शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मनाला चांगले वळण लावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 09:12 IST

मनुष्य खरेच जसा वागतो, तसा अंत:करणापासूनही वागत असतो का? ते त्याच्या काही कृतीनुसार लक्षात येते. कारण त्याच्या मनोवृत्तीनुसार तो इंद्रियांना चालना देतो.

मनुष्य खरेच जसा वागतो, तसा अंत:करणापासूनही वागत असतो का? ते त्याच्या काही कृतीनुसार लक्षात येते. कारण त्याच्या मनोवृत्तीनुसार तो इंद्रियांना चालना देतो. मनाचे ग्रह बदलले की माणूस बाह्य कृतीत बदल घडवतो म्हणून मनाला चांगले वळण लावा. मन सतत अभ्यासात गुंतून ठेवा म्हणजे बाह्य इंद्रियांना नियमितपणाचे वळण पडेल आणि मग अंत:करणात सुख वाढेल. अशा ठिकाणी मन:स्थिती स्थिर ठेवण्याचा अभ्यास महत्त्वाचा असतो. नियमाने मनाला वागण्याची सवय लावा. कारण आयुष्याला स्थिर करणारे मनच असते. मनाची बेचैन अवस्था झाली की, इंद्रियांवर आपले नियंत्रण राहू शकत नाही. इंद्रिये सैरावैरा धावू लागतात. मग आपण आपले-परके न पाहता कोणावरही आरोप करतो. कुणालाही बोलत राहतो. नको त्या गोष्टी मनात आणतो. आणि आपणच आपला नाश करून घेतो म्हणून मनुष्याच्या जीवनात मन:स्थिती सांभाळणे, त्याला स्थिर करणे, आपल्या हितासाठी जे जे चांगले त्याची सवय लावणे, इंद्रियांना दुष्ट प्रवृत्तीकडे वळू न देणे हा अभ्यास मनाला करायला लावावे. कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ‘जेथे योगाच्या अभ्यासाने नियमन पावलेले मन विषयापासून परावृत्त होते, जेथे साधक आपण आपल्याला पाहून आत्मस्वरूपी सुख पावतो, ते सुख सर्वोत्कृष्ट आहे. बुद्धिगम्य आहे.

जे इंद्रियांना अगोचर आहे व जे सुख भोगीत असताना तो योगी आपल्या स्वल्पापासून चलन पावत नाही, असे सुख योग्याच्या अनुभवाला येते.’ म्हणूनच त्या योगाने या इंद्रियांचे नियमन झाले की, मन स्थिर होईल. एरवी तरी या योगामुळे ज्या वेळेला इंद्रियांचा निग्रह होतो त्या वेळेला मन आपल्या (चैतन्याच्या) भेटीला निघते. ते मन ज्या वेळेला विषयाला सोडून परत अंतर्मुख होते आणि आपणच आपल्या आत्मस्वरूपाला पाहते. पाहिल्याबरोबर त्यास आपल्या स्वरूपाची ओळख पटते. तेच तत्त्व ‘मी’ आहे. अशा समजुतीवर आपले मन स्थिर होते आणि मग सर्वसुखाच्या साम्राज्यावर बसते. मग आत्म्याशी समरस झाल्याने मनाचा मनपणा नाहीसा होतो. त्यानंतर दुसरे काहीच दिसत नाही. ज्याला इंद्रिय जाणत नाहीत, असे जे चैतन्यरूपी ‘मन’ स्वत:च आपण आपल्या ठिकाणी येऊन राहते. सुखाची चटक लागल्याने प्रपंचात गुंतलेले मन विषयवासनेची आठवणही काढत नाही. म्हणून मनाला योगाभ्यासाची सवय लावा. म्हणजे मन अनुभवाच्या वाटेने हळूहळू आत्मानुभवत कायम स्थिर राहील. मग आतून-बाहेरून मनुष्य चांगलाच वागेल.डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :spiritualअध्यात्मिक