शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जनतेला विवेकानंदांचे विचार आत्मसात करायला शिकवण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 08:09 IST

देशात दोन धर्मात जी अढी आणि विद्वेशाचे वातावरण पसरत आहे ते पाहिले तर आज स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करत असताना त्यांच्या विचारांचे स्मरण आणि आचरण करण्याची नितांत जरुरी आहे

- देवेंद्र कांदोळकरभगवे वस्त्र आणि नावाआधी आलेला ‘स्वामी’ हा शब्द पाहून अनेकानां विवेकानंद हे कट्टर हिन्दुत्ववादी होते, असे वाटत आले आहे. सध्या आपल्या देशात दोन धर्मात जी अढी आणि विद्वेशाचे वातावरण पसरत आहे ते पाहिले तर आज स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करत असताना त्यांच्या विचारांचे स्मरण आणि आचरण करण्याची नितांत जरुरी आहे.अलीकडे एनकेन प्रकारे हिंदुत्वाचे धृवीकरण केले जात आहे आणि मुस्लीमद्वेष झपाट्याने फैलावत आहे. ‘देश सध्या कठीण काळातून जात आहे. हिंसाचार थांबल्याशिवाय नागरिकत्व कायद्याच्या घटनात्मक वैधतेवर सुनावणी न करण्याचा निर्णय’ भारताच्या सरन्यायधिशाना घ्यावा लागत आहे . अशा या पार्श्वभूमीवर आज स्वामी विवेकानंद असते तर काय म्हणाले असते ?‘आपल्या मायभूमीच्या दृष्टीने विचार करता हिंदू धर्म आणि इस्लाम धर्म यांचा समन्वय अर्थात वेदांतातील एकत्वाचे तत्वज्ञान आणि इस्लाम धर्मामधील प्रत्यक्षातील समता यांचा मिलाफ हेच एकमेव आशास्थान आहे . वेदांती मेंदू आणि इस्लामी देह धारण करून भावी भारत उदयास येणार आहे...’

इस्लामलाही सलाम करणाऱ्या स्वामी विवेकानंदांचे हे विचार आपण कधी समजून घेणार?विवेकानंद म्हणायचे, ‘माझा तर असा अनुभव आहे की आजवर जर कोणता धर्म समतेच्या निकट पोहोचला असेल तर तो इस्लाम धर्मच आहे . भारतावर मुसलमानांनी मिळवलेला विजय गरिबांच्या व दलितांच्या उन्नतीस कारणीभूत झाला म्हणूनच आपल्यापैकी एक पंचमांश लोक मुसलमान बनले. तलवार आणि विध्वंस याच्या जोरावर इस्लामने धर्मांतर केले असे म्हणणे मुर्खपणा आहे .’स्वामींच्या या सांगण्याने आमच्यात शहाणपण येईल का?‘जग आज सहिष्णूतेच्या तत्वाची अपेक्षा करत आहे. धर्म सहिष्णुता आत्मसात केल्याशिवाय कोणतीच सभ्यता दीर्घकाळ टिकू शकणार नाही. दुराग्रह, रक्तपात व पाशवी अत्याचार थांबविल्याशिवाय कोणत्याही सभ्यतेचा विकास होणे शक्य नाही. एकमेकांकडे सहानुभूतीने पाहिल्याशिवाय कोणतीही सभ्यता डोके वर काढू शकणार नाही. सहानुभूती निर्माण करण्याची पहिली पायरी म्हणजे एकमेकांच्या धार्मिक मतांकडे सहानुभूतीने पाहाणे. आपल्या धर्म कल्पना व समजुती कितीही भिन्न असल्या तरी आपण परस्परांना सहाय्य केले पाहिजे.’
जनतेला आपण विवेकानंदांचे हे विचार आत्मसात करायला शिकवणार की त्यांना दुराग्रह, कट्टरता, सांप्रदायिकतेच्या गर्तेत ढकलणार?वयाच्या तिसाव्या वर्षी शिकागो येथील विश्व धर्म संमेलनप्रसंगी भाषण करतेवेळी स्वामी विवेकानंद म्हणाले होते, ‘माझ्या भगिनीनो आणि बंधुनो , सर्व धर्मांची जननी असलेल्या, सर्व जाती - पंथांच्या लाखो- करोडो हिंदूंच्या वतीने आपल्याला मन:पूर्वक धन्यवाद देतो. जगातील सहिष्णुता व सर्वसमावेशकतेचा संदेश देणाऱ्या धमार्चा एक भाग असल्याचा मला अभिमान आहे. आम्ही केवळ सर्वसमावेशकता आणि सहिष्णुतेवरच विश्वास ठेवतो असे नाही तर जगातील प्रत्येक धर्माचा सत्य म्हणून स्वीकार करतो. जगाच्या पाठीवरील सर्व देशातील आणि धर्मातील पीडित व गांजलेल्या लोकांना आश्रय देणाºया देशाचा नागरिक असल्याचा मला आभिमान आहे.’स्वामी विवेकानंदांच्या जयंती दिनी विविध कार्यक्रम व परिषदा आयोजन करणारे कार्यकर्ते , भगवी वस्त्र परिधान करणारे योगी, ‘मेरे प्यारे भाईयो और बहनो...’ अशा सुरुवातीसह भाषणे करणारे नेते आणि श्रोते यांनी आता स्वत:लाच विचारायची वेळ आली आहे ; आपण सारे स्वामी विवेकानंदांना अभिमान वाटणाऱ्या उपरोल्लोखित शिकवणीचा मान राखतो की अवमान करतो ?

टॅग्स :Swami Vivekanandaस्वामी विवेकानंदAdhyatmikआध्यात्मिकHinduismहिंदुइझमIslamइस्लाम