शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नाना भिंती... एकच माती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 14:52 IST

अध्यात्म

ज्ञानाचे मुख्यत: तीन प्रकार पडतात. वृत्तीज्ञान, गुणज्ञान आणि सत्ताज्ञान .ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र वगैरे हे वृत्ती ज्ञानात येतात. कला आदी गुणज्ञानात येतात व ईश्वरी ज्ञानाला सत्ता ज्ञान म्हणतात. कंठोपनिषदामध्ये एक कथा आहे. नचिकेता आपल्या वडिलांसमोर येऊन त्यांना म्हणतो, मी या पृथ्वीवरची सर्व ज्ञान माहित करुन घेतली आहेत. त्यावर त्याचे वडील विचारतात,ज्या एका ज्ञानातून सर्व ज्ञान प्राप्त होतात. ते ज्ञान तुला प्राप्त झाले आहे काय? त्यालाच सत्ता ज्ञान असे म्हणतात. ज्याप्रमाणे सोन्याचे अनेक प्रकार आहेत. पण त्यामागे एक सोनेच आहे किंवा अनेक वस्त्रे आहेत. पंरतु त्यामध्ये एकच सूत आहे.नाना भिंती एकच माती,जगामध्ये एकच ब्रम्ह गड्या असेसर्वांमध्ये एकच जे तत्व आहे. ते सत्ता ज्ञान. आणि ते सत्ता ज्ञान संताच्या पायापाशी असते. ते प्रत्यक्ष ब्रम्ह असतात. म्हणजेच सत्य स्वरुप असतात.वेदामध्ये आपण प्रार्थना करतो ऋतंचमे, कृतंचमे, त्यात ऋतू हे सत्य आहे.ब्रम्हाने मायेची उपाधी धारण केली की, तो देव होतो.मायेपाशी शिव बोलती जेतीयाब्रम्हाने करुणेची उपाधी धारण केली की तो संत होतो.गणिताच्या भाषेत सांगायचे तरब्रम्ह -माया-ईश्वरब्रम्ह-करुणा-संतआता हे संत (सत्य) कळतात कुणालाएक गोष्ट सांगतो, एक राजा होता. त्याला दोन राण्या होत्या. एक आवडती, एक नावडती. आवडतीचे नाव सुरुची व नावडतीचे नाव सुनीती. मला वाटते तुम्हाला ती गो्ष्ट आवडली. त्यात सुनितीच्या मुलाला म्हणजेच ध्रुवाला देव भेटला. जे सुरुचीचे आहेत. त्यांना सत्य कळत नाही. जे सुनीतीचे आहेत. त्यानांच सत्य कळते.- गोविंद सूत, दापोरा,ता. जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव