शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

सृष्टीचे मन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 07:53 IST

संपूर्ण सृष्टीचा विचार केला तर तो मनावरच आहे. कारण विचार मनच करते. ओमकाराच्या बीजतत्त्वाने बनलेल्या पृथ्वीलाही एक मन असते. ...

संपूर्ण सृष्टीचा विचार केला तर तो मनावरच आहे. कारण विचार मनच करते. ओमकाराच्या बीजतत्त्वाने बनलेल्या पृथ्वीलाही एक मन असते. कारण समुद्राचे मन, पृथ्वीचे मन, आकाशाचे मन, चंद्र-सूर्याचे मन यावरच सृष्टीचे मन अवलंबून असते. या सृष्टीचे मन बिघडले की भूकंप येतो. पृथ्वी खवळली की जमिनीला भेगा पडतात. समुद्राचे मन आनंदी झाले की ते मोठमोठ्या लाटांच्या रूपाने उसळ्या घेते. सूर्याचे मन आनंदी झाले की तो शीघ्र गतीने न चालता मध्यम स्वरूपात चालतो. मग तोच सूर्य जर कोपला तर अनेक जीव गुदमरून जातात. चंद्राचे मन आनंदी झाल्यावर आपल्याला शरद पौर्णिमेचा आनंद बघावयास मिळतो. गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, गोदावरी, तापी या नद्या कोपल्या की सीमोल्लंघन करतात. आनंदरूपी मन, दु:खरूपी मन या सृष्टीलाही असतेच ना!

खरोखर या मनाचा विचार केला तर याला रंग नाही, रूप नाही. ते खात-पीत नाही. त्याला जात नाही, धर्म नाही. ते अल्पही नाही. या मनाचा ठावठिकाणाच लागत नाही. सर्व सृष्टीचा खेळही मनावरच अवलंबून आहे.

मन सगुण-निर्गुण अवस्थेत असते. मनाचे भाव, स्पंदने, ऊर्जा ही कल्पनातीत आहे. कितीतरी युगापासून या मनाचा शोध सुरू आहे. मनानेच प्रभूचे मीलन होते. तसेच मनानेच आपण प्रभूपासून लांब जातो. मनासोबत कधी शरीर जाते तर कधी जात नाही. कारण मन अर्ध्या क्षणात सर्व सृष्टी फिरून येईल; पण शरीर जाऊ शकत नाही. शरीरामध्ये असणाऱ्या तत्त्वांचा मनाशी परिपक्व संबंध आहे. तसेच मनाचा समतोलपणा शरीरावर अवलंबून आहे, असे म्हणणे कितपत योग्य ठरेल?

संत कबीर म्हणतात, ‘मन गया तो जाने दो, मत जाने दो शरीरना खींचे कमान तो कहा लगेगा तीर’ कधी मन जाईलही पण आपल्या ताब्यात आल्यास ते गेलेले मनही परत येते. मनाचा मेळ मनच जाणे. भल्या भल्यांना उजळवणारे व फसवणारेही मनच आहे. सृष्टीच्या मनाचा विचारच मानवी मनाचा विचार आहे.डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक