शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक जग आणि अध्यात्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 10:39 IST

सद्यस्थितीत आयुष्य फारच गतीमान झाले आहे. प्रत्येकजण काहीना काही मिळविण्यासाठी धाव-धावतोय. कोणी, नोकरी, करिअर, कुटुंब, स्वप्न, पैसा, प्रतिष्ठा मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहे.

- सचिन व्ही. काळे

सद्यस्थितीत आयुष्य फारच गतीमान झाले आहे. प्रत्येकजण काहीना काही मिळविण्यासाठी धाव-धावतोय. कोणी, नोकरी, करिअर, कुटुंब, स्वप्न, पैसा, प्रतिष्ठा मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहे. हे सर्व करत असताना मानव मनशांती हरवत चालला आहे. इच्छा हे प्रत्येक दु:खाचे कारण असते. थोर तत्वज्ञ भगवान गौतम बुद्धांनी हजारो वर्षापूर्वी सांगितले आहे. मानवी मेंदूत सतत कुठले ना कुठले विचार सुरू असतात. त्यामुळे या विचारांना विचारचक्र म्हटले आहे. हिंदू संस्कृतीत ग्रंथांमधून सांगितल्यानुसार, मानवी जीवन हे ८४ लक्ष योनीनंतर प्राप्त होते. त्यामुळे ते अत्यंत दुर्मिळ समजले जाते. मिळालेल्या जीवनाचे सार्थक कसे करावे या विचारात प्रत्येकजण असतो. काहींना संपत्ती, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी हवी असते. हे सर्व मिळविण्यासाठी तो कुठल्याही थराला जाण्याची तयारी ठेवतो. परंतु या आभासी वस्तूंपासून मानवाला दूर ठेवण्यासाठी जो विचार त्याने करायला हवा तो त्याला अध्यात्मातूनच मिळू शकतो. परंतु अध्यात्म ही अशी बाब आहे, जी सहजासहजी प्राप्त होत नाही. अध्यात्म म्हणजे स्वत:च्या दु:खाचे अध्ययन करून दु:खाचे कारण शोधणे व आत्म्याचा शोध घेणे. भारतीयांना अध्यात्माची प्रचिती ही हजारो वर्षापूर्वीची आहे. ऋषी-मुनींनी याचा पाया घालून ठेवला आहे. नंतर हेच अध्यात्म त्या त्या काळातील संतांनी सर्वसामान्यांना कळेल अशा सोप्या भाषेत सांगितले आहे.

याचे उदाहरणच द्यायचे म्हटल्यास संत कबीर, शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज यांनी दोहे तसेच भारूडातून अध्यात्मावर प्रकाश टाकला आहे. लौकीक आणि अलौकीक असे दोन भाग अध्यात्मात असतात. अध्यात्माकडे जाण्यासाठी तुम्हाला भक्तीमार्ग ही देखील एक महत्वाची पायरी ठरू शकते. अध्यात्मात आनंद आणि समाधानाला मोठे महत्व आहे. आनंद हा कुठे विकत मिळत नाही. तो प्रत्येकाच्या मानण्यावर असतो. अध्यात्म म्हणजे ज्याने तुमचे मन थकत नाही, ज्याच्या नुसत्या कल्पनेने सर्व दु:ख, इच्छा, आकांक्षा, वासना, द्वेष, इर्षा विसरून जातात आणि स्वत:च्या आत्म्यात विलीन होऊन जातात. स्वत:च्या शोधात ज्ञानप्राप्ती करतात, तोच खरा आत्मानंद होय. परंतु या स्थितीपर्यंत येण्यासाठी मानवाला वरवरचे ज्ञान प्राप्त करून चालत नाही, तर त्यासाठी अध्यात्मात रममाण व्हावे लागते. अध्यात्मासाठीची पहिली पायरी ज्या प्रमाणे भक्तीची आहे, त्याच प्रमणे तुमचे चित्त शांत असण्यालाही अध्यात्मात मोठे महत्व आहे. भगवत् गीतेतील तत्वज्ञानाला मोठे महत्व आहे. तुम्ही स्थितप्रज्ञ असायला हवे. कुठल्याही गोष्टीचा उन्माद अथवा अतिरेक न करण्यालाही अध्यात्मात मोठे स्थान आणि महत्व आहे. मनशुद्धीलाही येथे मोठे महत्व आहे. त्यासाठी तुमच्यात सकारात्मक उर्जा असणे गरजेचे आहे. मानवी जीवन जगत असताना सुख आणि दु:ख येतच असतात. परंतु, त्यामुळे खचून न जाता दररोज उगवणाऱ्या सूर्याप्रमाणे ताजेतवाणे विचार तुमच्यात असलेच पाहिजे. तरच तुम्ही या भाव-भावनांच्या जगात तारूण जाऊ शकता. प्रत्येकालाच इच्छा, आकांक्षा या असतातच, परंतू, त्या पूर्ण करण्यासाठी चुकीचा मार्ग न अवलंबणे हे देखील एक प्रकारे अध्यात्मच आहे. 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक