शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

नवरसी भरवी सागरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 03:13 IST

ज्ञानेश्वरमाऊली सांगतात की, माझ्या जीवनात शब्दाइतके मोठेपण कशाला नाही. ‘अमृताचेही पैजा जिंंके’ ही प्रतिज्ञा ज्ञानेश्वरमाऊली शब्दांच्या सामर्थ्यावर निष्ठा ठेवूनच करतात. शब्दानेच परमात्म्यालाही जाणणार आहे. जाणलेला परमात्मा लोकांसमोर उभा करणार आहे आणि शब्दानेच लोकसंवादही साधणार आ

- डॉ. रामचंद्र देखणेज्ञानेश्वरमाऊली सांगतात की, माझ्या जीवनात शब्दाइतके मोठेपण कशाला नाही. ‘अमृताचेही पैजा जिंंके’ ही प्रतिज्ञा ज्ञानेश्वरमाऊली शब्दांच्या सामर्थ्यावर निष्ठा ठेवूनच करतात. शब्दानेच परमात्म्यालाही जाणणार आहे. जाणलेला परमात्मा लोकांसमोर उभा करणार आहे आणि शब्दानेच लोकसंवादही साधणार आहे.अनुभव घेणे आणि अनुभव व्यक्त करणे हे साहित्य होय. अंतर्मनाने बाह्यमनाशी केलेला संवाद म्हणजे साहित्य होय. पण भावानुभूतीचा आत्मसंवाद म्हणजे कविता होय. कवी कवितेतून एकीकडे रस निर्माण करून इतरांना आनंद देत असतो तर दुसरीकडे स्वत:च्या मनाशी संवाद करून आपणही आनंद घेत असतो. आपले काव्य कसे असावे याचे वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात...नवरसी भरवी सागरू।करवी उचित रत्नांचे आगरु।भावार्थाचे गिरीवरू।निपजवी माये।माझ्या काव्यात नवरसांचा सहजसुंदर शिरकाव होऊ दे. शब्दरत्नांचे आगर लाभू दे आणि भावार्थाचे गिरीवर त्यातून उभे राहू देत. काव्याची व्याख्या करताना विश्वनाथाने म्हटले आहे.‘वाक्यं रसात्मकं काव्यम्।’ज्यात नवरसांपैकी एक किंवा अनेक रस असतील त्याला काव्य म्हणावे. काव्यातील मुख्य तत्त्व किंवा काव्याचा प्राण ‘रस’ हाच होय. शब्दांना जे काव्यत्व येते ते रसांमुळेच. ‘रस्यते इति रस:’ ज्याचा आपण आस्वाद घेतो किंवा आवडीने चाखतो तो रस होय. काव्यशास्त्रवेत्यांनी १. शृंगार, २. हास्य, ३. करुण, ४. रौद्र, ५. वीर, ६. भयानक, ७. बीभत्स आणि ८. अद्भुत असे आठ रस सांगितले आहेत. निरनिराळ्या पंडितांनी त्यात शांत, भक्ती किंवा प्रेयान यापैकी रसाला घालून ‘नवरस’ ही संकल्पना मांडली आहे. ज्ञानदेवादी संतपरंपरेने वरील आठ रसांबरोबर ‘शांत’ रसालाही काव्यात महत्त्वाचे स्थान दिले आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे शांत रसाचे निवासस्थान.ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,जेथ शांत रसाचिया घराअद्भुत आला आहे पाहुणेरा।ज्ञानेश्वरीचा मूळ रस हा शांत रस आहे. अद्भुत रस हा त्याच्या घरी आलेला पाहुणा आहे. नवरसात शांतरस हा कळसावर शोभतो हे निश्चित.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक