शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

मन सर्वात मोठा गुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 14:09 IST

आपला सर्वात मोठा गुरू बाहेरील क्षेत्रातील दुसरा कुणी नसून आपल्याच शरीरात वास करणारे मन आहे

गुरू म्हणजे आध्यात्मिक, पारमार्थिक वाटेवरचाच असला पाहीजे असे अजिबात नाही. समजायला लागतं तेव्हापासून आई आपला प्रथम गुरू, नंतर शाळेतील शिक्षक आणि कालांतराने पुढे अनेक क्षेत्रातील मान्यवर आणि गुरूजंनांकडून आपण ज्ञान अर्जित करीत असतो. जीवनात संगीत, कला, क्रिडा, वैद्यकीय असो की व्यावसायिक क्षेत्रात गुरू हवाच. अपवादात्मक काही जण एकलव्यासारखे दुरून स्वकष्टावर विद्या आत्मसात करणारेही असतील. मात्र, तुम्ही कधी विचार केला का? आपला सर्वात मोठा गुरू कोण?आपला सर्वात मोठा गुरू बाहेरील क्षेत्रातील दुसरा कुणी नसून आपल्याच शरीरात वास करणारे मन आहे. होय आपलं मन..आपलं मन! जसं सांगेल तसंच आपण वागत असतो.  कुठलाही निर्णय घेताना आधी मनाचाच कौल घेतो. मन सांगेल तसेच वागत असतो. म्हणजेच मन हे शक्तीस्वरूप आहे, याचीच जाणीव प्रत्येकाला होते. म्हणूनच मनाची शक्ती योग्य मार्गाला लावा. मनाची शक्ती योग्य मार्गाला वाली, आपल्या मनाला नियंत्रित करून आदर्श वागायला शिकविलं. तरच आपण गुणसंपन्न सत्शील असे होऊ शकतो!मन हेच मनुष्याच्या बंधनाचे आणि मोक्षाचे कारण आहे. ऐहिक आणि पारमार्थिक कल्याण साधण्यासाठी मनाला योग्य वळण लावावेच लागेल. मनाला योग्य वळण लावण्यासाठी क्रोध, अहंकार सोडला पाहीजे. संज्जनांची संगत आणि वाणी गोड ठेवली पाहीजे.समाजात बुध्दीमान माणसे खूप आहेत. पण आपल्या जाणतेपणाचा अहंकार नसलेली निगर्वी मनाची माणसे त्यात किती सापडतील, हा एक गहन प्रश्न आहे.सदवस्तूचे ज्ञान घेताना त्या ज्ञानाचा अहंकार झाला तर ते ज्ञान आत्मसात होत नाही. ‘मी’ माझे म्हणणारे अहंकारी मन कुणाला आपलेसे करून त्याच्याशी समरस होऊ शकत नाही. ‘मनात एक  आणि ओठात एक’ या वृत्तीने मनुष्याचा ºहासच होतो. ‘क्रियेवीण नानापरी बोलीजे ते परी चीत दुश्चित ते लाजवीते’ याप्रमाणे माणूस खूप आदर्श वागण्याच्या बढाया मारतो, पण त्याप्रमाणे त्याचे आचरण नसते आणि जगाश्ी कितीही खोटे बोलले तरी स्वत:चे मनच त्याला आतून लाजवीत असते. म्हणूनच मनुष्याने मनाला शिस्त लावीत शुध्द आचरण ठेवावे.माणसाच्या षड्रिपूपैकी सगळ्यात जास्त नुकसान करणारा विकार कोणता? तर तो क्रोध आहे. क्रोध कधीच एकटा येत नाही. तर संताप, मनस्ताप, द्वेष, निंदा या त्याच्या सगळ्या भावांना एकत्र घेऊन येतो. हे सारे येऊन गेलेत की त्यानंतर उरतो तो पश्चाताप! राग आवरायला, मन शांत, समाधानी ठेवायला काय हवे तर फक्त संतांची संगती असावी.मना कोप आरोपणा ते नसावी,मना बुधि हे सांधुसंगी वसावी!मनानी कसं असावं, तर दयाळू, कृपाळू, मवाळू, स्नेहाळू असावं.मनाला गुरूच नव्हे तर महागुरू केल्यास आपल्या जीवनाची नौका कुठेही भरकटणार नाही.

- शून्यानंद संस्कारभारती

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक