शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

आधुनिक जग आणि अध्यात्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 10:39 IST

सद्यस्थितीत आयुष्य फारच गतीमान झाले आहे. प्रत्येकजण काहीना काही मिळविण्यासाठी धाव-धावतोय. कोणी, नोकरी, करिअर, कुटुंब, स्वप्न, पैसा, प्रतिष्ठा मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहे.

- सचिन व्ही. काळे

सद्यस्थितीत आयुष्य फारच गतीमान झाले आहे. प्रत्येकजण काहीना काही मिळविण्यासाठी धाव-धावतोय. कोणी, नोकरी, करिअर, कुटुंब, स्वप्न, पैसा, प्रतिष्ठा मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहे. हे सर्व करत असताना मानव मनशांती हरवत चालला आहे. इच्छा हे प्रत्येक दु:खाचे कारण असते. थोर तत्वज्ञ भगवान गौतम बुद्धांनी हजारो वर्षापूर्वी सांगितले आहे. मानवी मेंदूत सतत कुठले ना कुठले विचार सुरू असतात. त्यामुळे या विचारांना विचारचक्र म्हटले आहे. हिंदू संस्कृतीत ग्रंथांमधून सांगितल्यानुसार, मानवी जीवन हे ८४ लक्ष योनीनंतर प्राप्त होते. त्यामुळे ते अत्यंत दुर्मिळ समजले जाते. मिळालेल्या जीवनाचे सार्थक कसे करावे या विचारात प्रत्येकजण असतो. काहींना संपत्ती, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी हवी असते. हे सर्व मिळविण्यासाठी तो कुठल्याही थराला जाण्याची तयारी ठेवतो. परंतु या आभासी वस्तूंपासून मानवाला दूर ठेवण्यासाठी जो विचार त्याने करायला हवा तो त्याला अध्यात्मातूनच मिळू शकतो. परंतु अध्यात्म ही अशी बाब आहे, जी सहजासहजी प्राप्त होत नाही. अध्यात्म म्हणजे स्वत:च्या दु:खाचे अध्ययन करून दु:खाचे कारण शोधणे व आत्म्याचा शोध घेणे. भारतीयांना अध्यात्माची प्रचिती ही हजारो वर्षापूर्वीची आहे. ऋषी-मुनींनी याचा पाया घालून ठेवला आहे. नंतर हेच अध्यात्म त्या त्या काळातील संतांनी सर्वसामान्यांना कळेल अशा सोप्या भाषेत सांगितले आहे.

याचे उदाहरणच द्यायचे म्हटल्यास संत कबीर, शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज यांनी दोहे तसेच भारूडातून अध्यात्मावर प्रकाश टाकला आहे. लौकीक आणि अलौकीक असे दोन भाग अध्यात्मात असतात. अध्यात्माकडे जाण्यासाठी तुम्हाला भक्तीमार्ग ही देखील एक महत्वाची पायरी ठरू शकते. अध्यात्मात आनंद आणि समाधानाला मोठे महत्व आहे. आनंद हा कुठे विकत मिळत नाही. तो प्रत्येकाच्या मानण्यावर असतो. अध्यात्म म्हणजे ज्याने तुमचे मन थकत नाही, ज्याच्या नुसत्या कल्पनेने सर्व दु:ख, इच्छा, आकांक्षा, वासना, द्वेष, इर्षा विसरून जातात आणि स्वत:च्या आत्म्यात विलीन होऊन जातात. स्वत:च्या शोधात ज्ञानप्राप्ती करतात, तोच खरा आत्मानंद होय. परंतु या स्थितीपर्यंत येण्यासाठी मानवाला वरवरचे ज्ञान प्राप्त करून चालत नाही, तर त्यासाठी अध्यात्मात रममाण व्हावे लागते. अध्यात्मासाठीची पहिली पायरी ज्या प्रमाणे भक्तीची आहे, त्याच प्रमणे तुमचे चित्त शांत असण्यालाही अध्यात्मात मोठे महत्व आहे. भगवत् गीतेतील तत्वज्ञानाला मोठे महत्व आहे. तुम्ही स्थितप्रज्ञ असायला हवे. कुठल्याही गोष्टीचा उन्माद अथवा अतिरेक न करण्यालाही अध्यात्मात मोठे स्थान आणि महत्व आहे. मनशुद्धीलाही येथे मोठे महत्व आहे. त्यासाठी तुमच्यात सकारात्मक उर्जा असणे गरजेचे आहे. मानवी जीवन जगत असताना सुख आणि दु:ख येतच असतात. परंतु, त्यामुळे खचून न जाता दररोज उगवणाऱ्या सूर्याप्रमाणे ताजेतवाणे विचार तुमच्यात असलेच पाहिजे. तरच तुम्ही या भाव-भावनांच्या जगात तारूण जाऊ शकता. प्रत्येकालाच इच्छा, आकांक्षा या असतातच, परंतू, त्या पूर्ण करण्यासाठी चुकीचा मार्ग न अवलंबणे हे देखील एक प्रकारे अध्यात्मच आहे. 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक