शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

जनतेला विवेकानंदांचे विचार आत्मसात करायला शिकवण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 08:09 IST

देशात दोन धर्मात जी अढी आणि विद्वेशाचे वातावरण पसरत आहे ते पाहिले तर आज स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करत असताना त्यांच्या विचारांचे स्मरण आणि आचरण करण्याची नितांत जरुरी आहे

- देवेंद्र कांदोळकरभगवे वस्त्र आणि नावाआधी आलेला ‘स्वामी’ हा शब्द पाहून अनेकानां विवेकानंद हे कट्टर हिन्दुत्ववादी होते, असे वाटत आले आहे. सध्या आपल्या देशात दोन धर्मात जी अढी आणि विद्वेशाचे वातावरण पसरत आहे ते पाहिले तर आज स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करत असताना त्यांच्या विचारांचे स्मरण आणि आचरण करण्याची नितांत जरुरी आहे.अलीकडे एनकेन प्रकारे हिंदुत्वाचे धृवीकरण केले जात आहे आणि मुस्लीमद्वेष झपाट्याने फैलावत आहे. ‘देश सध्या कठीण काळातून जात आहे. हिंसाचार थांबल्याशिवाय नागरिकत्व कायद्याच्या घटनात्मक वैधतेवर सुनावणी न करण्याचा निर्णय’ भारताच्या सरन्यायधिशाना घ्यावा लागत आहे . अशा या पार्श्वभूमीवर आज स्वामी विवेकानंद असते तर काय म्हणाले असते ?‘आपल्या मायभूमीच्या दृष्टीने विचार करता हिंदू धर्म आणि इस्लाम धर्म यांचा समन्वय अर्थात वेदांतातील एकत्वाचे तत्वज्ञान आणि इस्लाम धर्मामधील प्रत्यक्षातील समता यांचा मिलाफ हेच एकमेव आशास्थान आहे . वेदांती मेंदू आणि इस्लामी देह धारण करून भावी भारत उदयास येणार आहे...’

इस्लामलाही सलाम करणाऱ्या स्वामी विवेकानंदांचे हे विचार आपण कधी समजून घेणार?विवेकानंद म्हणायचे, ‘माझा तर असा अनुभव आहे की आजवर जर कोणता धर्म समतेच्या निकट पोहोचला असेल तर तो इस्लाम धर्मच आहे . भारतावर मुसलमानांनी मिळवलेला विजय गरिबांच्या व दलितांच्या उन्नतीस कारणीभूत झाला म्हणूनच आपल्यापैकी एक पंचमांश लोक मुसलमान बनले. तलवार आणि विध्वंस याच्या जोरावर इस्लामने धर्मांतर केले असे म्हणणे मुर्खपणा आहे .’स्वामींच्या या सांगण्याने आमच्यात शहाणपण येईल का?‘जग आज सहिष्णूतेच्या तत्वाची अपेक्षा करत आहे. धर्म सहिष्णुता आत्मसात केल्याशिवाय कोणतीच सभ्यता दीर्घकाळ टिकू शकणार नाही. दुराग्रह, रक्तपात व पाशवी अत्याचार थांबविल्याशिवाय कोणत्याही सभ्यतेचा विकास होणे शक्य नाही. एकमेकांकडे सहानुभूतीने पाहिल्याशिवाय कोणतीही सभ्यता डोके वर काढू शकणार नाही. सहानुभूती निर्माण करण्याची पहिली पायरी म्हणजे एकमेकांच्या धार्मिक मतांकडे सहानुभूतीने पाहाणे. आपल्या धर्म कल्पना व समजुती कितीही भिन्न असल्या तरी आपण परस्परांना सहाय्य केले पाहिजे.’
जनतेला आपण विवेकानंदांचे हे विचार आत्मसात करायला शिकवणार की त्यांना दुराग्रह, कट्टरता, सांप्रदायिकतेच्या गर्तेत ढकलणार?वयाच्या तिसाव्या वर्षी शिकागो येथील विश्व धर्म संमेलनप्रसंगी भाषण करतेवेळी स्वामी विवेकानंद म्हणाले होते, ‘माझ्या भगिनीनो आणि बंधुनो , सर्व धर्मांची जननी असलेल्या, सर्व जाती - पंथांच्या लाखो- करोडो हिंदूंच्या वतीने आपल्याला मन:पूर्वक धन्यवाद देतो. जगातील सहिष्णुता व सर्वसमावेशकतेचा संदेश देणाऱ्या धमार्चा एक भाग असल्याचा मला अभिमान आहे. आम्ही केवळ सर्वसमावेशकता आणि सहिष्णुतेवरच विश्वास ठेवतो असे नाही तर जगातील प्रत्येक धर्माचा सत्य म्हणून स्वीकार करतो. जगाच्या पाठीवरील सर्व देशातील आणि धर्मातील पीडित व गांजलेल्या लोकांना आश्रय देणाºया देशाचा नागरिक असल्याचा मला आभिमान आहे.’स्वामी विवेकानंदांच्या जयंती दिनी विविध कार्यक्रम व परिषदा आयोजन करणारे कार्यकर्ते , भगवी वस्त्र परिधान करणारे योगी, ‘मेरे प्यारे भाईयो और बहनो...’ अशा सुरुवातीसह भाषणे करणारे नेते आणि श्रोते यांनी आता स्वत:लाच विचारायची वेळ आली आहे ; आपण सारे स्वामी विवेकानंदांना अभिमान वाटणाऱ्या उपरोल्लोखित शिकवणीचा मान राखतो की अवमान करतो ?

टॅग्स :Swami Vivekanandaस्वामी विवेकानंदAdhyatmikआध्यात्मिकHinduismहिंदुइझमIslamइस्लाम