शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

भुके नाही अन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 05:34 IST

खरे तर मातृ देवो भव: पितृ देवो भव: अशी शिकवण देणारी आपली संस्कृती.

- प्रा. शिवाजीराव भुकेले

आपला देश तसा धर्मप्रवण आहे. इथे जेवढे धार्मिक सोहळे साजरे होतात, तेवढे जगाच्या पाठीवर कदाचित कोठेच होत नसतील. खरे तर मातृ देवो भव: पितृ देवो भव: अशी शिकवण देणारी आपली संस्कृती. ज्याला माता-पित्यांच्या पायाचे चरणतीर्थ मिळते, त्याला इतर कुठल्याच तीर्थाची गरज नसते. हा आदर्शवाद एका बाजूला आपली बोथट होत चाललेली संवेदना आई-बापांनाच आपला वैरी मानू लागली आहे. हा आत्मघात आहे, जो कुटुंब व्यवस्थेचा कणाच मोडून टाकणारा आहे. अशा माता-पिताद्वेषी माणसांच्याविषयी संत नामदेव म्हणाले होते -जयाचे उदरी जन्माला जों नर । पीडी तया थोर सर्वकाळ ।मानीली अंतरी सखी जीवलग। आत्महत्या मग घात करी ।नामा म्हणे ऐसें पातकी चंडाळ बुडविले कुळ बेचाळीस। ज्यांच्या पोटी जन्म घ्यायचा, त्यांनाच एवढे पिडायचे की, बिचाऱ्या माता-पित्यांना या छळवणुकीपेक्षा मरण बरे वाटावे. अशा कुटुंबद्रोही दिवट्यांना संत नामदेवांनी चंडाळ म्हटले आहे. अशा नराधमास जन्म देण्यापेक्षा वांझोटे राहिलो असतो तर खूप बरे झाले असते अशी पश्चात्तापाची वेळ आज अनेक माता-पित्यांवर येत आहे. त्यामुळे घरे ओस पडत आहेत आणि वृद्धाश्रम ‘हाउसफुल्ल’ होत आहेत. आत्मा-परमात्म्याच्या मिलनाच्या गप्पा मारीत आहेत. आपल्या आई-बाबांना कडकडून भूक लागायची, तेव्हा त्यांना वेळेवर कोरभर भाकरी न देणारी मंडळी भौतिक ऐश्वर्याची सूज आल्यानंतर मोठमोठ्या तीर्थक्षेत्रात जाऊन आई-बाबांच्या नावाने पिंंडदान करीत आहेत. त्यापेक्षा हा ‘पीळदार’ देह दिला, त्यांना जिवंतपणी अन्न, वस्त्र, निवाºयाचे छत्र आणि पुत्राचे वात्सल्य देऊ या ! नाहीतर तुकोबारायांनी म्हटलेच आहे -भुके नाही अन्न । मेल्यावरी पिंंडदान ।हे तो चाळवा चाळवी । केले आपणीच जेवीं ।नैवेद्याचा आळ । वेचे ठाकनी सकळ ।तुका म्हणे जड । मज न राखावे दगड ।

टॅग्स :spiritualअध्यात्मिक