनेमध्ये करावी, ज्याद्वारे विधायक, रचनात्मक कार्य संघटनेला करता येईल. त्यामुळे गावाची प्रगती होईल, असे महाराज म्हणतात.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भरपूर ग्रंथसंपदा असून, त्यांचे विपुल साहित्य हिंदी व मराठी भाषेत प्रसिद्ध आहे. त्यांची ग्रामगीता, गीताप्रसाद, सार्थ आनंदामृत, बोधामृत त्याचप्रमाणे मराठी भाषेत ११६0 भजने, २१0९ अभंग, १0 पोवाडे, ७७६ श्लोक, ५१४९ ओव्या, १६ मंगलाष्टके व हिंदी भाषेत २३६९ भजने, १७६६ बरखा, १५१७ सद्विचार, प्रार्थनाष्टकांचे ८२ श्लोक, १३ आरत्या, ४ स्वागतगीते त्याचप्रमाणे ६00 च्या वर हिंदी व मराठी भाषण लेख इ. प्रकाशित आहेत.गावांवरून देशाची परीक्षा केली जाते. गावाची उन्नती ही देशाच्या प्रगतीस कारणीभूत ठरते. आपले गाव जर भंगले तर गावाला पर्यायाने आपल्या देशाला अवदशा आल्याशिवाय राहणार नाही, असे महाराजांना वाटते. जनसेवा हीच ईश्वरसेवा मानत असत. त्यामुळे समाजातील माणसामाणसांमध्ये परस्पर प्रेमाचे, सलोख्याचे, सहानुभूतीचे व सहकार्याचे वातावरण निर्माण व्हावे, असे त्यांना मनापासून वाटते. प्रत्येक व्यक्ती, गाव व राष्ट्र स्वावलंबी होऊन नवसमाज निर्मिती हे त्यांचे स्वप्न ग्रामगीतेतून साध्य होणार असल्याचा दृढ आत्मविश्वास त्यांचा आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य व कार्यकर्तृत्वाने समाजाला निरंतर जागृत/ प्रेरित करण्याचे महान कार्य केले आहे. त्यांच्या साहित्यातील सहजवाणी, ओजस्वी भाषण तसेच रसाळ वाणीतील भजनातून समाजाचा उद्धार करण्याचा उपदेश केलेला आहे. या त्यांच्या साहित्यामधून समाजाला शिकविण्याचे महान कार्य घडले आहे. म्हणून आपला जीव त्यांना अर्पण केला तरीही त्यांच्या उपकाराची परतफेड समाजाकडून होऊ शकत नाही.

- डॉ. शांताराम बुटे, प्राचार्य 

टॅग्स :AkolaअकोलाRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजspiritualअध्यात्मिक