शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
2
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
3
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
6
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
7
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
8
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
9
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
10
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
11
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
12
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
13
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
14
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
15
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
16
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
17
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
18
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
19
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
20
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं

निसंशयी मनाची अवस्था परिपक्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 08:52 IST

श्रद्धेने व विश्वासाने केलेल्या कर्माला चांगली गती मिळते. त्याला त्याचे फळ लागते. संशयी मनात विकृती निर्माण होते. संशयी मन कोणताही हेतू साध्य करू शकत नाही.

एक व्यक्ती तीर्थाला जायला निघाला जाता-जाता त्याच्या मनात विचार आला. आपल्या घरचे गायी-म्हशी-घोडे, याची जबाबदारी कुणावर तरी सोपवून जावु... पण जाण्यापूर्वीच त्याच्या मनात अनेक शंका उत्पन्न होवू लागल्या. माझ्या माघारी गायी-म्हशी कुणी चोरलं तर काय होईल. मी तीर्थाला गेल्यास माझ्या कुटुंबाचे काय? कुणाचे मरण-धरण झाले तर तर काय? अशा एक-ना-अनेक प्रश्नांचे काहूर त्याच्या मनात आले. शेवटी त्याच्या मनानेच तीर्थाला जाण्याचा मानस रद्द केला. जाणारा माणुस मनात शंका आल्यामुळे गेला नाही याचे कारण मनातला संशय विषयात गुंतलेल्या मनात संशय निर्माण होतो. जपी-तपी-संन्यासी कोणीही असो ज्यांचे मन संशयी आहे. त्या माणसांचे कल्याण होत नाही. निसंशयी मन कणखर असते कोणतेही हेतू साध्य करण्यासाठी संशयी मनाची गरज असते. मनुष्याच्या शुद्धीकरणासाठी निसंशय मन असावे लागते. साधु-संत-कुटुंब, देश-देव या सर्वांवर विश्वास ठेवून कार्य केले जाते. त्यानुसार त्याला त्याचे फळ मिळते. श्रद्धेने व विश्वासाने केलेल्या कर्माला चांगली गती मिळते. त्याला त्याचे फळ लागते. संशयी मनात विकृती निर्माण होते. संशयी मन कोणताही हेतू साध्य करू शकत नाही. वसिष्ठ, व्यास, वाल्मिकी, शुक्र, नारद, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम इत्यादी पूर्वसंतानी जे कार्य केले ते निसंशयीवृत्तीने श्रद्धापूर्वक व शुद्धस्वरूपात ईशतत्वावर विश्वास ठेवून कर्म करून दाखवले. ज्ञानाचा प्रचार केला. वेद-शास्त्र-पुराण इत्यादीवर विश्वास ठेवून परमार्थाची खरी तत्वे जगासमोर मांडली. याचे कारण निसंशयी भक्ती केली. आपल्या कार्यास संशय नसावा. आत्मविश्वासाने केले कार्य सिद्धीला जाते. निसंशयी मन उत्कृष्ट असते त्याच्याकडून चांगले कृत्य घडतात. भुतमात्रात उच्च-नीच असा भेद करीत बसत नाही. निसंशयी मनाची अवस्था परिपक्व असते. कोणतेही कार्य करीत असता विश्वासपूर्वक करतो. त्यामुळे त्याला अडचणी आल्या तरी ते कार्य सोडुन जात नाही. त्याला त्याच्या कर्मावर संशय नसतो. त्यामुळे तो यशस्वी होतो. कुणाचा विश्वास कोणावर असो अथवा नसो. मात्र आपल्या कर्मावर निसंशय आपला विश्वास असावा. स्वत:चा विश्वास स्वत:वर असणे हीच मोठी यशस्वी मनाची गुरूकिल्ली आहे.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :spiritualअध्यात्मिक