शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नवरात्र : भारतात नांदणा-या कृषिप्रधान संस्कृतीतील एक कृषी लोकोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 03:12 IST

आध्यात्मिक, पौराणिक, सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ जरी नवरात्राशी जोडले असले तरी प्राचीन काळापासून भारतात नांदणा-या कृषिप्रधान संस्कृतीतील तो एक कृषी लोकोत्सव आहे.

- डॉ. रामचंद्र देखणेआध्यात्मिक, पौराणिक, सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ जरी नवरात्राशी जोडले असले तरी प्राचीन काळापासून भारतात नांदणा-या कृषिप्रधान संस्कृतीतील तो एक कृषी लोकोत्सव आहे. घटस्थापनेच्या दिवशी एका परडीमध्ये आपल्या शिवारातील वावराची माती टाकून त्यात विविध प्रकारचे धान्य टाकले जाते. त्यावर घट ठेवून त्यात पाणी भरले जाते. नऊ दिवसांत धान्याचे अंकुर मोठे होतात. दसºयाच्या दिवशी दसºयाचा तुरा म्हणून ते देवाला वाहिले जातात आणि टोपीवर, पागोट्यावर अभिमानाने अडकविले जातात.घट बसविण्याच्या या धार्मिक कृत्यामागील कृषिप्रक्रियेची घटना महत्त्चाची आहे. घटाच्या खाली ठेवलेली परडी हे एक शेत असते. मातीची परीक्षा घेण्यासाठी आपल्याच शिवारातील वावरी त्यात टाकली जाते.नांगराच्या फाळाने जमीन नांगरल्यानंतर जसे फराट तयार होतात तसे त्या परडीतल्या मातीवर उभ्या आडव्या नऊ रेघा मारल्या जातात. प्रत्येक रेषेवर एक याप्रमाणे नऊ रेघांवर नऊ प्रकारचे धान्य टाकले जाते. या पेरलेल्या धान्याला घटातल्या पाण्याने ओलावा मिळतो. या कृत्रिम शेताभोवती हवा खेळती राहावी म्हणून सतत दिवा लावला जातो. त्या दिव्याच्या उष्णतेने तेथील हवा विरळ होऊन वर जाते आणि त्या हवेची जागा बाहेरील शुद्ध हवा घेते.गोडेतेलाच्या दिव्याने आजूबाजूचे जंतूही मरून जातात. असे काळजीपूर्वक नऊ दिवस केल्यानंतर कोणते धान्य सकस रूपात उगवले आहे, हे पाहून पुढील वर्षी आपल्या शिवारात कोणते धान्य चांगले येऊ शकते, याचा अंदाज घेतला जात असे. म्हणजेच नवरात्रातील घटस्थापना ही शिवारातील माती, धान्याचे बी, येणारे पीकपाणी याचा अंदाज घेणारी एक छोटी कृषी प्रयोगशाळाच होती. आज नवरात्र उत्सवातील हा कृषिसंदर्भ आणि त्याचे स्वरुप लोप पावले आहे. एक धार्मिक क्रियाविधी म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.एकूणच शारदीय नवरात्र उत्सवाचे वेगवेगळे पदर आहेत. वेगवेगळे संदर्भ आहेत. विविधांगी रूप आणि रूपक त्यातून व्यक्त होत आहे. असुरांच्या विनाशाचा, सत् प्रवृत्तीच्या संवर्धनाचा हा उत्सव आहे. सांस्कृतिक जीवनात या उत्सवाचे स्थान अनन्यसाधारण असे आहे.

टॅग्स :Navratri 2017नवरात्रौत्सव २०१७