शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

नामस्मरणच खरा यज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 05:47 IST

भारतीय संत परंपरा आणि विविध धर्म संप्रदायांनी नवविधा भक्ती प्रकाराचेच वर्णन येनकेन प्रकारे केले आहे. या नवविधा भक्ती प्रकारातील भगवंताच्या सत्यस्वरूपास जाणून घेण्याचा सुलभ प्रकार म्हणजे नामस्मरणाची भक्ती होय.

-प्रा. शिवाजीराव भुकेलेभारतीय संत परंपरा आणि विविध धर्म संप्रदायांनी नवविधा भक्ती प्रकाराचेच वर्णन येनकेन प्रकारे केले आहे. या नवविधा भक्ती प्रकारातील भगवंताच्या सत्यस्वरूपास जाणून घेण्याचा सुलभ प्रकार म्हणजे नामस्मरणाची भक्ती होय. नामस्मरणाच्या भक्तीत जात, धर्म, वर्ण, प्रांत यापैकी कशाच्याही कुबड्या वापराव्या लागत नाहीत. स्वत:च्या पायावर, हातावर, मुख आणि मस्तकावर विश्वास ठेवून ईश्वरी भक्तीसमोर आपल्यास आहे तसे प्रस्तुत केले की, नामघोषाची गंगा धो-धो वाहू लागते. भावाचा खुंट जेव्हा नामस्मरणासारख्या साधनाने हलवून बळकट केला जातो, तेव्हा भक्तीच्या भूमीला सुख-दु:खाचे व हर्ष-विषादाचे तडे जात नाहीत म्हणून परमार्थाच्या क्षेत्रात नामस्मरणाची भक्ती जसे प्रारंभिक साधन आहे तसे अंतिम साध्यसुद्धा आहे. नामधारक भक्त नामस्मरणाच्या अव्यभिचारी भावनेवर दृढ राहतो. कारण त्याला माहीत असते पुढे नामभक्तीच्या माउलीने भक्त नावाच्या बालकाला आपली करंगळी दिली की, ज्ञान, वैराग्य, योग, शास्त्र, वेद, वेदांत हे आपोआप त्या भक्ती माउलीच्या पाठीमागे चालू लागतात. शिवाय साधनांच्या भाऊगर्दीत जेव्हा जीवन गुदमरू लागते तेव्हा आत्मसुखाचा आनंद आपोआपच दूर जाऊ लागतो. म्हणूनच तर नामस्मरणासारखे एकमेव साधन भक्तांच्या हाती देताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,नाम जप यज्ञु तो परम । बाधु न शके स्नानादी कर्मेनामे पावन धर्मा धर्म । नाम परब्रह्म वेदार्थे।।नाम हाच या विश्वातील फुकाचा यज्ञ आहे. इतर याज्ञिक प्रक्रियेत वेळ, श्रम, धन तर खर्च होतेच; पण हाती मात्र काहीच लागत नाही. सोवळ्या-ओवळ्यांच्या भाऊगर्दीत कधी-कधी नामस्मरणाकडे दुर्लक्ष होऊन नको त्या कर्मकांडाला महत्त्व येते. खरे तर निरागस बालकांचे हास्य, चांदण्याचा पिठूर प्रकाश, चंद्रकिरणातून स्रवणारे अमृतकण, सूर्य नारायणाच्या सहस्रावधी किरणांतून मिळणारी ऊर्जा ही जशी निसर्गदत्त प्रक्रिया आहे तसे नामस्मरण आहे. नाम कुणाचेही घ्यावे, नाम कुणीही घ्यावे व नाम कोठेही घ्यावे, ते फक्त आंतरिक सद्भावाने आणि आत्यंतिक सहजतेने घ्यावे तेव्हा ते सद्भक्ताला द्यायचे ते फल योग्यवेळी देणारच. सचैल स्नान न करता भाकरी खाल्ली व पाणी प्याले तर भूक, तहान भागू शकत नाही, असे कधीच होऊ शकत नाही. तसे नामस्मरण घेणाऱ्यांच्या देहाची औपचारिकता महत्त्वाची नसून, त्याची भक्ती, भावना महत्त्वाची आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक