शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

नवरसी भरवी सागरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 03:13 IST

ज्ञानेश्वरमाऊली सांगतात की, माझ्या जीवनात शब्दाइतके मोठेपण कशाला नाही. ‘अमृताचेही पैजा जिंंके’ ही प्रतिज्ञा ज्ञानेश्वरमाऊली शब्दांच्या सामर्थ्यावर निष्ठा ठेवूनच करतात. शब्दानेच परमात्म्यालाही जाणणार आहे. जाणलेला परमात्मा लोकांसमोर उभा करणार आहे आणि शब्दानेच लोकसंवादही साधणार आ

- डॉ. रामचंद्र देखणेज्ञानेश्वरमाऊली सांगतात की, माझ्या जीवनात शब्दाइतके मोठेपण कशाला नाही. ‘अमृताचेही पैजा जिंंके’ ही प्रतिज्ञा ज्ञानेश्वरमाऊली शब्दांच्या सामर्थ्यावर निष्ठा ठेवूनच करतात. शब्दानेच परमात्म्यालाही जाणणार आहे. जाणलेला परमात्मा लोकांसमोर उभा करणार आहे आणि शब्दानेच लोकसंवादही साधणार आहे.अनुभव घेणे आणि अनुभव व्यक्त करणे हे साहित्य होय. अंतर्मनाने बाह्यमनाशी केलेला संवाद म्हणजे साहित्य होय. पण भावानुभूतीचा आत्मसंवाद म्हणजे कविता होय. कवी कवितेतून एकीकडे रस निर्माण करून इतरांना आनंद देत असतो तर दुसरीकडे स्वत:च्या मनाशी संवाद करून आपणही आनंद घेत असतो. आपले काव्य कसे असावे याचे वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात...नवरसी भरवी सागरू।करवी उचित रत्नांचे आगरु।भावार्थाचे गिरीवरू।निपजवी माये।माझ्या काव्यात नवरसांचा सहजसुंदर शिरकाव होऊ दे. शब्दरत्नांचे आगर लाभू दे आणि भावार्थाचे गिरीवर त्यातून उभे राहू देत. काव्याची व्याख्या करताना विश्वनाथाने म्हटले आहे.‘वाक्यं रसात्मकं काव्यम्।’ज्यात नवरसांपैकी एक किंवा अनेक रस असतील त्याला काव्य म्हणावे. काव्यातील मुख्य तत्त्व किंवा काव्याचा प्राण ‘रस’ हाच होय. शब्दांना जे काव्यत्व येते ते रसांमुळेच. ‘रस्यते इति रस:’ ज्याचा आपण आस्वाद घेतो किंवा आवडीने चाखतो तो रस होय. काव्यशास्त्रवेत्यांनी १. शृंगार, २. हास्य, ३. करुण, ४. रौद्र, ५. वीर, ६. भयानक, ७. बीभत्स आणि ८. अद्भुत असे आठ रस सांगितले आहेत. निरनिराळ्या पंडितांनी त्यात शांत, भक्ती किंवा प्रेयान यापैकी रसाला घालून ‘नवरस’ ही संकल्पना मांडली आहे. ज्ञानदेवादी संतपरंपरेने वरील आठ रसांबरोबर ‘शांत’ रसालाही काव्यात महत्त्वाचे स्थान दिले आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे शांत रसाचे निवासस्थान.ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,जेथ शांत रसाचिया घराअद्भुत आला आहे पाहुणेरा।ज्ञानेश्वरीचा मूळ रस हा शांत रस आहे. अद्भुत रस हा त्याच्या घरी आलेला पाहुणा आहे. नवरसात शांतरस हा कळसावर शोभतो हे निश्चित.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक