शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मन सर्वात मोठा गुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 14:09 IST

आपला सर्वात मोठा गुरू बाहेरील क्षेत्रातील दुसरा कुणी नसून आपल्याच शरीरात वास करणारे मन आहे

गुरू म्हणजे आध्यात्मिक, पारमार्थिक वाटेवरचाच असला पाहीजे असे अजिबात नाही. समजायला लागतं तेव्हापासून आई आपला प्रथम गुरू, नंतर शाळेतील शिक्षक आणि कालांतराने पुढे अनेक क्षेत्रातील मान्यवर आणि गुरूजंनांकडून आपण ज्ञान अर्जित करीत असतो. जीवनात संगीत, कला, क्रिडा, वैद्यकीय असो की व्यावसायिक क्षेत्रात गुरू हवाच. अपवादात्मक काही जण एकलव्यासारखे दुरून स्वकष्टावर विद्या आत्मसात करणारेही असतील. मात्र, तुम्ही कधी विचार केला का? आपला सर्वात मोठा गुरू कोण?आपला सर्वात मोठा गुरू बाहेरील क्षेत्रातील दुसरा कुणी नसून आपल्याच शरीरात वास करणारे मन आहे. होय आपलं मन..आपलं मन! जसं सांगेल तसंच आपण वागत असतो.  कुठलाही निर्णय घेताना आधी मनाचाच कौल घेतो. मन सांगेल तसेच वागत असतो. म्हणजेच मन हे शक्तीस्वरूप आहे, याचीच जाणीव प्रत्येकाला होते. म्हणूनच मनाची शक्ती योग्य मार्गाला लावा. मनाची शक्ती योग्य मार्गाला वाली, आपल्या मनाला नियंत्रित करून आदर्श वागायला शिकविलं. तरच आपण गुणसंपन्न सत्शील असे होऊ शकतो!मन हेच मनुष्याच्या बंधनाचे आणि मोक्षाचे कारण आहे. ऐहिक आणि पारमार्थिक कल्याण साधण्यासाठी मनाला योग्य वळण लावावेच लागेल. मनाला योग्य वळण लावण्यासाठी क्रोध, अहंकार सोडला पाहीजे. संज्जनांची संगत आणि वाणी गोड ठेवली पाहीजे.समाजात बुध्दीमान माणसे खूप आहेत. पण आपल्या जाणतेपणाचा अहंकार नसलेली निगर्वी मनाची माणसे त्यात किती सापडतील, हा एक गहन प्रश्न आहे.सदवस्तूचे ज्ञान घेताना त्या ज्ञानाचा अहंकार झाला तर ते ज्ञान आत्मसात होत नाही. ‘मी’ माझे म्हणणारे अहंकारी मन कुणाला आपलेसे करून त्याच्याशी समरस होऊ शकत नाही. ‘मनात एक  आणि ओठात एक’ या वृत्तीने मनुष्याचा ºहासच होतो. ‘क्रियेवीण नानापरी बोलीजे ते परी चीत दुश्चित ते लाजवीते’ याप्रमाणे माणूस खूप आदर्श वागण्याच्या बढाया मारतो, पण त्याप्रमाणे त्याचे आचरण नसते आणि जगाश्ी कितीही खोटे बोलले तरी स्वत:चे मनच त्याला आतून लाजवीत असते. म्हणूनच मनुष्याने मनाला शिस्त लावीत शुध्द आचरण ठेवावे.माणसाच्या षड्रिपूपैकी सगळ्यात जास्त नुकसान करणारा विकार कोणता? तर तो क्रोध आहे. क्रोध कधीच एकटा येत नाही. तर संताप, मनस्ताप, द्वेष, निंदा या त्याच्या सगळ्या भावांना एकत्र घेऊन येतो. हे सारे येऊन गेलेत की त्यानंतर उरतो तो पश्चाताप! राग आवरायला, मन शांत, समाधानी ठेवायला काय हवे तर फक्त संतांची संगती असावी.मना कोप आरोपणा ते नसावी,मना बुधि हे सांधुसंगी वसावी!मनानी कसं असावं, तर दयाळू, कृपाळू, मवाळू, स्नेहाळू असावं.मनाला गुरूच नव्हे तर महागुरू केल्यास आपल्या जीवनाची नौका कुठेही भरकटणार नाही.

- शून्यानंद संस्कारभारती

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक